शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

परभणी जिल्ह्याला मिळाला ८० कोटींचाच विमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 00:10 IST

खरीप हंगामामध्ये झालेल्या पिकांच्या नुकसानीपोटी विमा कंपनीने जिल्ह्यातील सुमारे अडीच लाख शेतकऱ्यांना ८० कोटी ३७ लाख २८ हजार रुपयांचा विमा मंजूर केला असल्याची माहिती कृषी विभागातून मिळाली. विशेष म्हणजे मागील वर्षी गारपीट, अवकाळी पाऊस आणि कापसावर पडलेल्या बोंडअळीच्या संकटामुळे शेतकºयांच्या हाती एकही पीक लागले नसताना कंपनीने मात्र ८० कोटींवरच बोळवण केल्याने शेतकºयांमध्ये संतापाची भावना आहे.

मारोती जुंबडे।लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : खरीप हंगामामध्ये झालेल्या पिकांच्या नुकसानीपोटी विमा कंपनीने जिल्ह्यातील सुमारे अडीच लाख शेतकऱ्यांना ८० कोटी ३७ लाख २८ हजार रुपयांचा विमा मंजूर केला असल्याची माहिती कृषी विभागातून मिळाली. विशेष म्हणजे मागील वर्षी गारपीट, अवकाळी पाऊस आणि कापसावर पडलेल्या बोंडअळीच्या संकटामुळे शेतकºयांच्या हाती एकही पीक लागले नसताना कंपनीने मात्र ८० कोटींवरच बोळवण केल्याने शेतकºयांमध्ये संतापाची भावना आहे.जिल्ह्यात खरीप आणि रब्बी हे दोन महत्त्वाचे हंगाम असून या हंगामात नैसर्गिक संकटांमध्ये पिकांचे नुकसान झाल्यास विमा कंपनीकडून नुकसान भरपाई दिल्या जाते. त्यासाठी शेतकºयांना पिकांची जोखीम रक्कम विमा कंपनीकडे भरावी लागते. प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत शेतकºयांना नुकसानीपासून दिलासा मिळण्यासाठी विम्याची तरतूद करण्यात आली आहे. परभणी जिल्ह्यासाठी रिलायन्स या खाजगी विमा कंपनीची नियुक्ती झाली आहे. यापूर्वी राष्ट्रीय विमा कंपनीमार्फत शेतकºयांना विम्याची रक्कम दिली जात होती. गतवर्षीच्या खरीप हंगामामध्ये सोयाबीन, कापूस, उडीद, सूर्यफुल, ज्वारी, मूग या पिकांची जिल्ह्यात पेरणी झाली. शेतकºयांनी पीकनिहाय विमा उतरविला. जिल्हाभरातील ६ लाख ९७ हजार ७१७ खातेदारांनी १४० कोटी ५६ लाख २१५ रुपयांची रक्कम विम्याच्या हप्त्यापोटी जमा केली. यावर्षीच्या हंगामात प्रथमच पीक कर्ज खातेदारांची रक्कम कर्जातून विम्यामध्ये वळती करण्यात आली. तर बिगर कर्जदारांनी बँकांमध्ये रांगा लावून विमा रक्कम भरली आहे. ५ लाख २१ हजार हेक्टर क्षेत्रावर खरीपाची पेरणी झाली. त्यापैकी ४ लाख २४ हजार २७१ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचा विमा उतरविण्यात आला.खरीप हंगामामध्ये जिल्हाभरात पावसाचे प्रमाण कमी राहिले. सरासरीच्या ३१ टक्के पाऊस कमी झाला. त्यात पालम, गंगाखेड, सोनपेठ या तीन तालुक्यांमध्ये तर पावसाची टक्केवारी कमी असल्याने त्याचा फटका पिकांच्या वाढीला बसला. सोयाबीन, मूग, उडीद या पिकांचे उत्पादन अपेक्षेप्रमाणे झाले नाही. तर बोंडअळीच्या प्रादूर्भावाने शेतकºयांचे कंबरडे मोडले. नगदी पीक म्हणून कापसाची लागवड केली. परंतु, याच पिकाने धोका दिला. ही सर्व परिस्थिती लक्षात घेऊन यावर्षी नुकसानीच्या तुलनेत विम्याची रक्कम हाती लागेल, अशी शेतकºयांची आशा होती. मात्र शेतकºयांनी भरलेली रक्कमही त्यांना विमा कंपनीकडून परत मिळाली नाही. कृषी विभागाकडून उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार जिल्ह्याला ८० कोटी ३७ लाख २८ हजार रुपयांचा विमा मंजूर झाला आहे. त्यात ५८ कोटी ८२ लाख ४९ हजार रुपये खातेदारांच्या खात्यावर जमा झाले. ६ लाख ९७ हजार ७१७ खातेदारांपैकी २ लाख ३२ हजार ९०१ शेतकºयांना विम्याचा लाभ मिळाला आहे. उर्वरित ४ लाख ६४ हजार ८१६ शेतकरी मात्र विम्याच्या लाभापासून वंचित राहिले आहेत. ज्या शेतकºयांच्या खात्यात विमा रक्कम जमा झाली, ते शेतकरी देखील नाराजीचा सूर आवळत आहेत. कारण नुकसानीच्या तुलनेत विम्याची रक्कम ही कमी असल्याने विमा काढूनही उपयोग झाला नसल्याची भावना या शेतकºयांमध्ये निर्माण झाली आहे. एकंदर यावर्षी विमा कंपनीने शेतकºयांची फसवणूक केल्याचा आरोप आता होत असून कंपनीच्या अधिकाºयांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.विमा कंपनीविषयी वाढली ओरडशेतकºयांना विमा कंपनीने फसविल्याची भावना जिल्ह्यामध्ये निर्माण झाली असून कंपनीच्या विरोधात सर्वच पक्षांनी आंदोलने केली आहेत. राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस, भाजप, स्वाभिमानी शेतकरी संघटना, किसान सभा, भारतीय कम्युनिस्ट पक्ष अशा सर्वच पक्षांनी कंपनीच्या अधिकाºयांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच शेतकºयांना नुकसान भरपाई देण्याची मागणीही करण्यात आली आहे.अधिकाºयांची डोळेझाकजिल्ह्यातील महसूल विभागामार्फत दरवर्षी पिकांची आणेवारी काढली जाते. या आणेवारीवरुन पीक परिस्थिती लक्षात येते. जिल्हा प्रशासनाने डिसेंबर महिन्यात जिल्ह्याची अंतिम आणेवारी जाहीर केली. त्यात बहुतांश गावांमध्ये ५० पैशांपेक्षा कमी आणेवारी निघाली आहे. या आणेवारीनुसार शेतकºयांना ५० टक्केही उत्पन्न झाले नसल्याचे सिद्ध होते. त्यामुळे शेतकरी विमा रक्कमेसाठी पात्र असतानाही विमा कंपनीने मात्र आणेवारी पद्धतीनुसार विमा मंजूर न करता पीक कापणी प्रयोगाच्या माध्यमातून विमा मंजूर केला. त्यामुळे शेतकºयांना नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीRainपाऊस