शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
2
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
3
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
4
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
5
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
6
₹42 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, लागलं 20% चं अप्पर सर्किट; जपानमधून मिळाली आहे मोठी ऑर्डर!
7
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
8
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
9
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
10
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
11
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
12
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
13
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
14
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर, पण बाळासह आईचा मृत्यू
15
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
16
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
17
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
18
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
19
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
20
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल

परभणी जिल्हा कचेरीवर धडकला भटक्या विमुक्तांचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2018 12:51 AM

राईनपाडा हत्याकांडातील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, या मागणीसाठी सकल भटक्या विमुक्त जाती संघटनेच्या वतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : राईनपाडा हत्याकांडातील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, या मागणीसाठी सकल भटक्या विमुक्त जाती संघटनेच्या वतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.राईनपाडा हत्याकांडातील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, मृतांच्या वारसांना प्रत्येकी २५ लाख रुपयांची शासकीय मदत द्यावी, भटक्या विमुक्तांसाठी तिसरी सूची तयार करावी, या प्रमुख मागण्या या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आल्या. शहरातील शनिवार बाजार येथून दुपारी १२ वाजेच्या सुमारास या मोर्चाला प्रारंभ झाला. जोशी समाज, गोसावी समाज, डवरी गोसावी समाज, सिकलकरी समाज, वैंदू समाज, बहुरुपी, गारुडी समाज, कैकाडी समाज, जोगी समाज आदी भटक्या समाजातील महिला, पुरुष पारंपारिक वेषभूषेत मोर्चात सहभागी झाले होते. भटक्या विमुक्तांना न्याय मिळालाच पाहिजे, राईनपाडा घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा द्या, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.शनिवार बाजार, शिवाजी चौक, गांधी पार्क, नारायणचाळ, विसावा कॉर्नर, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा मार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. आंदोलनस्थळी सकल भटक्या विमुक्त जाती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.धर्मराज चव्हाण, भगवान भोळे, ज्ञानेश्वर भोसले, बाबासाहेब भोसले, गोविंद सरवदे, रामेश्वर भोळे, पंडित भोसले, दिलीप हरगावकर, मदन नरवाडे, अशोक नरवाडे, रेड्डीसिंग बावरी, आनंद वंजारी, सटवाजी भोळे, साधनाताई राठोड आदींनी आंदोलकांना मार्गदर्शन केले. राईनपाडा सारख्या घटना यापुढे घडू नयेत, यासाठी समाजाने काळजी घ्यावी, शिक्षणाची कास धरावी, संघटीत होऊन आपले हक्क मिळवावेत, असे आवाहन यावेळी वक्त्यांनी केले. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.सत्ता ताब्यात घ्या : आंबेडकरभारिप-बहुजन महासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आंदोलकांची भेट घेऊन त्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, देशाला स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे झाली, परंतु भटक्या विमुक्तांचे पुनर्वसन झाले नाही. राज्यकर्त्यांना भटक्या समाजाविषयी आस्था नसल्यानेच हा प्रश्न सुटला नाही. त्यामुळे त्यांच्याकडून आता न्याय मिळण्याचीही अपेक्षा नाही.समाजाला विकासाच्या मार्गावर आणयचे असेल तर सत्ता मिळविणे हा एकच पर्याय आहे. त्यामुळे मताचा योग्य वापर करुन सत्ता काबीज करा. त्यासाठी संघटित व्हा, सत्ता ताब्यात असेल तरच आपले प्रश्न सुटतील, असे मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले. यावेळी लक्ष्मणराव माने यांनीही आंदोलकांना मार्गदर्शन केले. महापौर मीनाताई वरपूडकर यांनीही आंदोलकांची भेट घेऊन त्यांचे प्रश्न जाणून घेतले.

टॅग्स :parabhaniपरभणीParabhani collector officeजिल्हाधिकारी कार्यालय परभणीMorchaमोर्चा