शहरं
Join us  
Trending Stories
1
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
2
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
3
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
4
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
5
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
7
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
8
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
9
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
10
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
11
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
12
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
13
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
14
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
15
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
16
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
17
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
18
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
19
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
20
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च

परभणी : पक्षी, झाडांच्या संवर्धनासाठी सरसावले पांगरीतील चिमुकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2019 23:49 IST

जिंतूर तालुक्यातील पांगरी येथील जिल्हा परिषदेच्या उच्च प्राथमिक शाळेच्या परिसरात दोन वर्षापूर्वी लावलेल्या ४० ते ५० झाडांचे दुष्काळी परिस्थितीत संवर्धन व्हावे, यासाठी या शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी स्वत:हून प्रयत्न सुरू केले आहेत़ झाडांच्या बुडाला टाकाऊ बाटल्यांच्या सहाय्याने पाणी दिले जात आहे़ विद्यार्थ्यांचा हा उपक्रम पर्यावरण प्रेमींसाठी प्रेरणा देणारा ठरत आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिंतूर तालुक्यातील पांगरी येथील जिल्हा परिषदेच्या उच्च प्राथमिक शाळेच्या परिसरात दोन वर्षापूर्वी लावलेल्या ४० ते ५० झाडांचे दुष्काळी परिस्थितीत संवर्धन व्हावे, यासाठी या शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी स्वत:हून प्रयत्न सुरू केले आहेत़ झाडांच्या बुडाला टाकाऊ बाटल्यांच्या सहाय्याने पाणी दिले जात आहे़ विद्यार्थ्यांचा हा उपक्रम पर्यावरण प्रेमींसाठी प्रेरणा देणारा ठरत आहे़पांगरी येथील जि़प़ शाळेत दरवर्षी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जातात़ त्यातूनच दोन वर्षांपूर्वी शाळेच्या आवारात फुले आणि फळांची सुमारे ५० झाडे लावण्यात आली़ सध्या दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने ही झाडे पाण्याअभावी कोमेजू नयेत यासाठी विद्यार्थ्यांनीच पुढाकार घेतला आहे़ दररोजच्या जेवणाच्या डब्यासोबत आणलेले पाणी शिल्लक राहिल्यानंतर झाडांना दिले जाते़ याशिवाय प्रत्येक झाडाच्या बुडाला बाटली लावून त्यात सुतळी सोडून थेंब थेब पाणी देण्याचा प्रयत्न या विद्यार्थ्यांनी केला आहे़ शाळेच्या परिसरातील प्रत्येक झाडाला बाटलीच्या सहाय्याने पाणी दिले जात आहे़ झाडे जगविण्याचा विद्यार्थ्यांचा हा प्रयत्न निश्चितच प्रेरणादायी आहे़ दुष्काळी परिस्थितीत अनेक भाग पाण्याअभावी ओसाड पडलेला दिसत असला तरी जि़प़ शाळेचा परिसर मात्र आजही हिरवागार दिसत आहे़ शाळेच्या आवारात बऱ्यापैकी झाडी झाली असून, फुलझाडांनी हा परिसर शोभीवंत झाला आहे़विशेष म्हणजे केवळ झाडांना पाणी देण्यापर्यंतच विद्यार्थी थांबले नाहीत तर या झाडांवर येणाºया पक्षांचीही चिंता विद्यार्थ्यांना लागली होती़ त्यातूनच जुन्या मोठ्या झाडांवर पक्ष्यांसाठी पाण्याची सुविधा करण्यात आली आहे़ प्रत्येक झाडावर टोपली वजा शिंकाडे बांधून पक्ष्यांसाठी पाण्याची सुविधा विद्यार्थ्यांनी केली आहे़ शाळेचे मुख्याध्यापक के़सी़ घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक मंडळीही या कामी मुलांना प्रोत्साहन देत आहे़एक हजार झाडांची रोपवाटिकाआगामी काळात वृक्षारोपण करण्यासाठी विद्यार्थी आतापासूनच कामाला लागले आहेत़ बोर, सिताफळ, लिंबोळी आदी झाडांच्या बियांपासून एक हजार रोपे तयार केली जात आहेत़ परिसरातील मैनापुरी डोंगर आणि इतर ठिकाणी ही झाडे लावली जाणार आहेत़ एक मुल ३० झाड हे अभियान सुरू केले असल्याची माहिती मुख्याध्यापक के़सी़ घुगे यांनी दिली़

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणीdroughtदुष्काळStudentविद्यार्थी