शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
2
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
3
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
4
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
5
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
7
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
8
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
9
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
10
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
11
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
12
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
13
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
14
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
15
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
16
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
17
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
18
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
19
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
20
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर

परभणी : ‘पीक कर्ज वाटपाची गती बँकांनी वाढवावी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2019 12:25 AM

यावर्षीचा खरीप हंगाम संपत आला असला तरी जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँकांकडून ४५ हजार शेतकऱ्यांनाच पीक कर्जाचे वाटप करण्यात आले आहे. जवळपास ५ लाख शेतकरी अद्यापही पीक कर्जाच्या प्रतीक्षेत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे बँकांनी पीक कर्ज वाटपाची गती वाढवावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : यावर्षीचा खरीप हंगाम संपत आला असला तरी जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँकांकडून ४५ हजार शेतकऱ्यांनाच पीक कर्जाचे वाटप करण्यात आले आहे. जवळपास ५ लाख शेतकरी अद्यापही पीक कर्जाच्या प्रतीक्षेत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे बँकांनी पीक कर्ज वाटपाची गती वाढवावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.२०१८- १९ च्या खरीप हंगामामध्ये जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत, खाजगी, जिल्हा मध्यवर्ती बँक व ग्रामीण बँकेने आतापर्यंत ६७ हजार शेतकºयांना ३५० कोटींच्या जवळपास पीककर्ज वाटप केले होते. ज्याची टक्केवारी २३.१५ टक्के होती; परंतु, २०१९-२० हा खरीप हंगाम जवळपास संपत आलेला आहे.रब्बी हंगामाची चाहूल लागलेली आहे. खरीप हंगामामध्ये जिल्ह्यातील बँकांना १४७० कोटी ४४ लाख रुपये पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे; परंतु, अद्यापपर्यंत केवळ ५० हजार शेतकºयांना २३० कोटी १३ लाख रुपयांच्या जवळपास पीक कर्जाचे वाटप करण्यात आले आहे. ज्याची टक्केवारी १६ टक्के एवढी आहे.त्यामुळे मागील तीन वर्षापासून दुष्काळाचा सामना करणाºया शेतकºयांनी खरीप हंगामातील पेरणीही उसणवारी करुन पूर्ण केली आहे. उसणवारी केलेले पैसे परतफेडीसाठी शेतकºयांकडे सध्या पैसे उपलब्ध नाहीत. त्यामुळे शेतकºयांना सध्या पैशाची नितांत आवश्यकता आहे; परंतु, पीक कर्ज वाटप करताना कर्जमाफीचाही मोठा अडथळा निर्माण होत असल्याने बँकांकडून पीक कर्ज वाटप करण्याची गती खरीप हंगाम संपत आला तरी अद्याप वाढलेली नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देऊन पीक कर्ज वाटपाची गती वाढवून शेतकºयांना लाभ मिळवून द्यावा, अशी मागणी जिल्ह्यातील शेतकºयांमधून होत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरीCrop Loanपीक कर्ज