शहरं
Join us  
Trending Stories
1
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
2
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
3
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
4
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
5
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
6
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
7
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
8
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
9
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
10
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
11
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
12
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
13
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
14
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात
15
‘मॅट’ने केले राज्य सरकारचे पोस्टमार्टेम; वैद्यकीय शिक्षण संचालकांची नियुक्ती तत्काळ संपुष्टात आणण्याचे आदेश; नवीन संचालक नेमा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

परभणी : ६० हजार हेक्टर सिंचन धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2018 12:17 AM

पूर्णा नदीवरील येलदरी आणि सिद्धेश्वर या प्रकल्पात पाणीसाठा नसल्याने लाभक्षेत्रातील सुमारे ६० हजार हेक्टर जमिनीवरील सिंचनाचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. या शिवाय जिंतूर तालुक्यातील १३ लघू प्रकल्पांपैकी ११ प्रकल्पांमध्ये अत्यल्प पाणीसाठा असल्याने पाणीप्रश्न अधिकच गंभीर होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कयेलदरी (परभणी) : पूर्णा नदीवरील येलदरी आणि सिद्धेश्वर या प्रकल्पात पाणीसाठा नसल्याने लाभक्षेत्रातील सुमारे ६० हजार हेक्टर जमिनीवरील सिंचनाचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. या शिवाय जिंतूर तालुक्यातील १३ लघू प्रकल्पांपैकी ११ प्रकल्पांमध्ये अत्यल्प पाणीसाठा असल्याने पाणीप्रश्न अधिकच गंभीर होत आहे.यावर्षीच्या पावसाळ्यात येलदरी प्रकल्पामध्ये केवळ ९ टक्के पाणीसाठा झाला आहे. विशेष म्हणजे येलदरी प्रकल्पात पाच वर्षांपासून जेमतेम पाणीसाठा होत असल्याने तालुक्यातील पिण्याच्या पाण्याचा व सिंचनाचा प्रश्न निर्माण झाला आहे.अर्ध्या मराठवाड्याची तहान भागविणारा प्रकल्प म्हणून येलदरीची ओळख आहे. या प्रकल्पात पाणीसाठा उपलब्ध नसल्याने अर्ध्या मराठवाडयात पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. जलसंपदा विभागासह जिल्हा प्रशासनाला पाण्याचे नियोजन करताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. यावर्षी जिंतूर तालुक्याकडे पावसाने पाठ फिरविली. दमदार पाऊस झाला नसल्याने धरणाच्या पाणलोट क्षेत्रात टंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. येलदरी प्रकल्पात पाणीसाठा झाला नसल्याने परभणी, हिंगोली व नांदेड जिल्ह्यात २२५ हून अधिक गावांसह मोठ्या शहरांमध्ये टंचाई व चाऱ्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.जिंतुरातील ११ लघू तलाव कोरडेचजिंतूर तालुक्यात लघू सिंचन विभागांतर्गत १३ लघू तलाव असून एक मध्यम प्रकल्प आहे. त्यापैकी देवगाव लघू तलावात ५७ टक्के, जोगवाडा ९० टक्के, बेलखेडा ८० टक्के, वडाळी ८९ टक्के, पाडळी ५५ टक्के, चारठाणा ८३ टक्के, कवडा ५२, भोसी ८, मांडवी ८०, दहेगाव १५, केहाळ २१, आडगाव १७ आणि चिंचोली लघू तलवात केवळ १६ टक्के पाणीसाठा आहे. १३ पैकी ११ प्रकल्पांमध्ये अत्यल्प पाणीसाठा आहे. तर करपरा मध्यम प्रकल्पात ७६ टक्के पाणीसाठा असल्याने हे पाणी किती दिवस पुरेल, असा प्रश्न निर्माण झाला आहे.दरवर्षी साठ्यात घट१९७२ च्या दुष्काळानंतर प्रथमच येलदरी धरणात एवढा कमी पाणीसाठा जमा झाला आहे. दरवर्षी पाणीसाठ्यात घट होत असल्याने पुढील वर्षी पाणीसाठा शिल्लक राहतो की नाही? असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे उपलब्ध पाणी काटकसरीने वापरावे लागणार आहे.खडकपूर्णामुळे वाढल्या अडचणीपूर्णा नदीवर येलदरी धरणाच्या वर बुलढाणा जिल्ह्यात खडकपूर्णा धरण बांधण्यात आले. २०१३ पासून या धरणात पूर्ण क्षमतेने पाणीसाठा केला जात आहे. त्यामुळे २०१३ नंतर येलदरी प्रकल्पात पाणीसाठा जमा झाला नाही.परिणामी येलदरी व सिद्धेश्वर धरणाच्या लाभक्षेत्रातील ६० हजार हेक्टर शेतजमिनीच्या सिंचनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे जिल्हावासियांसाठी खडकपूर्णा धरणामुळे अडचणी वाढल्या आहेत. यावर तोडगा काढण्याची गरज निर्माण झाली आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीyelgao damयेळगाव धरणWaterपाणीIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प