शहरं
Join us  
Trending Stories
1
भावाचा हातात हात, तोंडावर मास्क, हात उंचावून अभिवादन; आजारपणातही संजय राऊत बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर
2
"बाळासाहेबांची प्रतिमा चोरून हिंदुत्वाचे वारस म्हणून मतं मागणाऱ्यांची..."; राज ठाकरेंचे 'फटकारे', कुणावर डागली तोफ?
3
"मी हे मान्यच करू शकत नाही..."; टीम इंडियाच्या पराभवानंतर चेतेश्वर पुजाराने चांगलंच सुनावलं
4
५ वर्षांत ५३०० टक्के रिटर्न; आता 'हा' शेअर पुन्हा सुस्साट! सातत्यानं लागतंय अपर सर्किट, कारण काय?
5
भारताचा अमेरिकेसोबत ऐतिहासिक LPG करार; घरगुती गॅस सिलिंडरची किंमत कमी होणार?
6
Protest: आधी ‘शेल्टर’ची व्यवस्था करा, नंतरच श्वानांना हात लावा; प्राणीमित्र संघटना रस्त्यावर!
7
गौतम अदानी आणताहेत देशातील सर्वात मोठा राइट्स इश्यू; ७१६ रुपये स्वस्त मिळतोय शेअर, पाहा डिटेल्स
8
खळबळजनक! थारसाठी पत्नीची हत्या, हुंड्यासाठी पती झाला हैवान; भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
9
SIR च्या कामाचा भार असह्य; वरिष्ठाच्या धमक्यांना कंटाळून शिक्षकाची रेल्वेखाली उडी, एकाच दिवशी दोन कर्मचाऱ्यांचे टोकाचे पाऊल
10
Ritual: पानाच्या टपरीवर का असते शंकराची पितळी मूर्ती? धार्मिक मान्यता की आणखी काही?
11
सौदी अरेबियात भीषण अपघात, ४२ भारतीयांचा मृत्यू; प्रवासी बस डिझेल टँकरला धडकली, आगीचा उडाला भडका
12
सुश्मिता सेनने पूर्ण शुद्धीत राहूनच केलेली अँजिओप्लास्टी, दोन वर्षांपूर्वी आलेला हार्टॲटॅक
13
काँगोमधील तांब्याच्या खाणीत मोठी दुर्घटना; पूल कोसळून ३२ जणांचा मृत्यू, अनेक जण अजूनही बेपत्ता
14
आई वडिलांची एक चूक नडली, मुलाला झाला गंभीर आजार; हाताचे बोट कापावे लागले, कारण काय?
15
Delhi Blast : दिल्ली स्फोटातील डॉ. शाहीनच्या कोट्यवधींच्या फंडिंगबाबत धक्कादायक खुलासा, ATS-NIA चे छापे
16
टॅक्स भरणे झाले सोपे! बँक, नेट बँकिंगचा झंझट नाही; आता UPI ॲपद्वारे मिनिटांत भरा प्राप्तीकर
17
पालघर साधू हत्याकांडात आरोप केले, त्यालाच पक्षात घेतले? चौफेर टीका होताच भाजपानं दिलं असं स्पष्टीकरण
18
देवेंद्र फडणवीसांना भेटला, सत्कार करून घेतला; पंतप्रधान कार्यालयात सचिव म्हणणारा निघाला...
19
नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी सुवर्णसंधी! ९०% कंपन्या 'या' पदावर प्रोफेशनल्सची करणार भरती
20
देवेंद्र फडणवीसांचं 'धक्कातंत्र'! उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरेंवर पुन्हा सोपवली जबाबदारी
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : शेवटच्या टप्प्यात ४३ टँकरने पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 00:38 IST

जिल्हावासियांना पावसाळ्याचे वेध लागले असले तरी पाणीटंचाई दूर झालेली नसून शेवटच्या टप्प्यामध्ये जिल्ह्यातील सुमारे ४२ हजार १४९ ग्रामस्थांना ४२ टँकरच्या सहाय्याने पाणीपुरवठा केला जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्हावासियांना पावसाळ्याचे वेध लागले असले तरी पाणीटंचाई दूर झालेली नसून शेवटच्या टप्प्यामध्ये जिल्ह्यातील सुमारे ४२ हजार १४९ ग्रामस्थांना ४२ टँकरच्या सहाय्याने पाणीपुरवठा केला जात आहे.यावर्षीच्या उन्हाळ्यात जिल्ह्यात जलसाठे आटल्याने पाणीटंचाई निर्माण झाली होती. सेलू तालुक्यातील निम्न दुधना प्रकल्प वगळता इतर सर्वच प्रकल्पांमधील पाणी आटल्याने टंचाईचा प्रश्न निर्माण झाला. जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी प्रशासनाने विविध उपाययोजना राबविल्या. त्यात ४२ टँकरने टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा केला जात आहे. ग्रामस्थांना सध्या पावसाळ्याचे वेध लागले आहेत. दोन दिवसांपूर्वी पाऊस झाला असला तरी भूजल पातळीत थोडीही वाढ झाली नाही. त्यामुळे प्रशासनाने अजूनही टँकर सुरु ठेवले आहेत. सद्यस्थितीत २३ गावे आणि १३ वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा होत आहे. पालम तालुक्यात सर्वाधिक १५ टँकर सुरु असून दररोज २४ फेऱ्या करुन तालुक्यातील १२ हजार ९४७ ग्रामस्थांना पाणीपुरवठा केला जात आहे. गंगाखेड तालुक्यात १० टँकरच्या सहाय्याने १७ हजार २५९ ग्रामस्थांना पाणीपुरवठा होत आहे. तर पूर्णा तालुक्यात ८, सेलू तालुक्यात ४ आणि जिंतूर तालुक्यात ५ टँकरच्या सहाय्याने ग्रामस्थांना पाणी उपलब्ध करुन दिले जात आहे.यावर्षी जिल्ह्यातील बहुतांश भागात जायकवाडी प्रकल्पाचे पाणी उपलब्ध झाल्यामुळे टंचाई जाणवली नाही. मात्र पालम, पूर्णा, जिंतूर या तालुक्यांमध्ये टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढली आहे. जिल्हा प्रशासनाने पाणीटंचाई निवारण्यासाठी टँकर बरोबर विहीर अधिग्रहण, तात्पुरती नळ योजना दुरुस्ती, पूरक पाणीपुरवठा योजना आदी उपाययोजना हाती घेतल्या होत्या.त्याचप्रमाणे नव्याने विंधन विहीर घेण्याची कामेही केली आहेत. पावसाळा तोंडावर येऊन ठेपला असून मान्सूनचा पाऊस दाखल झाल्यानंतर जिल्ह्यातील भूजल पातळीत वाढ होऊन टंचाई दूर होईल. मात्र मोठा पाऊस होईपर्यंत प्रशासनाला टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागणार आहे.टँकर सुरु असलेली गावेपालम तालुका- रामपूर व रामपूर तांडा, नाव्हा, चाटोरी, आनंदवाडी, पेठपिंपळगाव, तांदुळगाव, पेठशिवणी, पेंडू, बोंदरवाडी, कापसी, फुटतलाव तांडा व धनाजी तांडा, पिराचा तांडा, पायरीका तांडा. पूर्णा तालुका- पिंपळगाव लोखंडे, हिवरा, वाई लासीना, लोण खु., गोविंदपूर, आहेरवाडी, गौर, पिंपळा भत्या. गंगाखेड तालुका- खंडाळी, इळेगाव, गुंडेवाडी, उमरा नाईक तांडा, गुंजेगाव, मरडसगाव, लिंबवाडी तांडा, उमाटवाडी, गणेशपुरी, मसनेरवाडी. सेलू तालुका- पिंपळगाव गोसावी, नागठाणा, तळतुंबा, नांदगाव. जिंतूर तालुका- मांडवा, कोरवाडी व कोरवाडी तांडा, वडी, शिवाची वाडी.२०४ विहिरींचे अधिग्रहणउन्हाळ्यातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ३० मेपर्यंत २०४ विहिरींचे अधिग्रहण करुन या विहिरींचे पाणी ग्रामस्थांसाठी खुले केले. त्यात २८ विहिरी टँकरसाठी अधिग्रहित केल्या. १७६ विहिरींचे पाणी ग्रामस्थांसाठी उपलब्ध करुन दिले आहे. गंगाखेड तालुक्यात सर्वाधिक ६९ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. जिंतूर तालुक्यात ४१, पालम तालुक्यात ३१, पूर्णा २६, सेलू २४, पाथरी ६ आणि मानवत तालुक्यात ४ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीwater scarcityपाणी टंचाई