शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
रेल्वे प्रवाशांच्या खिशाला कात्री! आजपासून तिकीट दरवाढ लागू; जाणून घ्या तुमचे तिकीट किती रुपयांनी महागले?
3
मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना देखील मेरी ख्रिसमस; नायजेरियात ISIS वर बॉम्ब हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २६ डिसेंबर २०२५: आनंद व उत्साहाचे वातावरण; कामात यश मिळेल!
5
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
6
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
7
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
8
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
9
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
10
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
11
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
12
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
13
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
14
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
15
दस्ताचा नोंदणी क्रमांक द्या, अन्‌ मिळवा बँकेकडून कर्ज
16
श्रीलंकेविरूद्ध टी-२० मालिका विजयासाठी भारत सज्ज; खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या श्रीलंकेविरुद्ध आज तिसरा टी-२० सामना
17
आता प्रतिष्ठा जपण्याचे इंग्लंड संघापुढे आव्हान...
18
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
19
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
20
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : पाण्याअभावी करपली ४ लाख रोपे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2018 00:17 IST

महाराष्ट्र शासनाच्या १३ कोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत जिल्ह्याला ३२ लाख ४० हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. ३१ जुलैपर्यंत जिल्ह्यामध्ये ३० विभागांतर्गत वृक्षारोपण मोहीम राबवून ३७ लाख वृक्षांचे रोपण करण्यात आले होते; परंतु, वृक्षारोपणानंतर जिल्ह्यात पाऊस न झाल्याने जवळपास ४ लाख रोपे जागेवरच करपल्याचे पहावयास मिळाली.

मारोती जुंबडे ।लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : महाराष्ट्र शासनाच्या १३ कोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत जिल्ह्याला ३२ लाख ४० हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. ३१ जुलैपर्यंत जिल्ह्यामध्ये ३० विभागांतर्गत वृक्षारोपण मोहीम राबवून ३७ लाख वृक्षांचे रोपण करण्यात आले होते; परंतु, वृक्षारोपणानंतर जिल्ह्यात पाऊस न झाल्याने जवळपास ४ लाख रोपे जागेवरच करपल्याचे पहावयास मिळाली.जिल्ह्यामध्ये सलग तीन वर्षे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावर नामी उपाय म्हणून वनविभागाने मागील दोन वर्षापासून जिल्ह्यात वृक्ष लागवड मोहीम सुरु केली. या अंतर्गत २०१६ या वर्षी जिल्ह्यात २ लाख ८४ हजार ४८० वृक्षांची लागवड करण्यात आली होती. त्यानंतर २०१७ मध्ये ७ लाख २२ हजार वृक्षारोपण करण्यात आले होते. त्यानंतर एकाही विभागाने वृक्ष जोपासणीकडे लक्ष दिले नाही.त्यामुळे जिल्ह्यातील वृक्ष लागवडीचा पूरता बोजवारा उडाल्याचे दिसून आले. वनविभागाच्या आकडेवारीनुसार २०१६ मध्ये करण्यात आलेल्या वृक्ष लागवडीतून ६२.६३ टक्के तर २०१७ मध्ये ६३.५८ टक्के झाडे जगल्याचा अहवाल आहे. मात्र प्रत्यक्षात वनविभागाने काढलेल्या टक्केवारी एवढीही झाडे जिल्ह्यात जगली नसल्याचे प्रत्यक्ष पाहणीतून दिसून आले. राज्य शासनाच्या १३ कोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत २०१८ या वर्षासाठी परभणी जिल्ह्याला ३४ लाख १६ हजार वृक्षरोपाचे उद्दिष्ट देण्यात आले होते.यामध्ये महसूल विभागाला २८ हजार, पशूसंवर्धन विभाग २५ हजार ८००, नगरविकास विभाग १ लाख २९ हजार ८००, उद्योग विभाग ६४ हजार, गृह विभाग ११ हजार ५००, कारागृह ३ हजार, सार्वजनिक आरोग्य सेवा ८९ हजार ५००, सार्वजनिक बांधकाम विभाग १८ हजार, ग्रामविकास विभाग ८ लाख १४ हजार ६४, कृषी विभाग २ लाख ४९ हजार १००, वनविभाग ६ लाख २४ हजार, सामाजिक वनीकरण विभाग ५ लाख, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ १ लाख, केंद्रीय रेल्वे विभाग ४५ हजार, कौशल्य विकास उद्योजकता ९ हजार, जिल्ह्यातील ७०४ ग्रामपंचायतींना या वृक्षलागवडी योजनेंतर्गत ७ लाख ६८ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. या ३० विभागांपैकी केंद्रीय रेल्वे विभागाने वृक्ष लागवड केली नाही. उर्वरित २९ विभागाने जिल्ह्याला दिलेले ३४ लाख १६ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करुन २ लाख रोपटे अधिकचे लावण्यात आले.वृक्ष लागवड मोहिमेत एक पाऊल पुढे घेऊन सर्व विभागांनी मोहीम यशस्वी केली; परंतु, वृक्षरोपणानंतर जिल्ह्यात एकही पाऊस झाला नाही.परिणामी लावण्यात आलेल्या रोपट्यांना पाणीच मिळाले नाही. त्यामुळे परभणी तालुक्यातील उजळंबा रस्ता, आर्वी ते कुंभारी, एस.टी. महामंडळ आदी ठिकाणी लावण्यात आलेले रोपे जागेवरच करपली आहेत. त्या अनुषंगाने केलेल्या पाहणीतून जिल्ह्यातील ४ लाख रोपटे पाण्याअभावी जागेवरच करपून गेल्याचे केलेल्या आढळून आले. त्यामुळे यावर्षी जिल्ह्यात राबविलेली वृक्ष लागवड मोहिमेचा पावसाळा संपण्यापूर्वीच फज्जा उडाला असल्याचे दिसत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणीRainपाऊस