शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : पाण्याअभावी करपली ४ लाख रोपे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2018 00:17 IST

महाराष्ट्र शासनाच्या १३ कोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत जिल्ह्याला ३२ लाख ४० हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. ३१ जुलैपर्यंत जिल्ह्यामध्ये ३० विभागांतर्गत वृक्षारोपण मोहीम राबवून ३७ लाख वृक्षांचे रोपण करण्यात आले होते; परंतु, वृक्षारोपणानंतर जिल्ह्यात पाऊस न झाल्याने जवळपास ४ लाख रोपे जागेवरच करपल्याचे पहावयास मिळाली.

मारोती जुंबडे ।लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : महाराष्ट्र शासनाच्या १३ कोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत जिल्ह्याला ३२ लाख ४० हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. ३१ जुलैपर्यंत जिल्ह्यामध्ये ३० विभागांतर्गत वृक्षारोपण मोहीम राबवून ३७ लाख वृक्षांचे रोपण करण्यात आले होते; परंतु, वृक्षारोपणानंतर जिल्ह्यात पाऊस न झाल्याने जवळपास ४ लाख रोपे जागेवरच करपल्याचे पहावयास मिळाली.जिल्ह्यामध्ये सलग तीन वर्षे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावर नामी उपाय म्हणून वनविभागाने मागील दोन वर्षापासून जिल्ह्यात वृक्ष लागवड मोहीम सुरु केली. या अंतर्गत २०१६ या वर्षी जिल्ह्यात २ लाख ८४ हजार ४८० वृक्षांची लागवड करण्यात आली होती. त्यानंतर २०१७ मध्ये ७ लाख २२ हजार वृक्षारोपण करण्यात आले होते. त्यानंतर एकाही विभागाने वृक्ष जोपासणीकडे लक्ष दिले नाही.त्यामुळे जिल्ह्यातील वृक्ष लागवडीचा पूरता बोजवारा उडाल्याचे दिसून आले. वनविभागाच्या आकडेवारीनुसार २०१६ मध्ये करण्यात आलेल्या वृक्ष लागवडीतून ६२.६३ टक्के तर २०१७ मध्ये ६३.५८ टक्के झाडे जगल्याचा अहवाल आहे. मात्र प्रत्यक्षात वनविभागाने काढलेल्या टक्केवारी एवढीही झाडे जिल्ह्यात जगली नसल्याचे प्रत्यक्ष पाहणीतून दिसून आले. राज्य शासनाच्या १३ कोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत २०१८ या वर्षासाठी परभणी जिल्ह्याला ३४ लाख १६ हजार वृक्षरोपाचे उद्दिष्ट देण्यात आले होते.यामध्ये महसूल विभागाला २८ हजार, पशूसंवर्धन विभाग २५ हजार ८००, नगरविकास विभाग १ लाख २९ हजार ८००, उद्योग विभाग ६४ हजार, गृह विभाग ११ हजार ५००, कारागृह ३ हजार, सार्वजनिक आरोग्य सेवा ८९ हजार ५००, सार्वजनिक बांधकाम विभाग १८ हजार, ग्रामविकास विभाग ८ लाख १४ हजार ६४, कृषी विभाग २ लाख ४९ हजार १००, वनविभाग ६ लाख २४ हजार, सामाजिक वनीकरण विभाग ५ लाख, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ १ लाख, केंद्रीय रेल्वे विभाग ४५ हजार, कौशल्य विकास उद्योजकता ९ हजार, जिल्ह्यातील ७०४ ग्रामपंचायतींना या वृक्षलागवडी योजनेंतर्गत ७ लाख ६८ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. या ३० विभागांपैकी केंद्रीय रेल्वे विभागाने वृक्ष लागवड केली नाही. उर्वरित २९ विभागाने जिल्ह्याला दिलेले ३४ लाख १६ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करुन २ लाख रोपटे अधिकचे लावण्यात आले.वृक्ष लागवड मोहिमेत एक पाऊल पुढे घेऊन सर्व विभागांनी मोहीम यशस्वी केली; परंतु, वृक्षरोपणानंतर जिल्ह्यात एकही पाऊस झाला नाही.परिणामी लावण्यात आलेल्या रोपट्यांना पाणीच मिळाले नाही. त्यामुळे परभणी तालुक्यातील उजळंबा रस्ता, आर्वी ते कुंभारी, एस.टी. महामंडळ आदी ठिकाणी लावण्यात आलेले रोपे जागेवरच करपली आहेत. त्या अनुषंगाने केलेल्या पाहणीतून जिल्ह्यातील ४ लाख रोपटे पाण्याअभावी जागेवरच करपून गेल्याचे केलेल्या आढळून आले. त्यामुळे यावर्षी जिल्ह्यात राबविलेली वृक्ष लागवड मोहिमेचा पावसाळा संपण्यापूर्वीच फज्जा उडाला असल्याचे दिसत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणीRainपाऊस