शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
2
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य
3
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
4
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!
5
सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट; नांदुरघाटमध्ये दोन गटांत तुफान दगडफेक
6
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
7
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला 
8
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
9
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
10
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
11
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
12
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
13
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
14
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
15
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
16
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
17
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
18
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
19
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
20
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं

परभणी : गतवर्षीचा २६ हजार मे. टन खत शिल्लक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 04, 2019 12:07 AM

जिल्ह्यात खरीप हंगामाचे वेध लागले असून कृषी व्यापाऱ्यांनी खताची आवक सुरु केली आहे. सद्यस्थितीला जिल्ह्यामध्ये २६ हजार ९०० मेट्रिक टन खत साठा उपलब्ध आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यात खरीप हंगामाचे वेध लागले असून कृषी व्यापाऱ्यांनी खताची आवक सुरु केली आहे. सद्यस्थितीला जिल्ह्यामध्ये २६ हजार ९०० मेट्रिक टन खत साठा उपलब्ध आहे.जिल्ह्यामध्ये दोन वर्षांपासून सातत्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने यावर्षी शेतकरी आर्थिक अडचणीत आहे. असे असले तरी खरीप हंगामाची तयारी व्यापाऱ्यांनी सुरु केली आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे साधारणत: ६ महिन्यांपासून मोंढा बाजारपेठ ठप्प आहे. आगामी हंगामात बºयापैकी बाजारपेठेत उलाढाल होईल, या आशेवर खत, बियाणांचा साठा करण्यास सुरुवात केली आहे.पेरणी हंगामासाठी खताची आवश्यकता भासते. जिल्ह्यामध्ये खरीप हंगामात सरासरी ७३ हजार २०० मे.टन खताचा वापर होतो. कृषी विभागाने मागील वर्षी १ लाख ५१ हजार २०० मे.टन खताची मागणी केली होती. त्यात युरिया ६० हजार ५०० मे.टन, एनपीके ५२ हजार ५०० मे.टन, डीएपी २१ हजार ५०० मे.टन आणि एमओपी ५ हजार ७०० मे.टन मागविण्यात आले होते. मात्र त्या तुलनेत केवळ ९० हजार ४४० मे.टनाचे आवंटन मंजूर झाले. त्यात ३३ हजार १०० मे. टन युरिया, १५ हजार ६० मे.टन डीएपी, ७ हजार ४०० मे. टन एसएसपी, ३ हजार ६६० मे. टन एमओपी आणि ३१ हजार २२० मे. टन एनपीके खत जिल्ह्याला मंजूर झाले होते. मागील हंगामातील या खतापैकी २६ हजार ९०० मे. टन खताचा साठा शिल्लक आहे. हा साठा यावर्षीच्या हंगामात वापरला जाणार असून नव्याने खताची आवकही सुरु झाली आहे. त्यामुळे मालवाहू रेल्वेच्या साह्याने दररोज खत परभणीत दाखल होत आहे. त्यामुळे यंदा मूबलक प्रमाणात खत उपलब्ध होईल, अशी अपेक्षा आहे.दुष्काळाचा परिणाम : सहा महिन्यांपासून उलाढाल ठप्पजिल्ह्यात मागील वर्षीच्या खरीप हंगामामध्ये झालेल्या खरेदी- विक्रीनंतर येथील मोंढा बाजारपेठेतील उलाढाल ठप्प पडली आहे. परतीचा पाऊस न झाल्याने रब्बी हंगामात मोंढा बाजारपेठेतील खरेदी- विक्री ठप्प पडली. त्यानंतर साधारणत: ६-७ महिन्यांपासून या बाजारपेठेत उलाढाल झाली नसल्याची स्थिती आहे.आता खरीप हंगाम जवळ येवून ठेपला आहे. त्यामुळे व्यापाºयांनी आतापासूनच तयारी सुरु केली असून खताबरोबरच बियाणे, कीटकनाशकांचा साठा केला जात आहे. खरीप पेरण्यासाठी खरेदी होणार असल्याने या हंगामावर व्यापाºयांच्या आशा लागल्या आहेत.किंमती वाढल्याने शेतकºयांसमोर संकट४मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी खताच्या किंमती वाढल्या आहेत. दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकºयांच्या हाती उत्पन्न मिळाले नाही. परिणामी जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक अडचणीत आहेत. हातात पैसा नसताना खरीप हंगामामध्ये बी-बियाणे आणि पेरणीसाठी लागणारे साहित्य खरेदी करण्याचे नियोजन शेतकºयांना करावे लागणार आहे.४यासाठी पुन्हा एकदा बँकांच्या दारात जावून कर्ज घेऊनच पेरण्या करण्याची वेळ शेतकºयांवर येऊन ठेपली आहे. असे असताना खत कंपन्यांनी मात्र खताच्या किंमती वाढविल्याने शेतकºयांसमोर नवीन संकट उभे टाकले आहे. खताच्या किंमती कमी कराव्यात, अशी मागणी जोर धरत आहे.जिल्ह्यात उपलब्ध खताचा साठा४युरिया ६२००, डीएपी ६५००, एसएसपी १०२००, एमओपी ५००, एनपीके ३५००, एकूण २६९०० मे.टनशेतीच्या मशागतीला सुरुवात४गतवर्षीच्या खरीप हंगामात उत्पन्न न मिळाल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला; परंतु, यावर्षीच्या खरीप हंगामातून काहीसा दिलासा मिळेल, अशी आशा बाळगून मशागतीला सुरुवात झाली आहे.४ट्रॅक्टरद्वारे नांगरणी, पाळी घालणे व रोटाव्हेटरची कामे सध्या सुरु आहेत. पावसाच्या आगमनापर्यंत पेरणीपूर्व मशागतीची कामे उरकून घेण्याकडे शेतकºयांचा कल आहे. त्यामुळे शेतीत पुन्हा एकदा कामे सुरू झाली आहेत.४कडक उन्हामुळे पहाटे ६ ते सकाळी ११ वाजेपर्यंत शेतकरी कामे उरकून घेत आहेत. तसेच सायंकाळी ५ ते ६ या वेळेतही कामे होताना दिसत आहेत. एकंदरित खरीप हंगामासाठी पेरणीपूर्व मशागतीला वेग आला आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरीagricultureशेती