शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
2
ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा ग्रीन सिग्नल? संजय राऊत म्हणतात, “आमची चर्चा झाली आहे...”
3
गणेशोत्सवासाठी मुंबईहून दोन मोफत ट्रेन सुटणार; टाईम टेबल, तिकीटे कधी मिळणार..., नितेश राणेंची घोषणा...
4
Gold Silver Price 13 August 2025: सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, Silver च्या दरात ₹१५३७ ची तेजी; खरेदीपूर्वी पाहा काय आहे नवी किंमत?
5
‘मत चोरी’वरून भाजपाचा काँग्रेसवर प्रतिहल्ला, रायबरेली आणि डायमंड हार्बर येथील उदाहरण देत घेरले   
6
भाजपा विरुद्ध भाजपा लढाईत विरोधी पक्ष बनला 'विजेता'; संसदेत राहुल गांधींनी टाकला डाव, काय घडलं?
7
ईडी चौकशी करत असलेल्या सुरेश रैनाकडे किती संपत्ती? उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत कोणता?
8
भटक्या कुत्र्यांबाबतीत कोर्टाच्या निर्णयाची चर्चा, तिकडे आर्चीने शेअर केला क्युट व्हिडिओ; म्हणाली...
9
जेवढे जन्माला येतायेत, त्यापेक्षा १० लाख जास्त मरतायेत; भारताच्या मित्र देशात 'सायलेंट इमरजंन्सी'!
10
ठाकरे बंधू दादरच्या कबुतरखाना विरोधातील आंदोलनात दिसणार? ‘या’ समितीचे सहभागी होण्याचे आवाहन
11
Jaiprakash associates limited: ₹४ चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणुकदारांच्या उड्या; आता बंद करावं लागलं ट्रेडिंग, अदानींचं जोडलंय नाव
12
चंद्रावर घेऊन जातो...! नासाच्या इंटर्नने चंद्रावरून आणलेला दगड चोरला, बेडखाली ठेवला अन् गर्लफ्रेंडसोबत रोमान्सही केला...
13
Budh Gochar 2025: वक्री गेलेला बुध मार्गी लागला; पुढील दोन वर्षात कोणकोणते लाभ देणार? वाचा!
14
"एकीकडे जवान सीमेवर शहीद होतायत अन् आपण IND vs PAK क्रिकेट..."; हरभजन सिंगचा संताप
15
कुस्तीपटू सुशील कुमारला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, रद्द केला जामीन, कारण काय?
16
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
17
इतका कसला राग? सासूला मारलं अन् १९ तुकडे १९ ठिकाणी फेकले; जावई इतका निर्दयी का झाला?
18
मतचोरीविरोधात वाराणसीत अजब आंदोलन; पराभूत काँग्रेस उमेदवाराच्या नावाने जल्लोष
19
पाकविरुद्ध १२ वर्षांपूर्वी धडाडली होती स्टेन'गन'! Jayden Seales नं वनडेतील तो वर्ल्ड रेकॉर्ड मोडला

परभणी : २० हजार एकरवरील उसाचे क्षेत्र धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2018 23:51 IST

पावसाच्या खंडामुळे खरिपातील पिके हातची गेली असतानाच ज्या उसावर शेतकऱ्यांच्या आशा होत्या, त्यालाही हुमणी अळीने घेरले आहे. त्यामुळे पाथरी तालुक्यातील २० हजार एकरवरील उसाच्या उत्पादनात मोठी घट होणार असल्याने शेतकºयांना मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपाथरी: पावसाच्या खंडामुळे खरिपातील पिके हातची गेली असतानाच ज्या उसावर शेतकऱ्यांच्या आशा होत्या, त्यालाही हुमणी अळीने घेरले आहे. त्यामुळे पाथरी तालुक्यातील २० हजार एकरवरील उसाच्या उत्पादनात मोठी घट होणार असल्याने शेतकºयांना मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.पश्चिम महाराष्ट्रात उसाच्या पिकावर हुमणी अळीचा झालेला प्रादुर्भाव आता मराठवाड्यातही दिसू लागला आहे. या अळीमुळे उसाचे फड अक्षरश: करपून जात आहेत. पाथरी तालुक्यात यावर्षी शेतकºयांनी मोठ्या प्रमाणावर उसाचे क्षेत्र वाढविले आहे. खरिपातील पिकांनी पावसाअभावी शेतकºयांना चांगलेच अडचणीत आणले आहे. दीड महिन्यापासून पावसाने खंड दिला. परतीच्या पावसावर शेतकºयांची अपेक्षा होती. मात्र परतीचा पाऊसही शेतकºयांवर रुसला. त्यामुळे शेतकरी अधिकच अडचणीत सापडला. मूग, सोयाबीनच्या उताºयात मोठी घट दिसून येत आहे. कापसाने पाण्याअभावी माना टाकल्या आहेत. एकदा कापसाची वेचणी झाली की, तो कापूस केवळ पºहाटीपुरता उभा असल्याचे दिसून येत आहे. दरवर्षी खरीप पिकावर येणारे संकट पाहता या भागातील शेतकºयांनी यावर्षी सिंचनाची सोय असल्याने मोठ्या प्रमाणावर उसाची लागवड केली आहे. बारा महिने पाणी, खत, निंदणी यासाठी मोठा खर्चही लागतो आणि तो ऊस उत्पादकांनी केला. अशा परिस्थितीत उसावर हुमणी अळीचे संकट निर्माण झाले आहे. हुमणी अळीमुळे जमिनीतूनच ऊस करपत आहे. एकदा उसाला हुमणी लागली ही अक्षरश: उसाचा संपूर्ण फड अळीच्या प्रादुर्भावात येत आहे. हुमणी अळीवर नियंत्रण आणणे सध्या तरी शक्य होत नाही. उसाचे फड अक्षरश: पोखरले जात आहेत.तालुक्यातील रेणापूर शिवारात जवळपास १ हजार एकर क्षेत्रावर ऊस लागवड झाली आहे. रेणापूर भागातील उसावर गेल्या महिनाभरापासून हुमनीचा प्रादूर्भाव दिसून येत आहे.उभ्या उसातील २५ टक्के क्षेत्र हुमणीच्या प्रादुर्भावात आले आहे. ऊस पीक हुमणीमुळे करपून जाऊ लागले आहे. त्याचा फटका शेतकºयांना सहन करावा लागत आहे.उताºयात होणार घटपाथरी तालुक्यात रेणापूर, हादगाव, रेणाखळी, सिमूरगव्हाण, कासापुरी, पाथरगव्हाण या भागात उसाचे क्षेत्र अधिक आहे. शेतकºयांना दरवर्षी एकरी सरासरी ४० ते ५० मे.टन उतारा येतो. मात्र हुमनी अळीच्या संकटाने उत्पादनात घट होऊन ३० ते ३५ मे.टनच उतारा येईल, असा अंदाज ऊस उत्पादकांतून बांधला जात आहे.नुकसान भरपाई देण्याची मागणीखरीपातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अगोदरच शेतकरी अडचणीत सापडला असताना आता उसावर हुमनी अळीचा मोठा प्रादूर्भाव झाल्याने ऊस उत्पादकांच्या अडचणीत भर पडली आहे. प्रादूर्भावग्रस्त पिकाचे सर्व्हेक्षण करुन नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी शेतकºयांतून होत आहे.अतिरिक्त उसाचा प्रश्नही भेडसावणारपाथरी तालुक्यात दोन खाजगी साखर कारखाने आहेत. पाथरी रेणुका शुगर्स व लिंबा येथील योगेश्वरी या दोन्ही कारखान्याचे गळीत हंगाम येत्या महिनाभरात सुरु होतील. या कारखाना क्षेत्रात अपेक्षेपेक्षा अधिक ऊस उपलब्ध आहे. त्यामुळे हुमनी अळीमुळे संकटात सापडलेल्या ऊस उत्पादकांना अतिरिक्त उसाचा प्रश्न भेडसावणार आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरीRainपाऊसIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प