शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : २० हजार एकरवरील उसाचे क्षेत्र धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2018 23:51 IST

पावसाच्या खंडामुळे खरिपातील पिके हातची गेली असतानाच ज्या उसावर शेतकऱ्यांच्या आशा होत्या, त्यालाही हुमणी अळीने घेरले आहे. त्यामुळे पाथरी तालुक्यातील २० हजार एकरवरील उसाच्या उत्पादनात मोठी घट होणार असल्याने शेतकºयांना मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपाथरी: पावसाच्या खंडामुळे खरिपातील पिके हातची गेली असतानाच ज्या उसावर शेतकऱ्यांच्या आशा होत्या, त्यालाही हुमणी अळीने घेरले आहे. त्यामुळे पाथरी तालुक्यातील २० हजार एकरवरील उसाच्या उत्पादनात मोठी घट होणार असल्याने शेतकºयांना मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.पश्चिम महाराष्ट्रात उसाच्या पिकावर हुमणी अळीचा झालेला प्रादुर्भाव आता मराठवाड्यातही दिसू लागला आहे. या अळीमुळे उसाचे फड अक्षरश: करपून जात आहेत. पाथरी तालुक्यात यावर्षी शेतकºयांनी मोठ्या प्रमाणावर उसाचे क्षेत्र वाढविले आहे. खरिपातील पिकांनी पावसाअभावी शेतकºयांना चांगलेच अडचणीत आणले आहे. दीड महिन्यापासून पावसाने खंड दिला. परतीच्या पावसावर शेतकºयांची अपेक्षा होती. मात्र परतीचा पाऊसही शेतकºयांवर रुसला. त्यामुळे शेतकरी अधिकच अडचणीत सापडला. मूग, सोयाबीनच्या उताºयात मोठी घट दिसून येत आहे. कापसाने पाण्याअभावी माना टाकल्या आहेत. एकदा कापसाची वेचणी झाली की, तो कापूस केवळ पºहाटीपुरता उभा असल्याचे दिसून येत आहे. दरवर्षी खरीप पिकावर येणारे संकट पाहता या भागातील शेतकºयांनी यावर्षी सिंचनाची सोय असल्याने मोठ्या प्रमाणावर उसाची लागवड केली आहे. बारा महिने पाणी, खत, निंदणी यासाठी मोठा खर्चही लागतो आणि तो ऊस उत्पादकांनी केला. अशा परिस्थितीत उसावर हुमणी अळीचे संकट निर्माण झाले आहे. हुमणी अळीमुळे जमिनीतूनच ऊस करपत आहे. एकदा उसाला हुमणी लागली ही अक्षरश: उसाचा संपूर्ण फड अळीच्या प्रादुर्भावात येत आहे. हुमणी अळीवर नियंत्रण आणणे सध्या तरी शक्य होत नाही. उसाचे फड अक्षरश: पोखरले जात आहेत.तालुक्यातील रेणापूर शिवारात जवळपास १ हजार एकर क्षेत्रावर ऊस लागवड झाली आहे. रेणापूर भागातील उसावर गेल्या महिनाभरापासून हुमनीचा प्रादूर्भाव दिसून येत आहे.उभ्या उसातील २५ टक्के क्षेत्र हुमणीच्या प्रादुर्भावात आले आहे. ऊस पीक हुमणीमुळे करपून जाऊ लागले आहे. त्याचा फटका शेतकºयांना सहन करावा लागत आहे.उताºयात होणार घटपाथरी तालुक्यात रेणापूर, हादगाव, रेणाखळी, सिमूरगव्हाण, कासापुरी, पाथरगव्हाण या भागात उसाचे क्षेत्र अधिक आहे. शेतकºयांना दरवर्षी एकरी सरासरी ४० ते ५० मे.टन उतारा येतो. मात्र हुमनी अळीच्या संकटाने उत्पादनात घट होऊन ३० ते ३५ मे.टनच उतारा येईल, असा अंदाज ऊस उत्पादकांतून बांधला जात आहे.नुकसान भरपाई देण्याची मागणीखरीपातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अगोदरच शेतकरी अडचणीत सापडला असताना आता उसावर हुमनी अळीचा मोठा प्रादूर्भाव झाल्याने ऊस उत्पादकांच्या अडचणीत भर पडली आहे. प्रादूर्भावग्रस्त पिकाचे सर्व्हेक्षण करुन नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी शेतकºयांतून होत आहे.अतिरिक्त उसाचा प्रश्नही भेडसावणारपाथरी तालुक्यात दोन खाजगी साखर कारखाने आहेत. पाथरी रेणुका शुगर्स व लिंबा येथील योगेश्वरी या दोन्ही कारखान्याचे गळीत हंगाम येत्या महिनाभरात सुरु होतील. या कारखाना क्षेत्रात अपेक्षेपेक्षा अधिक ऊस उपलब्ध आहे. त्यामुळे हुमनी अळीमुळे संकटात सापडलेल्या ऊस उत्पादकांना अतिरिक्त उसाचा प्रश्न भेडसावणार आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरीRainपाऊसIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प