शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
3
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
4
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
5
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
6
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
7
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
8
काँग्रेस ५० टक्के आरक्षणाची मर्यादा हटवेल, दलित आणि मागासवर्गीयांचा कोटा वाढवेल: राहुल गांधी
9
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
10
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
11
"असं असेल तर MS Dhoni ने खेळूच नये..."; Harbhajan Singh भडकला, CSK vs PBKS सामन्यानंतर व्यक्त केला संताप
12
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
13
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
14
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
15
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
16
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
17
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...
18
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
19
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला किती मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी सांगितला आकडा
20
Closing Bell: सेन्सेक्स किंचित तेजीसह तर, निफ्टी घसरणीसह बंद; टायटनमध्ये मोठी घसरण, IT शेअर्स चमकले

परभणी : सिंचन विहिरींवर २३५ कोटी खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2019 11:44 PM

शेतकऱ्यांना सिंचनाच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून ११ वर्षांमध्ये सिंचन विहिरींवर २३५ कोटी ४५ लाख ८५ हजार रुपयांचा खर्च करून ८ हजार २९७ सिंचन विहिरींची उभारणी करण्यात आली आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शेतकऱ्यांना सिंचनाच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून ११ वर्षांमध्ये सिंचन विहिरींवर २३५ कोटी ४५ लाख ८५ हजार रुपयांचा खर्च करून ८ हजार २९७ सिंचन विहिरींची उभारणी करण्यात आली आहे़कोरडवाहू शेतीमुळे शेतकऱ्यांना पीक उत्पादन घेताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असे़ पावसाच्या भरोस्यावर राहून पिके घेताना अनेक वेळा नुकसानही सहन करावे लागत होते़ त्यामुळे शेतकºयांना हक्काची सिंचनाची सुविधा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने शेतशिवारात सिंचन विहीर घेण्यासाठी राज्य शासनाने २००८ मध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत सिंचन विहिरीसाठी अनुदान देऊ केले़ रोहयोच्या माध्यमातून शेतकºयांनी विहिरीचा प्रस्ताव दाखल केल्यानंतर टप्प्या टप्प्याने अनुदानाची उपलब्ध करून देत कोरडवाहू शेती विहिरीच्या माध्यमातून सिंचनाची सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे़ या योजनेला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला़ अनेक कोरडवाहू व अल्पभूधारक शेतकºयांनी योजनेचा लाभ घेत शेतीला बागायती स्वरुपही दिले आहे़ सिंचन विहिरीमुळे पिकांच्या पाण्याचा प्रश्न काही अंशी मिटला़ परिणामी शेतकºयांच्या उत्पन्नातही वाढ होण्यास मदत झाली आहे़ रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून शेतकºयांसाठी जिल्ह्यात ही योजना रावविली जाते़ २००८ ते २०१९ या ११ वर्षांच्या काळात परभणी जिल्ह्यामधून १४ हजार २९३ सिंचन विहिरींच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली़ त्यापैकी ८ हजार २९७ विहिरींची कामे पूर्ण झाली असून, २ हजार ८३८ कामे सद्यस्थितीला सुरु आहेत़ सिंचन विहिरींचे काम करीत असताना कुशल आणि अकुशल या दोन प्रकारांमध्ये लाभार्थ्यांना अनुदानाचे वितरण केले जाते़ कुशलमध्ये मजुरांचे देयके दिली जातात तर अकुशल कामात विहीर बांधकामासाठी लागणारा खर्च लाभार्थ्यांना वितरित केला जातो़ ११ वर्षांच्या या काळामध्ये मजुरांच्या वेतनावर १३२ कोटी ४३ लाख ६१ हजार रुपयांचा खर्च झाला आहे़ तर प्रत्यक्ष बांधकामासाठी १०३ कोटी २ लाख २४ हजार रुपयांचा खर्च करण्यात आला आहे़ ८ हजार २९७ विहिरींचे बांधकाम करण्यासाठी जिल्ह्यात २३५ कोटी ४५ लाख ८५ हजार रुपयांचा खर्च करण्यात आला़ त्यामुळे सिंचन विहिरींच्या माध्यमातून शेतीला हक्काचे आणि शाश्वत पाणी उपलब्ध होण्याची संधी मिळाली आहे़ अनेक शेतकºयांनी या योजनेच्या माध्यमातून शेती सिंचनाखाली आणली आहे़ या पुढेही अनेक प्रस्ताव रोहयो विभागाकडे असून, या प्रस्तावांनाही मंजुरी देवून सिंचन विहिरींची कामे घेतली जात आहेत़गंगाखेड तालुक्यात सर्वाधिक सिंचन विहिरीच्११ वर्षांतील सिंचन विहिरींच्या कामकाजाचा आढावा घेतला असता गंगाखेड तालुक्यात शेतकºयांनी या योजनेचा सर्वाधिक लाभ घेतला आहे़ या तालुक्यात आतापर्यंत २ हजार ८०३ प्रस्ताव प्रशासनाकडे प्राप्त झाले होते़च्त्यापैकी १ हजार ७७५ विहिरींची कामे पूर्ण झाली आहेत़ त्या खालोखाल जिंतूर तालुक्यात १ हजार ४२७, सेलू तालुक्यात १ हजार २१४, पूर्णा १ हजार ११८, पालम ९६१, मानवत ७००, परभणी ६११, पाथरी २६३ आणि सोनपेठ तालुक्यामध्ये २२८ सिंचन विहिरी बांधण्यात आल्या आहेत़च्गंगाखेड तालुक्यामध्ये सिंचन विहिरींवर आतापर्यंत ५४ कोटी १४ लाख रुपयांचा खर्च झाला असून, पूर्णा तालुक्यात ६७ कोटी ६६ लाख, सेलू ३६ कोटी ३० लाख, पालम २४ कोटी ४० लाख, जिंतूर ३३ कोटी ४१ लाख, मानवत १७ कोटी १८ लाख, परभणी १६ कोटी ४३ लाख आणि सोनपेठ तालुक्यात ७ कोटी २९ लाख ३३ हजार रुपयांचा खर्च या योजनेवर झाला आहे़३ हजार प्रस्तावांना मंजुरीया आर्थिक वर्षात रोजगार हमी योजनेकडे एकूण दाखल झालेल्या प्रस्तावांपैकी ३ हजार १५८ प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे़ त्यात गंगाखेड तालुक्यात ३२२, जिंतूर ८९५, मानवत २०२, पालम १८७, परभणी १२०, पाथरी ५४, पूर्णा ४५८, सेलू ४०२ आणि सोनपेठ तालुक्यामध्ये ५१८ प्रस्तावांना मंजुरी दिली असून, या सिंचन विहिरींची कामे सध्या सुरू आहेत़ या वर्षभरात एकूण २६८ सिंचन विहिरी बांधून पूर्ण झाल्या आहेत़ त्यामध्ये परभणी तालुक्यात सर्वाधिक ८५ विहिरींची कामे पूर्ण करण्यात आली आहे़ पूर्णा तालुक्यात ५५, पालम ४५, सेलू २८, मानवत २१, गंगाखेड २०, पाथरी १३ आणि जिंतूर तालुक्यात एका सिंचन विहिरीचे काम पूर्ण झाले आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरीIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पGovernmentसरकार