शहरं
Join us  
Trending Stories
1
जे शिंदेंना मिळालं नाही ते नितीश कुमारांना मिळणार; बिहारमध्ये पुन्हा CM पद, फॉर्म्युला ठरला
2
Accident: राज्यात नऊ महिन्यांत ११ हजार ५३२ मृत्यू; मुंबईत सर्वाधिक अपघात, 'हे' ठिकाण अत्यंत धोकादायक!
3
ट्रम्प यांचा यु-टर्न! अमेरिकेच्या 'या' निर्णयानं भारताला होणार २६ हजार कोटींचा फायदा, 'यांना' मिळणार मोठा लाभ
4
सौदीचे प्रिन्स ७ वर्षानंतर अमेरिका दौऱ्यावर, ट्रम्प यांचा आनंद गगनात मावेना, कारणही आहे खास
5
Chandrayaan 4: भारत चंद्रावर जाणार; तेथील नमुने पृथ्वीवर आणणार, चांद्रयान-४ मोहिमेला सरकारची मंजुरी
6
पत्नीच्या नावे पोस्टाच्या ‘या’ स्कीममध्ये उघडा खातं; दर महिन्याला ₹९२५० चं मिळेल व्याज
7
Mumbai: मिरा-भाईंदर मेट्रो ९ च्या कामावर भीषण अपघात; ६० फुटांवरून पडून सुपरवायझरचा मृत्यू!
8
GenZ च्या आंदोलनामुळे हादरलेल्या नेपाळमध्ये अखेर निवडणुकांची घोषणा, मार्च महिन्यात मतदान
9
"आईला कदाचित फाशीची शिक्षा देतील, पण लक्षात ठेवा..."; शेख हसीना यांच्या मुलाचा गंभीर इशारा
10
Lalu Yadav: राजदच्या पराभवानंतर लालू यांच्या घरात फूट; मुलींनी सोडले घर, तेजस्वी यादव यांच्यावर आरोप
11
BMC Elections: मनसेमुळे मुंबईत महाविकास आघाडी फुटीच्या उंबरठ्यावर, नेमकं कारण काय? 
12
पालघर साधू हत्याकांडात ज्यांच्यावर गंभीर आरोप केले, त्यांनाच भाजपाने दिला पक्षात प्रवेश
13
पाकिस्तानात जाफर एक्सप्रेस पुन्हा टार्गेटवर; बॉम्बस्फोटाने रेल्वे ट्रॅक उद्ध्वस्त, अनर्थ टळला
14
शेख हसीना यांच्या खटल्याच्या निकालाआधी बांगलादेशात हिंसाचार, पोलिसांकडून आंदोलकांवर गोळीबार
15
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२५, या राशीसाठी धनलाभाच्या दृष्टीने शुभ दिवस, प्रवास संभवतात
16
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
17
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
18
विशेष लेख: भीती, घाबरणे, घाबरवणे... आणि कधीही न घाबरणे !
19
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
20
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
Daily Top 2Weekly Top 5

परभणी: २ महिन्यात १५ बैलजोड्यांची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2019 00:42 IST

जिंतूर तालुक्यातील बोरी येथील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दहा खेड्यातून दोन महिन्यात पंधरा बैलजोडी चोरी गेल्याच्या घटना घडल्या आहेत. याबाबतची नोंद पोलीस ठाण्यात आहे; परंतु, पोलीस प्रशासनाच्या उदासिन भूमिकेमुळे चोरट्यांचा थांगपत्ता लागत नसल्याने बोरी ग्रामस्थांनी नुकतीच पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांची भेट घेऊन चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली.

लोकमत न्यूज नेटवर्कबोरी (परभणी) : जिंतूर तालुक्यातील बोरी येथील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दहा खेड्यातून दोन महिन्यात पंधरा बैलजोडी चोरी गेल्याच्या घटना घडल्या आहेत. याबाबतची नोंद पोलीस ठाण्यात आहे; परंतु, पोलीस प्रशासनाच्या उदासिन भूमिकेमुळे चोरट्यांचा थांगपत्ता लागत नसल्याने बोरी ग्रामस्थांनी नुकतीच पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांची भेट घेऊन चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली.जिंंतूर तालुक्यातील बोरी येथे मोठी बाजारपेठ आहे. या बाजारपेठेला परिसरातील २५ ते ३० खेडे जोडली गेली आहेत. त्यामुळे जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने अनुचित प्रकार टाळण्यासाठी बोरी येथे पोलीस ठाण्याची निर्मिती केली; परंतु, पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांच्या उदासिन भूमिकेचा फटका ग्रामस्थांना बसत आहे. बोरी पोलीस ठाण्यांतर्गत येणाºया कौसडी, रोहिला पिंपरी, कोक, गोंधळा, कान्हड, बोरी, माक, हट्टा येथील शेत आखाड्यावरून गेल्या दोन महिन्यांपासून पंधरा बैलजोड्या चोरीला गेल्याच्या घटना घडल्या आहेत. विशेष म्हणजे कोक येथील बैलजोडी चोरी प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एका आरोपीस पकडून बोरी पोलिसांच्या स्वाधीन केले होते. त्या आरोपीने बैलजोडी चोरी केल्याचे कबूलही केले; परंतु, अद्यापपर्यंत त्या आरोपीकडून बैल कोणाला विकले ? याबाबत पोलिसांना उलगडा करण्यात यश आलेले नाही. त्यानंतर पुन्हा तीन बैलजोडी चोरीच्या घटना घडल्या. यामध्ये कुपटा, पिंपळगाव गायके या ठिकाणी तर चोरट्यांनी धुमाकूळ घातला होता.गेल्या दोन महिन्यात पंधरा बैलजोडी बोरी पोलीस ठाण्यांतर्गत येणाºया कार्यक्षेत्रातील चोरीला गेल्या आहेत. पशुपालकांनी पोलीस ठाण्याकडे धाव घेऊन आपली कैफियत मांडली आहे; परंतु, पोलीस प्रशासनाच्या तपास कामात होणाºया हलगर्जीपणामुळे पशूपालक शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.पशूपालकांचे पोलीस अधीक्षकांना साकडेबोरी पोलीस ठाण्यांतर्गत दिवसेंदिवस बैल चोरीच्या घटनेत वाढ होत आहे; परंतु, स्थानिक पोलीस प्रशासनाकडूून कोणतीही ठोस पावले उचलण्यात येत नाहीत. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडलेल्या आरोपीने गुन्हा कबूल करूनही पुढील तपास होत नाही. त्यामुळे पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांनी याकडे लक्ष देऊन बैलजोडी चोरांचा बंदोबस्त करावा व पशूपालकांना भयमुक्त करावे, अशी मागणी एका निवेदनाद्वारे पोलीस अधीक्षकांकडे केली आहे. निवेदनावर गणेशराव बहिरट, दीपक बहिरट, विष्णू बहिरट, राजेभाऊ लेंगुळे, सुदाम बहिरट, मधुकर बहिरट, आश्रोबा बहिरट, बाळासाहेब बहिरट, सोपान इक्कर आदींच्या स्वाक्षºया आहेत.गावातही घडले चोरीचे प्रकारज्या गावात पोलीस ठाणे आहे, त्या गावातील ग्रामस्थ निर्धास्त असतात, असे म्हटले जाते; परंतु, जिंतूर तालुक्यातील बोरी येथील पोलीस ठाणे अपवादात्मक ठरत आहे. गेल्या आठवड्यात बोरी येथील प्रभाकर शिंपले यांच्या घरासमोर बांधलेली बैलजोडी चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली. या घटनेला आठवडाभराचा कालावधी उलटून गेला आहे; परंतु, अद्यापही पोलिसांना चोरट्यांचा सुगावा लागलेला नाही.

टॅग्स :parabhaniपरभणीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस