शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
2
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
3
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
4
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
5
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
6
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
7
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
8
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
9
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
10
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
11
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
12
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
13
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...
14
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
15
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
16
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
17
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
18
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
19
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
20
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन

परभणी: २ महिन्यात १५ बैलजोड्यांची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2019 00:42 IST

जिंतूर तालुक्यातील बोरी येथील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दहा खेड्यातून दोन महिन्यात पंधरा बैलजोडी चोरी गेल्याच्या घटना घडल्या आहेत. याबाबतची नोंद पोलीस ठाण्यात आहे; परंतु, पोलीस प्रशासनाच्या उदासिन भूमिकेमुळे चोरट्यांचा थांगपत्ता लागत नसल्याने बोरी ग्रामस्थांनी नुकतीच पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांची भेट घेऊन चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली.

लोकमत न्यूज नेटवर्कबोरी (परभणी) : जिंतूर तालुक्यातील बोरी येथील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दहा खेड्यातून दोन महिन्यात पंधरा बैलजोडी चोरी गेल्याच्या घटना घडल्या आहेत. याबाबतची नोंद पोलीस ठाण्यात आहे; परंतु, पोलीस प्रशासनाच्या उदासिन भूमिकेमुळे चोरट्यांचा थांगपत्ता लागत नसल्याने बोरी ग्रामस्थांनी नुकतीच पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांची भेट घेऊन चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली.जिंंतूर तालुक्यातील बोरी येथे मोठी बाजारपेठ आहे. या बाजारपेठेला परिसरातील २५ ते ३० खेडे जोडली गेली आहेत. त्यामुळे जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने अनुचित प्रकार टाळण्यासाठी बोरी येथे पोलीस ठाण्याची निर्मिती केली; परंतु, पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांच्या उदासिन भूमिकेचा फटका ग्रामस्थांना बसत आहे. बोरी पोलीस ठाण्यांतर्गत येणाºया कौसडी, रोहिला पिंपरी, कोक, गोंधळा, कान्हड, बोरी, माक, हट्टा येथील शेत आखाड्यावरून गेल्या दोन महिन्यांपासून पंधरा बैलजोड्या चोरीला गेल्याच्या घटना घडल्या आहेत. विशेष म्हणजे कोक येथील बैलजोडी चोरी प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एका आरोपीस पकडून बोरी पोलिसांच्या स्वाधीन केले होते. त्या आरोपीने बैलजोडी चोरी केल्याचे कबूलही केले; परंतु, अद्यापपर्यंत त्या आरोपीकडून बैल कोणाला विकले ? याबाबत पोलिसांना उलगडा करण्यात यश आलेले नाही. त्यानंतर पुन्हा तीन बैलजोडी चोरीच्या घटना घडल्या. यामध्ये कुपटा, पिंपळगाव गायके या ठिकाणी तर चोरट्यांनी धुमाकूळ घातला होता.गेल्या दोन महिन्यात पंधरा बैलजोडी बोरी पोलीस ठाण्यांतर्गत येणाºया कार्यक्षेत्रातील चोरीला गेल्या आहेत. पशुपालकांनी पोलीस ठाण्याकडे धाव घेऊन आपली कैफियत मांडली आहे; परंतु, पोलीस प्रशासनाच्या तपास कामात होणाºया हलगर्जीपणामुळे पशूपालक शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.पशूपालकांचे पोलीस अधीक्षकांना साकडेबोरी पोलीस ठाण्यांतर्गत दिवसेंदिवस बैल चोरीच्या घटनेत वाढ होत आहे; परंतु, स्थानिक पोलीस प्रशासनाकडूून कोणतीही ठोस पावले उचलण्यात येत नाहीत. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडलेल्या आरोपीने गुन्हा कबूल करूनही पुढील तपास होत नाही. त्यामुळे पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांनी याकडे लक्ष देऊन बैलजोडी चोरांचा बंदोबस्त करावा व पशूपालकांना भयमुक्त करावे, अशी मागणी एका निवेदनाद्वारे पोलीस अधीक्षकांकडे केली आहे. निवेदनावर गणेशराव बहिरट, दीपक बहिरट, विष्णू बहिरट, राजेभाऊ लेंगुळे, सुदाम बहिरट, मधुकर बहिरट, आश्रोबा बहिरट, बाळासाहेब बहिरट, सोपान इक्कर आदींच्या स्वाक्षºया आहेत.गावातही घडले चोरीचे प्रकारज्या गावात पोलीस ठाणे आहे, त्या गावातील ग्रामस्थ निर्धास्त असतात, असे म्हटले जाते; परंतु, जिंतूर तालुक्यातील बोरी येथील पोलीस ठाणे अपवादात्मक ठरत आहे. गेल्या आठवड्यात बोरी येथील प्रभाकर शिंपले यांच्या घरासमोर बांधलेली बैलजोडी चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली. या घटनेला आठवडाभराचा कालावधी उलटून गेला आहे; परंतु, अद्यापही पोलिसांना चोरट्यांचा सुगावा लागलेला नाही.

टॅग्स :parabhaniपरभणीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस