शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

परभणी : तब्बल दहा लाख झाडे वाळली !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 01:12 IST

यावर्षीच्या जून महिन्यात प्रशासनाने राबविलेल्या वृक्ष लागवड मोहिमेअंतर्गत लावलेल्या ३५ लाख ३५ हजार झाडांपैकी तब्बल १० लाख झाडे जळून गेली आहेत. वृक्षारोपण केल्यानंतर या झाडांना पाणी मिळाले नसल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : यावर्षीच्या जून महिन्यात प्रशासनाने राबविलेल्या वृक्ष लागवड मोहिमेअंतर्गत लावलेल्या ३५ लाख ३५ हजार झाडांपैकी तब्बल १० लाख झाडे जळून गेली आहेत. वृक्षारोपण केल्यानंतर या झाडांना पाणी मिळाले नसल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे.पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी राज्य शासनाकडून दरवर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीलाच वृक्षारोपण मोहीम राबविली जाते. यावर्षी १ ते ३१ जुलै या काळात जिल्हाभरात ही मोहीम राबविण्यात आली. विशेष म्हणजे, वृक्षारोपण करण्यासाठी प्रशासनातील सर्व विभागांना उद्दिष्टही निश्चित करुन दिले जाते. वेगवेगळ्या विभागांनी शासनाच्या सूचनेप्रमाणे जिल्ह्यात वृक्षारोपणास सुरुवात केली. रस्त्यांच्या दोन्ही बाजूंनी तसेच मोकळ्या जागा, खेळाची मैदाने, उद्याने, शासकीय कार्यालयांचा परिसर, गायरान जमिनी, वनक्षेत्र अशा ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. पावसाळ्याच्या सुरुवातीला चांगला पाऊस झाल्याने यावर्षी लावलेल्या झाडांची वाढ होईल, अशी अपेक्षा होती; परंतु, पावसाने ताण दिला. मोसमी पाऊसही वेळेवर बसरला नाही आणि परतीचा पाऊस फिरकलाच नाही. त्यामुळे लावलेली झाडे कोमेजू लागली. कोवळ्या रोपट्यांचे रोपण करण्यात आले; परंतु, जमिनीतील पाणीपातळी दिवसेंदिवस खालावल्याने एक-एक करीत ही झाडे जळू लागली.जिल्ह्यामध्ये ३५ लाख ३५ हजार झाडे लावण्यात आली आहेत. जिल्हा प्रशासनाला ३४ लाख झाडे लावण्याचे उद्दिष्ट दिले होते. त्यापैकी वनविभागाने ७ लाख झाडे लावली. ग्रामपंचायतींनी १२ लाख वृक्षारोपण केले. तर प्रशासनाच्या इतर २२ विभागाने सुमारे १६ लाख झाडे लावली आहेत; परंतु, निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे यावर्षी देखील झाडे जळू लागली आहेत.काही झाडांचे अस्तित्वही नाहीसे झाले आहे. त्यामुळे वृक्षारोपण मोहीम राबवूनही यावर्षी मोहिमेचा फारसा परिणाम होणार नसल्याचे दिसत आहे.दुष्काळाबरोबरच : दुर्लक्षही भोवले४परभणी जिल्ह्यामध्ये दरवर्षी वृक्षारोपण मोहीम थाटात राबविली जाते. झाडे लावताना अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांचाही मोठा उत्साह असतो. प्रत्येक ठिकाणी झाड लावल्यानंतर छायाचित्र काढून घेतले जातात. मात्र हा उत्साह तेवढ्या दिवसापुरता टिकतो. त्यानंतर लावलेल्या झाडांकडे साधे लक्षही दिले जात नाही. काही शाळा, शासकीय कार्यालयांचा अपवाद वगळता बहुतांश झाडे संवर्धनाअभावीच जळून जातात, हा यापूर्वीचाच अनुभव यावर्षीही दिसून आला. विशेष म्हणजे, त्यात भर पडली ती दुष्काळाची. जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला नसल्याने पाणीटंचाई निर्माण झाली आहे. भूजलपातळीही मोठ्या प्रमाणात घटली असून त्याचा फटका वृक्षारोपण मोहिमेला बसला आहे.वनविभागाची ८२ टक्के झाडे जगलीवनविभागाने यावर्षी ७ लाख झाडे लावण्याचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे. जिंतूर तालुक्यातील वनक्षेत्र भागात ही झाडे लावली असून या झाडांपैकी सुमारे ८२ टक्के झाडे आजही तग धरुन आहेत, असाही दावा या विभागाच्या अधिकाऱ्यांनी लावला आहे. लावलेली झाडे जगविण्यासाठी कर्मचाºयांची नियुक्ती करण्यात आली असून हे कर्मचारी झाडांना नियमित पाणी देतात. परिणामी, ही झाडे जगली असल्याची माहिती उपविभागीय वन अधिकारी विजय सातपुते यांनी सांगितले.पाणी देण्याचे नियोजन४जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे नवीन रोपे जळत आहेत. या रोपांना वाचविण्यासाठी आम्ही प्रत्येक रोपाला मल्चिंग करणार आहोत. तसेच पाण्याची उपलब्धता कमी असल्याने प्लास्टिकच्या बाटल्या झाडांना बांधून त्याद्वारे पाणी देण्याचेही नियोजन करण्यात आले आहे. जास्तीत जास्त झाडे जगावीत, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे उपविभागीय वन अधिकारी विजय सातपुते यांनी सांगितले.परिसर झाला ओसाड४परभणी तालुक्यातील टाकळी कुंभकर्ण ते कुंभारी बाजार आणि उमरी फाटा ते उमरी या भागात रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात झाडे लावली होती. दोन महिन्यांपासून पाऊस झाला नसल्याने या दोन्ही मार्गावरील झाडे वाळून गेली आहेत. या ठिकाणी आता झाडांसाठी तयार केलेले खड्डे तेवढे शिल्लक आहेत.

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणी