शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
3
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
4
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
5
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
6
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
7
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
8
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
9
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
10
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
11
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
12
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
13
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
14
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
15
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
16
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
17
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
18
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
19
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
20
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी

परभणी : १ लाख मे.टन अतिरिक्त चाऱ्याचे केले नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2019 23:35 IST

जिल्ह्यात सध्या दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे ४ लाख २४ हजार ४०४ जनावरांना नऊ महिने चारा पुरेल यासाठी २० जुलै २०१९ पर्यंत ६ लाख ८७ हजार ५३७ मे.टन चारा उपलब्ध होणार आहे. त्याच बरोबर जिल्ह्यात चाºयाची टंचाई भासू नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने १ लाख मे.टन अतिरिक्त चाºयाचे नियोजन केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यात सध्या दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे ४ लाख २४ हजार ४०४ जनावरांना नऊ महिने चारा पुरेल यासाठी २० जुलै २०१९ पर्यंत ६ लाख ८७ हजार ५३७ मे.टन चारा उपलब्ध होणार आहे. त्याच बरोबर जिल्ह्यात चाºयाची टंचाई भासू नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने १ लाख मे.टन अतिरिक्त चाºयाचे नियोजन केले आहे.यावर्षी जिल्ह्यात जून व जुलै हे दोन महिने सोडले तर समाधानकारक पाऊस झाला नाही. त्यामुळे खरीप हंगामात शेतकºयांना चारा पिके घेता आली नाहीत. त्याच बरोबर परतीच्या पावसानेही पाठ फिरविल्याने रबी हंगामातही पेरणी झाली नाही. परिणामी शेतकºयांकडे जनावरांसाठी चाराच उपलब्ध झाला नाही.जिल्ह्यातून वाहणाºया दुधना, गोदावरी, पूर्णा, करपरा, लेंडी आदी नद्यांना पाणी उपलब्ध नसल्याने नदीकाठावरील शेतकरीही यावर्षी पेरता झाला नाही. त्यामुळे जिल्ह्यात जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच पाणी व चारा टंचाईच्या झळा पशुपालकांना बसत असल्याचे दिसून येत आहे.जिल्ह्यामध्ये ४ लाख २४ हजार ४०४ एकूण पशूधन उपलब्ध आहे. त्यामध्ये ३ लाख ६२ हजार ७९३ मोठ्या जनावरांची संख्या आहे. ९१ हजार ३१० लहान जनावरांची संख्या आहे. तर १ लाख ५९ हजार ५५९ शेळ्या-मेंढ्यांची जिल्ह्यात संख्या आहे. एका पशूधनास दररोज ६ किलो प्रमाणे चारा लागतो. त्यामुळे दिवसाकाठी २ हजार ५४६ मे.टन चाºयाची आवश्यकता आहे. ७६ हजार ३९३ मे.टन चाºयाची एका महिन्यासाठी गरज भासणार आहे. त्यामुळे २० जुलै २०१९ पर्यंत म्हणजेच येत्या सात महिन्यांसाठी जिल्ह्याला ६ लाख ८७ हजार ५३७ मे.टन चाºयाची आवश्यकता भासणार आहे.जिल्हा प्रशासन व पशूसंवर्धन विभागाच्या वतीने ५ लाख ९० हजार ८०० मे.टन चाºयाचे नियोजन केले आहे; परंतु, यातही जिल्ह्यातील पशूधनाला कमरता भासू नये, यासाठी जिल्हा प्रशासन कामाला लागले असून राष्टÑीय कृषी विकास योजनेंतर्गत गाळपेरा क्षेत्रात वैरण विकास कार्यक्रम त्याच बरोबर सिंचनाची सोय असलेल्या इतर शेतकºयांना मका, वैरण बियाणे वाटप योजना अंमलात आणली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील १० हजार लाभार्थ्यांना जवळपास १०० मे.टन वैरण बियाणांचे वाटप या योजनेंतर्गत वाटप करण्यात येणार आहे.त्यामुळे जिल्ह्यातील २ हजार हेक्टर क्षेत्रावर अतिरिक्त चारा पिके घेण्यात येणार आहेत. त्यातून जिल्हा प्रशासनाकडे १ लाख मे.टन चाºयाची अतिरिक्त उपलब्धता होणार आहे.असे आहे चाºयाचे नियोजनपशूसंवर्धन विभागाकडून ४ लाख २४ हजार ४०४ पशूधनाला २० जून २०१९ पर्यंत लागणाºया ५ लाख ९० हजार ८०० मे.टन चाºयाचे नियोजन केले आहे. यामध्ये २०१८-१९ च्या खरीप हंगामातून ३ लाख ९५ हजार ८०० मे.टन चारा उपलब्ध होणार आहे. २०१८-१९ च्या रबी हंगामातून ७४ हजार ५०० मे.टन चाºयाची उपलब्धता होईल, अशी अपेक्षा आहे. त्याच बरोबर जिल्ह्यातील जंगल, वनक्षेत्र, चराऊ कुरण, बांधावरील व पडिक जमिनीच्या माध्यमातून ३० हजार मे.टन चारा मिळणार आहे. त्याच बरोबर शेतकºयांच्या शेतावरील वैरण पिकापासून ४० हजार ३०० मे.टन वैरण विकास योजनेंतर्गत ५० हजार २०० मे.टन असा एकूण २० जूनपर्यंत ५ लाख ९० हजार ८०० मे.टन चारा उपलब्ध होणार आहे. त्याच बरोबर जिल्ह्यात चाºयाची टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी अतिरिक्त उपाययोजनेतून १ लाख मे.टन चाºयाचे उत्पन्न घेण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात अपेक्षित असलेल्या ६ लाख ८७ हजार ५३७ मे.टन चाºयापैकी ६ लाख ९० हजार ८०० मे.टन चारा उपलब्ध होणार आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीGovernmentसरकारdroughtदुष्काळ