जिल्ह्यातील ९ वाळूघाटांमधून अधिकृत वाळू उपशाला सुरुवात झाल्याने खुल्या बाजारपेठेत वाळूच्या भावात घसरण झाली आहे. त्यामुुळे बांधकाम व्यावसायिकांसह सर्वसामान्य नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. ...
जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळाचा फटका कापसाच्या उत्पन्नाला झाला असून यावर्षीच्या हंगामात तीन तालुक्यांमधील बाजार समित्यांच्या अंतर्गत ११ लाख ६० हजार क्विंटल कापसाची आवक झाली आहे. आवक घटली असली तरी यावर्षी हमीभावाच्या अधिक तुलनेने भाव मिळाल्याने ...
येथील उपजिल्हा रुग्णालयाने आरोग्य सेवेत आपला वेगळा ठसा उमटविला असून वर्षभरात ११३३ नैसर्गिक प्रसुती झाल्या. तर १२८ सिझर करुन सर्वसामान्य रुग्णांना आर्थिक दिलासा मिळाला आहे. ...
शहराचे ग्रामदैवत असलेल्या श्री गुरुबुद्धी स्वामी संस्थान येथील पाडवा यात्रा उत्सवाची ८ एप्रिल रोजी हुरपल्ली व गव्हाची खीर या महाप्रसादाने सांगता झाली. ...
येथील तालुका कृषी कार्यालयाकडून शेतकऱ्यांना विविध योजनेंतर्गत ३३ लाख रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून शेती उपयोगी साहित्य खरेदी करण्यासाठी हा निधी उपलब्ध झाला आहे. ...
शहरातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेमध्ये नेहमीच पैशांचा तुटवडा निर्माण होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना हेलपाटे मारावे लागत आहेत. त्याच बरोबर दुष्काळी अनुदान वाटपात अडथळा निर्माण होत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याने शेतकऱ्यांमध ...
एकीकडे जिल्ह्यात निवडणुकीच्या प्रचाराचा ज्वर वाढला असताना दुसरीकडे मात्र शहरी भागातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचे चित्र दिसूून येत आहे. गंगाखेड शहराला १५ दिवसांआड तर जिंतूर व पूर्णा शहरात ८ दिवसांआड नळांना पाणी सुटत असल्याने शहरी ...
परभणी तालुक्यातील मिरखेल रेल्वेस्थानकावर उभ्या असलेल्या बंगळुरू एक्सप्रेसमधून प्रवासी महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठन हिसकावून चोरट्याने पोबारा केल्याची घटना ६ एप्रिल रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास घडली. ...
पाणी फाऊंडेशनच्या वतीने घेण्यात येणाऱ्या वॉटर कप स्पर्धेेत तालुक्यातील ५० गावांनी सहभाग घेतला आहे. यातील १५ गावांतील ग्रामस्थांनी ७ एप्रिल रोजीच्या मध्यरात्रीपासून श्रमदानाला सुरुवात केली. ...