शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
6
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
7
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
8
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
9
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
10
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
11
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
13
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
14
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
15
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
16
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
17
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
18
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
19
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
20
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
Daily Top 2Weekly Top 5

संचारबंदीला वाढला नागरिकांचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:17 IST

परभणी : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लागू केलेली संचारबंदी मागे घ्यावी, अशी मागणी जिल्ह्यातील विविध पक्ष, संघटनांनी गुरुवारी प्रशासनाकडे केली ...

परभणी : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लागू केलेली संचारबंदी मागे घ्यावी, अशी मागणी जिल्ह्यातील विविध पक्ष, संघटनांनी गुरुवारी प्रशासनाकडे केली आहे. त्याचप्रमाणे संविधान बचाव समितीच्या वतीने याच मागणीसाठी निदर्शने करण्यात आली.

जिल्हा प्रशासनाने लागू केलेली संचारबंदी अन्यायकारक आहे. गोरगरीब नागरिकांची होणारी होरपळ लक्षात घेऊन औरंगाबाद येथे लॉकडाऊन मागे घेण्यात आला. मात्र, परभणी जिल्ह्यात कोणालाही विश्वासात न घेता संचारबंदी लागू करण्यात आली आहे. ही बाब अन्यायकारक असल्याचा आरोप करीत संचारबंदी तत्काळ मागे घ्यावी, अशी मागणी निदर्शने, आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आली. संविधान बचाव समितीचे अध्यक्ष विजय वाकोडे यांच्यासह मौलाना रफीयोद्दीन अशरफी, मौलाना जहांगीर नदवी, सुधीर साळवे, जाफर खान, अनिता सरोदे, कैलास लहाने, कलीम खान, सिद्धार्थ कसारे, बाबासाहेब भराडे, प्रमोद कुटे, अतिक इनामदार यांच्यासह अनेक जण या आंदोलनात सहभागी झाले होते.

भाजपा, परभणी

जिल्ह्यातील संचारबंदी तत्काळ मागे घ्यावी, अशी मागणी भाजपाने प्रशासनाकडे केली आहे. भाजपाचे महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे, मोहन कुलकर्णी, मनपा गटनेत्या मंगलताई मुदगलकर, नगरसेवक मधुकर गव्हाणे, संजय शेळके, दिनेश नरवाडकर, संदीप जाधव, रामदास पवार, सिकंदर खान, आकाश लोहट, अनंता गिरी आदींनी या मागणीचे निवेदन प्रशासनाला दिले आहे.

नुकसानभरपाई द्या

संचारबंदीमुळे सर्वसामान्य नागरिकांचे मोठे नुकसान झाले असून, या नागरिकांना २५ हजार रुपये नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी गंगाधर कदम, अभिजित काळे, हरिभाऊ धोपटे, बंडू लोकरे आदींनी प्रशासनाकडे केली आहे. तसेच संचारबंदी तत्काळ रद्द करण्याची मागणीही करण्यात आली आहे.

मनसे, परभणी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही संचारबंदी मागे घेण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे. मनसेचे जिल्हाध्यक्ष गणेश सुरवसे, शेख राज, सचिन पाटील, गुलाबराव रोडगे, दत्तराव शिंदे, गणेश निवळकर, वेदांत पुरंदरे, सय्यद जावेद आदींनी यासंदर्भातील निवेदन दिले.

संचारबंदी नकोच

जिल्ह्यात कोरोनाच्या नियमांचे काटेकोर पालन केले जावे; परंतु संचारबंदी लागू करू नये, अशी मागणी अमोल जाधव, ॲड. अभिजित देशमुख, ॲड. सय्यद एजाज आदींनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.