शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
2
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
3
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
4
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
5
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
6
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
7
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
8
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
9
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
10
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
11
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
12
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
13
क्रिश का गाना सुनेगा..? अचानक २० वर्षांनी रंगली तुफान चर्चा, 'ले बेटा' वाला Video Viral
14
श्रीमंत व्हायचंय? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा गुंतवणुकीचा नवा 'मंत्र', चांदी विषयी केलं मोठं भाकित
15
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
16
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
17
“महानगरपालिकांमध्ये ‘वंचित’बरोबर आघाडी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू”: हर्षवर्धन सपकाळ
18
नवीन वर्षात करा नवीन भाषा शिकण्याचा संकल्प, मिळेल आयुष्याला कलाटणी; पाहा सोप्या टिप्स
19
३१ डिसेंबरला अयोध्येतील राम मंदिर खरोखरच बंद राहणार का? महत्त्वाची माहिती आली समोर
20
विधानसभेला संधी हुकली कृष्णराज महाडिक आता महापालिका निवडणूक लढवणार, प्रभागही ठरला!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यासमोर नवे संकट; वापशा अभावी रबी हंगामाच्या पेरण्या खोळंबल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2020 18:50 IST

खरीप हंगामात झालेले नुकसान रबी हंगामात तरी भरुन निघेल या आशेवर शेतकऱ्यांनी रबीच्या पेरण्याची तयारी सुरु केली.

ठळक मुद्देपंधरा दिवसांपासून शेत जमिनीत साचलेले पाणी बाहेर पडले नाही.अतिवृष्टीच्या तडाख्याने हजारो एकर जमीन पाण्याखाली गेली आहे.

जिंतूर :  तालुक्यात अतिवृष्टीने खरीप पिकांचे नुकसान झाले असताना आता शेतातील पाण्याचा निचरा झाला नसल्याने रबी पेरण्यांमध्ये खोडा निर्माण झाला आहे. पेरण्या लांबून रबी हंगामातही नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे.

मागील वर्षी पावसाळ्यात  झालेल्या समाधानकारक पावसाने शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या होत्या. खरिपाची पिके बहरात होती. पिके ऐन काढणीला आली असतानाच तालुक्यात अतिवृष्टीने होत्याचे नव्हते केले. सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन महिन्यात अतिवृष्टी झाली. त्यामुळे सोयाबीन, कापूस ही पिके उद्‌ध्वस्त झाली. हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला गेला. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला. खरीप हंगामात झालेले नुकसान रबी हंगामात तरी भरुन निघेल या आशेवर शेतकऱ्यांनी रबीच्या पेरण्याची तयारी सुरु केली. मात्र पंधरा दिवसांपासून शेत जमिनीत साचलेले पाणी बाहेर पडले नाही. जमिनीचा वापसाही झाला नाही. अशा परिस्थितीत पेरण्या करायच्या कशा, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. 

काही भागात शेतकऱ्यांनी पेरण्या सुरु केल्या असला तरी उत्पन्न  निघेल की नाही, अशी भीती व्यक्त केली जात आहे. एकंदर शेत जमिनीतील पाण्याचा वापसा झाला नसल्याने पेरण्या लांबणीवर पडत आहेत. सातत्याने दुष्काळाच्या छायेत असलेल्या या तालुक्यात यंदा चांगला पाऊस झाला. मात्र अतिवृष्टीच्या तडाख्याने हजारो एकर जमीन पाण्याखाली गेली आहे. नदीकाठच्या शेतात ही परिस्थिती अधिकच गंभीर आहे. पाणी साचलेले असल्याने एक महिना वापसा होण्याची शक्यता नाही. त्यामुळे रबी पेरण्या लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.  

बियाणांची जुळवाजुळवशेतकऱ्यांवर एकामागून एक संकटे येत आहेत. सुरुवातीला सोयाबीनचे बोगस बियाणे, त्यानंतर अतिवृष्टी, कापसावर पडलेला रोग या संकटामुळे उत्पादनात घट झाली आहे. आता रबी पेरण्यांचा हंगाम सुरु झाला असून, शेतकऱ्यांनी बियाणे, खतांसाठी पैशाची जुळवा जुळव केली आहे. मागील हंगामातील नुकसान लक्षात घेता बियाणांचा मोफत पुरवठा करावा, अशी मागणी होत आहे.

१ टक्का क्षेत्रावर पेरणीतालुक्यामध्ये खरीप हंगामासाठी ७५ हजार हेक्टर क्षेत्र आहे. रबी हंगामासाठी ४५ हजार हेक्टर क्षेत्र राखीव आहे. रबी हंगामात केवळ एक टक्का  क्षेत्रावर आतापर्यत  पेरणी झाली आहे. नदी काठावरील ५० ते ६० गावांमध्ये वाफसा झाला नसल्याने पेरण्या लांबल्या आहेत.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीparabhaniपरभणीRainपाऊस