शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

शेतकऱ्यासमोर नवे संकट; वापशा अभावी रबी हंगामाच्या पेरण्या खोळंबल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2020 18:50 IST

खरीप हंगामात झालेले नुकसान रबी हंगामात तरी भरुन निघेल या आशेवर शेतकऱ्यांनी रबीच्या पेरण्याची तयारी सुरु केली.

ठळक मुद्देपंधरा दिवसांपासून शेत जमिनीत साचलेले पाणी बाहेर पडले नाही.अतिवृष्टीच्या तडाख्याने हजारो एकर जमीन पाण्याखाली गेली आहे.

जिंतूर :  तालुक्यात अतिवृष्टीने खरीप पिकांचे नुकसान झाले असताना आता शेतातील पाण्याचा निचरा झाला नसल्याने रबी पेरण्यांमध्ये खोडा निर्माण झाला आहे. पेरण्या लांबून रबी हंगामातही नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे.

मागील वर्षी पावसाळ्यात  झालेल्या समाधानकारक पावसाने शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या होत्या. खरिपाची पिके बहरात होती. पिके ऐन काढणीला आली असतानाच तालुक्यात अतिवृष्टीने होत्याचे नव्हते केले. सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन महिन्यात अतिवृष्टी झाली. त्यामुळे सोयाबीन, कापूस ही पिके उद्‌ध्वस्त झाली. हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला गेला. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला. खरीप हंगामात झालेले नुकसान रबी हंगामात तरी भरुन निघेल या आशेवर शेतकऱ्यांनी रबीच्या पेरण्याची तयारी सुरु केली. मात्र पंधरा दिवसांपासून शेत जमिनीत साचलेले पाणी बाहेर पडले नाही. जमिनीचा वापसाही झाला नाही. अशा परिस्थितीत पेरण्या करायच्या कशा, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. 

काही भागात शेतकऱ्यांनी पेरण्या सुरु केल्या असला तरी उत्पन्न  निघेल की नाही, अशी भीती व्यक्त केली जात आहे. एकंदर शेत जमिनीतील पाण्याचा वापसा झाला नसल्याने पेरण्या लांबणीवर पडत आहेत. सातत्याने दुष्काळाच्या छायेत असलेल्या या तालुक्यात यंदा चांगला पाऊस झाला. मात्र अतिवृष्टीच्या तडाख्याने हजारो एकर जमीन पाण्याखाली गेली आहे. नदीकाठच्या शेतात ही परिस्थिती अधिकच गंभीर आहे. पाणी साचलेले असल्याने एक महिना वापसा होण्याची शक्यता नाही. त्यामुळे रबी पेरण्या लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.  

बियाणांची जुळवाजुळवशेतकऱ्यांवर एकामागून एक संकटे येत आहेत. सुरुवातीला सोयाबीनचे बोगस बियाणे, त्यानंतर अतिवृष्टी, कापसावर पडलेला रोग या संकटामुळे उत्पादनात घट झाली आहे. आता रबी पेरण्यांचा हंगाम सुरु झाला असून, शेतकऱ्यांनी बियाणे, खतांसाठी पैशाची जुळवा जुळव केली आहे. मागील हंगामातील नुकसान लक्षात घेता बियाणांचा मोफत पुरवठा करावा, अशी मागणी होत आहे.

१ टक्का क्षेत्रावर पेरणीतालुक्यामध्ये खरीप हंगामासाठी ७५ हजार हेक्टर क्षेत्र आहे. रबी हंगामासाठी ४५ हजार हेक्टर क्षेत्र राखीव आहे. रबी हंगामात केवळ एक टक्का  क्षेत्रावर आतापर्यत  पेरणी झाली आहे. नदी काठावरील ५० ते ६० गावांमध्ये वाफसा झाला नसल्याने पेरण्या लांबल्या आहेत.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीparabhaniपरभणीRainपाऊस