शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

परभणी जिल्ह्यात ७७० कामांना लागेना मुहूर्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2018 00:26 IST

जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत परभणी जिल्ह्यात दोन वर्षात सुमारे ५ हजार कामांना प्रशाकीय मंजुरी दिली असली तरी त्यातील ७७० कामांना अद्याप सुरुवातही झालेली नाही. विशेष बाब म्हणजे मागील वर्षीची ६१७ कामे अजूनही सुरु झाली नसल्याने या योजनेचे काम धिम्या गतीने सुरु असून जलसंधारणाचा हेतू साध्य होण्यात अधिकाºयांची अनास्था अडथळा ठरत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत परभणी जिल्ह्यात दोन वर्षात सुमारे ५ हजार कामांना प्रशाकीय मंजुरी दिली असली तरी त्यातील ७७० कामांना अद्याप सुरुवातही झालेली नाही. विशेष बाब म्हणजे मागील वर्षीची ६१७ कामे अजूनही सुरु झाली नसल्याने या योजनेचे काम धिम्या गतीने सुरु असून जलसंधारणाचा हेतू साध्य होण्यात अधिकाºयांची अनास्था अडथळा ठरत असल्याचे स्पष्ट झाले आहे.राज्यातील दुष्काळ कायमस्वरुपी हाटावा, या उद्देशाने राज्य शासनाने चार वर्षापूर्वी जलयुक्त शिवार योजना अंमलात आणली. या योजनेअंतर्गत कृषी विभाग, जिल्हा परिषद, लघु पाटबंधारे या विभागांना एकत्रित करुन जलसंधारणाची कामे हाती घेण्यात आली. यासाठी ग्रामस्थांचा लोकसहभाग घेण्यात आला. योजनेच्या पहिल्या टप्प्यात जिल्ह्यामध्ये उत्सफूर्त प्रतिसाद मिळाला. परंतु, दुसºया टप्प्यापासून ही कामे धिम्म्या गतीने होत असल्याचे दिसत आहे. विशेषत: उन्हाळ्यामध्ये कामे पूर्ण करुन झालेल्या कामांमध्ये पावसाळ्यात शाश्वत पाणीसाठा उपलब्ध होईल, या उद्देशाने योजना राबविली जाते आणि उन्हाळ्यात कामांना गती येते.मागील काही वर्षांपासून जलयुक्त शिवार अभियानांतर्गत रखडलेल्या कामांची संख्या वाढली आहे. २०१६-१७ या वर्षातील कामे २०१८ उजाडला तर पूर्ण झाले नसल्याची बाब समोर आली आहे. २०१६-१७ मध्ये जिल्ह्यात ५ हजार ४० कामांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यापैकी ४ हजार ९५२ कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली.४ हजार ७८७ कामांचे कार्यारंभ आदेश देण्यात आले. त्यात २८ फेब्रुवारी २०१८ अखेर केवळ ३ हजार ६३४ कामे पूर्ण झाली. तर ५६८ कामे प्रगतीपथावर असल्याचे सांगण्यात येते. ६१७ कामांना अजूनही सुरुवात झालेली नाही. विशेष म्हणजे आराखड्यानुसार निश्चित केलेल्या ५ हजार ४० कामांपैकी ४ हजार ९५२ कामांनाच प्रशासकीय मंजुरी दिल्याने ८८ कामांना प्रशासकीय मान्यताच मिळाली नसल्याचे दिसत आहे. तर २०१७-१८ या चालू वर्षामध्ये ३ हजार ७७ कामांचा आराखडा तयार करण्यात आला. त्यातील ९२५ कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. प्रशासकीय मान्यता दिलेल्या कामांपैकी केवळ ३३४ कामांना कार्यारंभ आदेश दिले असून १६९ कामे पूर्ण झाली आहेत. तर १५३ कामे अजूनही सुरु झाली नाहीत. यावर्षीची १२ कामे प्रगतीपथावर आहेत.दोन्ही वर्षांचा आढावा घेतला असता यावर्षी योजनेच्या कामांनी गती घेतल्याचे दिसत आहे. मात्र मागील वर्षीची कामे धिम्म्या गतीने सुरु आहेत. यावर्षीची कामे सुरु करण्यासाठी प्रशासनाकडे पाच महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे.पावसाळा सुरु झाल्यानंतर ही कामे करता येणार नसल्याने उन्हाळयातच यावर्षीच्या कामांबरोबरच मागील वर्षीची कामेही पूर्ण करुन घेण्यासाठी प्रशासनाला गतीने कामे करावी लागणार आहेत. जलयुक्त शिवार या योजनेवर भर देत कामे पूर्ण केली तर आगामी पावसाळ्यामध्ये शाश्वत पाणी स्त्रोत उपलब्ध होऊ शकतो. त्यामुळे याकडे सकारात्मक दृष्टिकोणातून पाहणे गरजेचे आहे.