शहरं
Join us  
Trending Stories
1
थर्टी फर्स्टचा जल्लोष पहाटेपर्यंत! हॉटेल आणि बार पहाटे ५ वाजेपर्यंत सुरू राहणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय
2
मुंबई महापालिकेसाठी भाजपाची १३७ उमेदवारांची यादी जाहीर; किती अमराठी उमेदवारांना दिली संधी?
3
Solapur Municipal Corporation Election 2025 : सोलापूरात मोठी राजकीय खेळी! ठाकरेंच्या जिल्हाप्रमुखाने ऐनवेळेला भाजपाकडून भरला फॉर्म
4
धनंजय मुंडे यांना दिलासा! करुणा मुंडे यांची याचिका कोर्टाने फेटाळली, काय होतं प्रकरण?
5
भांडवलशाहीचा 'भीष्म पितामह' निवृत्त! दिवाळखोर कंपनीतून वॉरेन बफेंनी कसे उभारले अब्जावधींचे साम्राज्य?
6
Stock Market Holiday 2026 List: NSE-BSE नं जारी केली २०२६ ची सुट्ट्यांची यादी; पाहा किती आहेत लाँग वीकेंड्स?
7
Panvel Municipal Election 2026: पनवेलमध्ये 'मविआ'ला झटका! भाजपाचे नितीन पाटील बिनविरोध, मतदानाआधीच तीन ठिकाणी फुललं 'कमळ'
8
कानात ब्लूटूथ इयरफोन लावल्याने कॅन्सरचा मोठा धोका? एक्सपर्ट्सनी सांगितलं 'सत्य'
9
संतापजनक! चालत्या कारमध्ये दोन तास लैंगिक अत्याचार, तरुणीला मारहाण; मध्यरात्री रस्त्यावर फेकून दिले
10
पाल-खंडोबा यात्रेसाठी एसटीची जय्यत तयारी; मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली महत्त्वाची माहिती
11
“काँग्रेसमुक्त भारतची वल्गना करणारा भाजपा ‘कार्यकर्ता मुक्त भाजपा’ झाला”: हर्षवर्धन सपकाळ
12
लालू यादवांचा मुलगा तेज प्रताप यादव यांची तब्येत अचानक बिघडली, रुग्णालयात दाखल, काय झालं?
13
इंदूरमध्ये दूषित पाण्याचा कहर, विषारी पाण्यामुळे आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू, हजारो जण बाधित
14
DSP संतोष पटेल यांनी 26 वर्षांनंतर फेडले ‘रक्ताचे ऋण’; संतु मास्टरच्या कुटुंबाची जबाबदारी स्वीकारली
15
आईशी भांडली, रागाने घराबाहेर पडली, नराधमाच्या तावडीत सापडली; तरुणीसोबत घडलं भयंकर
16
ऐन मनपा निवडणुकीत मनसेला मोठा धक्का! माजी नगरसेवकांचा पक्षाला रामराम, शिंदे गटात प्रवेश
17
भारत तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था कधी बनणार; पाकिस्तानचा समावेश टॉप १० मध्ये आहे का?
18
आता कितीही धुके असू दे, वेगवान वंदे भारत ट्रेन थांबणार नाही; भारतीय रेल्वेने उचलले मोठे पाऊल!
19
कोण होती तातियाना श्लॉसबर्ग? अमेरिकन माजी राष्ट्राध्यक्षांच्या नातीचा ३५व्या वर्षी मृत्यू
20
"अहंकार दुखावल्याने त्याने मलाच सिनेमातून काढून टाकलं...", बॉलिवूड दिग्दर्शकाकडून अक्षय खन्नाची पोलखोल
Daily Top 2Weekly Top 5

परभणी जिल्ह्यात ७७० कामांना लागेना मुहूर्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2018 00:26 IST

जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत परभणी जिल्ह्यात दोन वर्षात सुमारे ५ हजार कामांना प्रशाकीय मंजुरी दिली असली तरी त्यातील ७७० कामांना अद्याप सुरुवातही झालेली नाही. विशेष बाब म्हणजे मागील वर्षीची ६१७ कामे अजूनही सुरु झाली नसल्याने या योजनेचे काम धिम्या गतीने सुरु असून जलसंधारणाचा हेतू साध्य होण्यात अधिकाºयांची अनास्था अडथळा ठरत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत परभणी जिल्ह्यात दोन वर्षात सुमारे ५ हजार कामांना प्रशाकीय मंजुरी दिली असली तरी त्यातील ७७० कामांना अद्याप सुरुवातही झालेली नाही. विशेष बाब म्हणजे मागील वर्षीची ६१७ कामे अजूनही सुरु झाली नसल्याने या योजनेचे काम धिम्या गतीने सुरु असून जलसंधारणाचा हेतू साध्य होण्यात अधिकाºयांची अनास्था अडथळा ठरत असल्याचे स्पष्ट झाले आहे.राज्यातील दुष्काळ कायमस्वरुपी हाटावा, या उद्देशाने राज्य शासनाने चार वर्षापूर्वी जलयुक्त शिवार योजना अंमलात आणली. या योजनेअंतर्गत कृषी विभाग, जिल्हा परिषद, लघु पाटबंधारे या विभागांना एकत्रित करुन जलसंधारणाची कामे हाती घेण्यात आली. यासाठी ग्रामस्थांचा लोकसहभाग घेण्यात आला. योजनेच्या पहिल्या टप्प्यात जिल्ह्यामध्ये उत्सफूर्त प्रतिसाद मिळाला. परंतु, दुसºया टप्प्यापासून ही कामे धिम्म्या गतीने होत असल्याचे दिसत आहे. विशेषत: उन्हाळ्यामध्ये कामे पूर्ण करुन झालेल्या कामांमध्ये पावसाळ्यात शाश्वत पाणीसाठा उपलब्ध होईल, या उद्देशाने योजना राबविली जाते आणि उन्हाळ्यात कामांना गती येते.मागील काही वर्षांपासून जलयुक्त शिवार अभियानांतर्गत रखडलेल्या कामांची संख्या वाढली आहे. २०१६-१७ या वर्षातील कामे २०१८ उजाडला तर पूर्ण झाले नसल्याची बाब समोर आली आहे. २०१६-१७ मध्ये जिल्ह्यात ५ हजार ४० कामांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यापैकी ४ हजार ९५२ कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली.४ हजार ७८७ कामांचे कार्यारंभ आदेश देण्यात आले. त्यात २८ फेब्रुवारी २०१८ अखेर केवळ ३ हजार ६३४ कामे पूर्ण झाली. तर ५६८ कामे प्रगतीपथावर असल्याचे सांगण्यात येते. ६१७ कामांना अजूनही सुरुवात झालेली नाही. विशेष म्हणजे आराखड्यानुसार निश्चित केलेल्या ५ हजार ४० कामांपैकी ४ हजार ९५२ कामांनाच प्रशासकीय मंजुरी दिल्याने ८८ कामांना प्रशासकीय मान्यताच मिळाली नसल्याचे दिसत आहे. तर २०१७-१८ या चालू वर्षामध्ये ३ हजार ७७ कामांचा आराखडा तयार करण्यात आला. त्यातील ९२५ कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. प्रशासकीय मान्यता दिलेल्या कामांपैकी केवळ ३३४ कामांना कार्यारंभ आदेश दिले असून १६९ कामे पूर्ण झाली आहेत. तर १५३ कामे अजूनही सुरु झाली नाहीत. यावर्षीची १२ कामे प्रगतीपथावर आहेत.दोन्ही वर्षांचा आढावा घेतला असता यावर्षी योजनेच्या कामांनी गती घेतल्याचे दिसत आहे. मात्र मागील वर्षीची कामे धिम्म्या गतीने सुरु आहेत. यावर्षीची कामे सुरु करण्यासाठी प्रशासनाकडे पाच महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे.पावसाळा सुरु झाल्यानंतर ही कामे करता येणार नसल्याने उन्हाळयातच यावर्षीच्या कामांबरोबरच मागील वर्षीची कामेही पूर्ण करुन घेण्यासाठी प्रशासनाला गतीने कामे करावी लागणार आहेत. जलयुक्त शिवार या योजनेवर भर देत कामे पूर्ण केली तर आगामी पावसाळ्यामध्ये शाश्वत पाणी स्त्रोत उपलब्ध होऊ शकतो. त्यामुळे याकडे सकारात्मक दृष्टिकोणातून पाहणे गरजेचे आहे.