शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वर्षाला २९३ कोटींचे उत्पन्न देऊनही परभणी - मनमाड दुहेरीकरणाबाबत नकारात्मकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2021 19:33 IST

परभणी-मनमाड या २९१ किलोमीटरच्या रेल्वेमार्ग दुुहेरीकरणाला २०११-१२ च्या रेल्वे अर्थसंकल्पात तत्कालीन रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांनी मंजुरी दिली होती.

- राजन मंगरूळकर

परभणी : परभणी-मनमाड एकेरी मार्गावर प्रवासी रेल्वेसह मालगाडीच्या वाहतुकीचे प्रमाण जवळपास १६२ टक्के आहे. विभागातील केवळ पाच मोठ्या स्थानकांचे वार्षिक महसुली तिकीट, आरक्षणातून मिळणारे उत्पन्न २९३ कोटी एवढे असल्याचे २०१८-१९ मध्ये माहिती अधिकारातून समोर आले आहे. असे असतानाही परभणी-मनमाड दुहेरी मार्गावर उत्पन्न मिळणार नाही, असा अहवाल दमरे विभागाने रेल्वे बोर्डाकडे दिला आहे. परिणामी मंजुरी दिल्यानंतर जवळपास दहा वर्षांनी दिल्याने दुहेरीकरणाचे काम बंद करण्याचा घाट दक्षिण मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी घातला आहे.

परभणी-मनमाड या २९१ किलोमीटरच्या रेल्वेमार्ग दुुहेरीकरणाला २०११-१२ च्या रेल्वे अर्थसंकल्पात तत्कालीन रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांनी मंजुरी दिली होती. त्यानंतर या कामाच्या तांत्रिक सर्वेसाठी पाच कोटींची मंजुरी देत सर्वेक्षणाचे काम करण्यात आले. त्यानंतर जमीन हस्तांतरण, जागा ताब्यात घेणे, दुहेरी मार्ग उभारणे यासाठीच्या कामाला ब्ल्यू बुकमध्ये २०१३-१४ मध्ये समाविष्ट करण्यात आले. त्यानंतर झालेल्या सर्व्हेचा अहवाल दमरे विभागाने रेल्वे बोर्डाकडे ८ डिसेंबर २०१७ मध्ये सादर केल्यानंतर या मार्गाचे अंदाजपत्रक २ हजार १९९ कोटी रुपये निश्चित करण्यात आले. तेव्हा या मार्गाचे आरओआर सर्व्हेनुसार २.१२ टक्के असा अहवाल देण्यात आला. त्यानंतर आता या मार्गाचे पुन्हा सर्वेक्षण करण्यासाठी टप्पे पाडण्याचे काम केले जात आहे. पूर्ण मार्गाचे सर्वेक्षण झाले असताना केवळ अंकाई ते औरंगाबाद या ९८ किलोमीटर मार्गाचे सर्व्हे काम सध्या सुरू करावे, मग पुढील मार्गाचे पाहू असे ठरविले आहे. विशेष म्हणजे, २०१४ नंतर प्रत्यक्ष मंजुरी आणि कामाला सुरुवात होऊन परभणी-मुदखेड या मार्गाचे दुहेरीकरण २०१८मध्ये पूर्ण झाले. तरी मागील दहा वर्षांपासून परभणी-मनमाड या मार्गाच्या मंजुरी आणि निधीचा प्रश्न महसुली उत्पन्न नसल्याचे कारण देत लालफितीत बंद करण्याचा प्रकार केला जात आहे.

एक किलोमीटरसाठी सात कोटींचा खर्च अपेक्षितरेल्वेमार्गाचे दुहेरीकरण करताना सध्याच्या अपेक्षित अंदाजपत्रकाप्रमाणे १ किलोमीटरसाठी सात कोटींचा खर्च लागणार आहे. त्यात २९१ किलोमीटरसाठी २ हजार १९९ कोटीची तरतूद करण्यात आली होती. जर वर्षाला केवळ ५ स्थानके २९३ कोटी महसुली उत्पन्न देत आहेत, तर मागील दहा वर्षांत हेच उत्पन्न या विभागाने २ हजार ९३० कोटी एवढे दिले आहे. असे असताना उत्पन्न मिळत नाही, ही ओरड केली जात आहे. रेल्वे विभागाकडून २०१४ पूर्वी देशातील सर्व स्थानकांच्या वर्गवारीसाठी अ, ब, अ प्लस असा क्रम होता. २०१४ नंतर स्वतंत्र रेल्वे अर्थसंकल्प सादर करणे बंद करण्यात आले. त्यानंतर स्थानकांचा दर्जा नॉन सब अर्बन एनएसजी १, एनएसजी-२, एनएसजी-३ यानुसार करण्यात आला. त्यात नांदेड स्थानक एनएसजी-२ दर्जाचे असून, या दर्जात ज्यात स्थानकांचे उत्पन्न १०० ते ५०० कोटी असते. त्यात नांदेडचा समावेश आहे. उर्वरित औरंगाबाद, परभणी, जालना, पूर्णा ही चार स्थानके एनएसजी-३ दर्जात येतात.

दमरेचे १८ वर्षांत २० सर्व्हेमहाराष्ट्रातील जो भाग दमरे विभागात येतो. त्या सर्व भागांचे नवीन मार्ग मंजुरी, दुहेरीकरण, विद्युतीकरण यासह अन्य विकासकामाचे २००४ ते २०२१ या १८ वर्षांत २० सर्व्हे प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठविण्यासाठी तयार करण्यात आले. त्यात ८ प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे सादर केल्यानंतर त्यास मंजुरी आहे. सात प्रस्ताव प्रगतिपथावर आहेत, तर ५ प्रस्ताव अजून लालफितीत अडकले आहेत.

२०१८-१९मध्ये पाच स्थानकांवर तिकीट विक्रीतून मिळालेला महसूलनांदेड - १३४ कोटीऔरंगाबाद - ७४ कोटीपरभणी - ३४ कोटीपूर्णा - २३ कोटीजालना - २८ कोटीनांदेडचे उत्पन्न १०० ते ५०० कोटींच्या आत

अन्य प्रलंबित मार्गमानवतरोड-पाथरी-सोनपेठ-परळी नवीन मार्गकिनवट-माहूर नवीन मार्गलातूररोड-नांदेड नवीन मार्गवाशिम-माहूर-आदिलाबाद नवीन मार्गपरभणी-मनमाड दुहेरीकरण

टॅग्स :railwayरेल्वेCentral Governmentकेंद्र सरकार