शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
2
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
3
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
4
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
5
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
6
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
7
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
8
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
9
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
10
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
11
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
12
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
13
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
14
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
15
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
16
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
17
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
18
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
19
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
20
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई

परभणी जिल्ह्यातील पीक विम्याचा प्रश्न विधानसभेत मांडणार; राहुल पाटील यांची ग्वाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 1:39 PM

पीक विम्यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांचा प्रश्न विधानसभेत मांडून शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला जाईल, अशी ग्वाही आ.डॉ.राहुल पाटील यांनी येथे दिली.

परभणी : पीक विम्यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांचा प्रश्न विधानसभेत मांडून शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला जाईल, अशी ग्वाही आ.डॉ.राहुल पाटील यांनी येथे दिली.

रिलायन्स पीक विमा कंपनी, जिल्हा कृषी कार्यालयातील अधिकारी आणि जिल्हाधिधकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या समन्वयाचा अभाव असल्याने जिल्ह्यातील हजारो शेतकरी पिकांचे नुकसान झाले असतानाही विमा भरपाईपासून वंचित राहिले आहेत. जिल्हाभरातील या शेतकऱ्यांनी २५ जूनपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. आज उपोषणाचा चौथा दिवस आहे. 

या आंदोलनात जिल्ह्यातील शेकडो शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला आहे. दरम्यान, आ. डॉ. राहुल पाटील यांनी शुक्रवारी आंदोलक शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांचे प्रश्न जाणून घेतले. पीक विम्यात शेतकऱ्यांवर अन्याय झाला असून, शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित केला जाईल. या प्रकरणात दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी लावून धरत शेतकऱ्यांना पीक विमा मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन आ.डॉ.राहुल पाटील यांनी दिले.

पंतप्रधान पीक विमा संघर्ष समितीचे समन्वयक डॉ.सुभाष कदम, जि.प.सदस्य श्रीनिवास जोगदंड, कॉ.राजन क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन केले जात आहे. सध्या जिल्ह्यात पेरण्या सुरू झाल्या आहेत. मात्र पीक विम्याच्या गंभीर प्रश्नावर शेकडो शेतकरी पेरण्यांची कामे सोडून आंदोलनात सहभागी झाले आहेत, हे विशेष.

टॅग्स :FarmerशेतकरीagitationआंदोलनParabhani collector officeजिल्हाधिकारी कार्यालय परभणीCrop Insuranceपीक विमा