शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

वन्यप्राण्यांकडून कोवळी पिके फस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:13 IST

ताडबोरगाव परिसरातील किन्होळा, आटोळा, सोमठाणा, देवलगावसह परिसरातील बहुतांश गावांमध्ये मृग नक्षत्रात झालेल्या पेरणीमुळे यंदा शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. परंतु, ...

ताडबोरगाव परिसरातील किन्होळा, आटोळा, सोमठाणा, देवलगावसह परिसरातील बहुतांश गावांमध्ये मृग नक्षत्रात झालेल्या पेरणीमुळे यंदा शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. परंतु, पिकांचे अंकुरण होऊन कोवळ्या पिकांनी डोकेवर काढताच या भागातील रोही व हरणांचे कळप पिकांचे शेंडे फस्त करत आहेत. त्यामुळे दुबार लागवडीच्या खर्चाबरोबरच नंतरही पिकांच्या उत्पादनात घट होऊन शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होते. या भागात कुठेही माळरान, दाट झाडीची पडिक जमीन नसल्यामुळे या वन्य प्राण्यांचे कळप चारा पाण्याच्या शोधात सतत फिरून शेतीचे नुकसान करत असल्याने शेतकऱ्यांची मोठी डोकेदुखी वाढली आहे. पिकांच्या संरक्षणासाठी शेतकरीवर्गाला सकाळी भल्या पहाटेपासून रात्रीपर्यंत शेतातच थांबावे लागत आहे. सततच्या सहवासाने हे वन्य प्राणीदेखील निर्भीड झाले असून, कितीही हाकलले तरी फिरून पुन्हा शेतावर येतात. त्यामुळे शेतकऱ्यांची झोप उडाली आहे. वन विभागाने याचा बंदोबस्त करावा, याबाबत अनेकदा अर्ज करूनही वन विभागाला याचे कुठलेही सोयरसुतक नसल्याचे दिसून येत आहे.

शेतकऱ्यांचा खर्च वाढला

शेतीत मशागत, पेरणी, खते, बियाणे औषधे, काढणी, मळणी याबरोबरच आता पिकांच्या संरक्षणाचा खर्च वाढला आहे. शेतकऱ्यांना वन्य प्राण्यांपासून पिकाचे संरक्षण करण्यासाठी शेताला कुंपण करणे, जाळ्या लावणे, याबरोबरच रात्रीच्या वेळी पहारा देण्यासाठी राखणदार लावणे अनिवार्य झाल्याने शेतकऱ्यांवर हा अधिकचा आर्थिक भुर्दंड पडून त्यांच्या खर्चात वाढ झाली आहे.

"पहिले कापसाचे पीक फस्त केल्यानंतर पाच एकरवर दुबार लागवड करूनही पीक संरक्षणासाठी आता दिवस रात्र राखण करावी लागत आहे.

नितीन खरवडे, शेतकरी किन्होळा

वनविभाग नावालाच

वन्य प्राण्यांपासून पिकांची नासाडी झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची तरतूद असली तरी त्यासाठी वन विभागाकडे अर्ज केल्यानंतर सदर प्रकरणाची शहानिशा संबंधित वनपाल अधिकारी, सरपंच, ग्रामसेवक, तलाठी व कृषी अधिकारी यांची समिती करते. त्यात पंचनामा करून पुरावे तपासून नुकसान क्षेत्राची मोजणी करत नुकसान मूल्य ठरवले जाते. परंतु तक्रार ,पंचनामा या गोष्टीसाठी वन विभागाकडे खेटे घालून मदत मिळेलच याची खात्री नसल्याने भरपाई मागणे म्हणजे ''रोगापेक्षा इलाज भयंकर'' अशी स्थिती असल्याने शेतकरी तक्रार देण्याच्या भानगडीत पडत नसल्याचे दिसते.