शहरं
Join us  
Trending Stories
1
उज्ज्वल निकम आता यापुढे संतोष देशमुख प्रकरणाची केस लढणार नाहीत? पण कारण काय? चर्चांना उधाण
2
राजीनामा-शासन भिकारी, माणिकराव कोकाटेंच्या विधानावर CM फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले...
3
Video : चाकू काढला आणि ३२ हजारांचा लेहेंगा फाडला, दुकानदाराला म्हणाला, 'तुलाही असाच फाडेन'; कल्याणमधील व्हिडीओ व्हायरल
4
IND vs ENG: शुभमन गिल की सचिन तेंडुलकर? ३५ कसोटीनंतर कोण वरचढ? पाहा आकडे!
5
६२ वर्षांच्या सेवेनंतर मिग-२१ लढाऊ विमान निरोप घेणार; १९६५ च्या युद्धात पाकिस्तानला टक्कर दिलेली
6
स्वतःचं घर बांधण्याचं स्वप्न पाहताय? 'सेल्फ-कन्स्ट्रक्शन होम लोन' कसं मिळवायचं, व्याजासह प्रक्रिया जाणून घ्या
7
Deep Amavasya 2025: आषाढ अमावास्येला दिव्यांची आवस म्हणतात, गटारी नाही; धर्मशास्त्र सांगते...
8
ट्रेन सुटली तरीही वाया जात नाही तुमचं तिकीट...! रेल्वेचा हा नियम तुम्हाला कदाचितच माहित असेल
9
शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांना पोलिसांनी घेतले ताब्यात, मुक्ताईनगर बंद
10
Viral Video: महाकाय अजगराला जांभई देताना कधी पाहिलंय का? दृश्य पाहून तुम्हालाही भरेल धडकी...
11
जावेसोबतच्या भांडणाचा राग अन् संपूर्ण कुटुंबाला संपवण्याचं षडयंत्र; पिठात विष मिसळलं, पण...
12
भारतीय कुटुंबांची 'बचत' सवय मोडली? ५० वर्षांतील सर्वात कमी बचत दर, गव्हर्नर मल्होत्रा म्हणाले असं असेल तर..
13
बिहारमधील नेत्यासाठी जगदीप धनखड यांचा राजीनामा, काँग्रेस नेत्याचा नवा दावा
14
IPO मध्ये १ लाख गुंतवले, आता त्याचे राहिले फक्त ₹३,२००; कसं मोठ्या आयपीओंनी बनवलं गुंतवणुकदारांना कंगाल
15
"पंडित नेहरुंनी मांडीवर बसवलं, गुलाबाचं फूल दिलं", सचिन पिळगावकरांचा हा किस्सा माहितीये का?
16
Rajasthan Accident: देवदर्शनाहून परतताना भीषण अपघात; पाच ठार, चार जण जखमी!
17
"राजीनामा तर द्यावाच लागेल..."; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंचा नवा व्हिडिओ आला समोर
18
“यालाही हनी ट्रॅप म्हणायचे का?”; फोटोला फोटोने उत्तर, ठाकरे गटाच्या आरोपावर भाजपाचा पलटवार
19
सोने, चांदी, बिटकॉइन स्वस्त होणार? रॉबर्ट कियोसाकी यांचा मोठा दावा; वॉरेन बफेही 'त्या' क्षणाची वाट पाहतायेत?
20
एअर इंडियाच्या बोईंग जेटच्या फ्युएल कंट्रोल स्विचची तपासणी पूर्ण; समोर आली महत्त्वाची माहिती

वन्यप्राण्यांकडून कोवळी पिके फस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:13 IST

ताडबोरगाव परिसरातील किन्होळा, आटोळा, सोमठाणा, देवलगावसह परिसरातील बहुतांश गावांमध्ये मृग नक्षत्रात झालेल्या पेरणीमुळे यंदा शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. परंतु, ...

ताडबोरगाव परिसरातील किन्होळा, आटोळा, सोमठाणा, देवलगावसह परिसरातील बहुतांश गावांमध्ये मृग नक्षत्रात झालेल्या पेरणीमुळे यंदा शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. परंतु, पिकांचे अंकुरण होऊन कोवळ्या पिकांनी डोकेवर काढताच या भागातील रोही व हरणांचे कळप पिकांचे शेंडे फस्त करत आहेत. त्यामुळे दुबार लागवडीच्या खर्चाबरोबरच नंतरही पिकांच्या उत्पादनात घट होऊन शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होते. या भागात कुठेही माळरान, दाट झाडीची पडिक जमीन नसल्यामुळे या वन्य प्राण्यांचे कळप चारा पाण्याच्या शोधात सतत फिरून शेतीचे नुकसान करत असल्याने शेतकऱ्यांची मोठी डोकेदुखी वाढली आहे. पिकांच्या संरक्षणासाठी शेतकरीवर्गाला सकाळी भल्या पहाटेपासून रात्रीपर्यंत शेतातच थांबावे लागत आहे. सततच्या सहवासाने हे वन्य प्राणीदेखील निर्भीड झाले असून, कितीही हाकलले तरी फिरून पुन्हा शेतावर येतात. त्यामुळे शेतकऱ्यांची झोप उडाली आहे. वन विभागाने याचा बंदोबस्त करावा, याबाबत अनेकदा अर्ज करूनही वन विभागाला याचे कुठलेही सोयरसुतक नसल्याचे दिसून येत आहे.

शेतकऱ्यांचा खर्च वाढला

शेतीत मशागत, पेरणी, खते, बियाणे औषधे, काढणी, मळणी याबरोबरच आता पिकांच्या संरक्षणाचा खर्च वाढला आहे. शेतकऱ्यांना वन्य प्राण्यांपासून पिकाचे संरक्षण करण्यासाठी शेताला कुंपण करणे, जाळ्या लावणे, याबरोबरच रात्रीच्या वेळी पहारा देण्यासाठी राखणदार लावणे अनिवार्य झाल्याने शेतकऱ्यांवर हा अधिकचा आर्थिक भुर्दंड पडून त्यांच्या खर्चात वाढ झाली आहे.

"पहिले कापसाचे पीक फस्त केल्यानंतर पाच एकरवर दुबार लागवड करूनही पीक संरक्षणासाठी आता दिवस रात्र राखण करावी लागत आहे.

नितीन खरवडे, शेतकरी किन्होळा

वनविभाग नावालाच

वन्य प्राण्यांपासून पिकांची नासाडी झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची तरतूद असली तरी त्यासाठी वन विभागाकडे अर्ज केल्यानंतर सदर प्रकरणाची शहानिशा संबंधित वनपाल अधिकारी, सरपंच, ग्रामसेवक, तलाठी व कृषी अधिकारी यांची समिती करते. त्यात पंचनामा करून पुरावे तपासून नुकसान क्षेत्राची मोजणी करत नुकसान मूल्य ठरवले जाते. परंतु तक्रार ,पंचनामा या गोष्टीसाठी वन विभागाकडे खेटे घालून मदत मिळेलच याची खात्री नसल्याने भरपाई मागणे म्हणजे ''रोगापेक्षा इलाज भयंकर'' अशी स्थिती असल्याने शेतकरी तक्रार देण्याच्या भानगडीत पडत नसल्याचे दिसते.