शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
2
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?
3
Lamborghini Accident: भरधाव लॅम्बोर्गिनी दुभाजकावर धडकली; कोस्टल रोडवरील अपघातात, कोण चालवत होतं कार?
4
चिमुकली आई... आई... करत राहिली, लिव्ह इन पार्टनरने गर्लफ्रेंडच्या मुलीची हत्या केली  
5
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तानचे संघ पुन्हा एकदा भिडणार? समजून घ्या IND vs PAKचे गणित
6
मनसे-शिवसेना युतीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; कोण किती जागा लढवणार? समोर आली माहिती
7
VIRAL VIDEO: चीनमधली खूप रील्स पाहिली असतील, पण भारतातील एअरपोर्टवर फूड डिलिव्हरी करणारा रोबो पाहिलात का?
8
Mumbai: सचिन तेंडुलकरच्या हस्ते दादरच्या शिवाजी पार्क जिमखान्याचे लोकार्पण!
9
Navratri 2025: नवरात्रीच्या पहिल्या दिवशी करूया स्मरण आणि मानसपूजन देवी शैलपुत्रीचे!
10
दुर्दैवी अंत! ज्याच्या इशाऱ्यावर 'वाघ' उठबस करायचा, त्याच मालकाला वाघाने टेन्शनमध्ये शिकार बनवलं
11
पाकिस्तानी सैन्याने त्यांच्याच देशात हवाई हल्ला केला, महिला मुलांसह ३० नागरिकांचा मृत्यू
12
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची गाडी अज्ञात व्यक्तीने पेटवली; जालन्यातील घटना
13
"हो आम्ही पालक झालो आहोत", अखेर भूषणने उलगडलं केतकीसोबतच्या 'त्या' फोटोचं गुपित
14
पराभव दिसू लागताच पाकिस्तानी प्रेक्षक पळू लागले, भारतीय तरुणीने भर स्टेडियममध्ये डिवचले, म्हणाली...  
15
GST 2.0 Price List : स्कूटर ते होंडा ३५०... हॅचबॅकपासून लक्झरी SUV पर्यंत, GST कपातीमुळे कार-बाईक स्वस्त; पाहा संपूर्ण यादी
16
तुम्हाला फावल्या वेळेत नखं खाण्याची सवय असेल तर आताच सोडा; डॉक्टरांचा धोक्याचा इशारा
17
एका महिलेचा कॉल अन् करोडपती बँकरला २३ कोटींचा गंडा; एक महिन्यासाठी केले डिजिटल अरेस्ट
18
Tata ची मोठी घोषणा; चार वर्षांपूर्वीच्या किमतीवर मिळणार कार, जाणून घ्या नवीन दर...
19
Monsoon update: यंदाची दिवाळी पावसातच जाणार का? मान्सून भारतातून कधी परत जाणार?
20
Video - हायव्होल्टेज ड्रामा! लग्नाचं वेड, जीवाशी खेळ; गर्लफ्रेंड न भेटल्याने 'तो' टॉवरवर चढला

वन्यप्राण्यांकडून कोवळी पिके फस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:13 IST

ताडबोरगाव परिसरातील किन्होळा, आटोळा, सोमठाणा, देवलगावसह परिसरातील बहुतांश गावांमध्ये मृग नक्षत्रात झालेल्या पेरणीमुळे यंदा शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. परंतु, ...

ताडबोरगाव परिसरातील किन्होळा, आटोळा, सोमठाणा, देवलगावसह परिसरातील बहुतांश गावांमध्ये मृग नक्षत्रात झालेल्या पेरणीमुळे यंदा शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. परंतु, पिकांचे अंकुरण होऊन कोवळ्या पिकांनी डोकेवर काढताच या भागातील रोही व हरणांचे कळप पिकांचे शेंडे फस्त करत आहेत. त्यामुळे दुबार लागवडीच्या खर्चाबरोबरच नंतरही पिकांच्या उत्पादनात घट होऊन शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होते. या भागात कुठेही माळरान, दाट झाडीची पडिक जमीन नसल्यामुळे या वन्य प्राण्यांचे कळप चारा पाण्याच्या शोधात सतत फिरून शेतीचे नुकसान करत असल्याने शेतकऱ्यांची मोठी डोकेदुखी वाढली आहे. पिकांच्या संरक्षणासाठी शेतकरीवर्गाला सकाळी भल्या पहाटेपासून रात्रीपर्यंत शेतातच थांबावे लागत आहे. सततच्या सहवासाने हे वन्य प्राणीदेखील निर्भीड झाले असून, कितीही हाकलले तरी फिरून पुन्हा शेतावर येतात. त्यामुळे शेतकऱ्यांची झोप उडाली आहे. वन विभागाने याचा बंदोबस्त करावा, याबाबत अनेकदा अर्ज करूनही वन विभागाला याचे कुठलेही सोयरसुतक नसल्याचे दिसून येत आहे.

शेतकऱ्यांचा खर्च वाढला

शेतीत मशागत, पेरणी, खते, बियाणे औषधे, काढणी, मळणी याबरोबरच आता पिकांच्या संरक्षणाचा खर्च वाढला आहे. शेतकऱ्यांना वन्य प्राण्यांपासून पिकाचे संरक्षण करण्यासाठी शेताला कुंपण करणे, जाळ्या लावणे, याबरोबरच रात्रीच्या वेळी पहारा देण्यासाठी राखणदार लावणे अनिवार्य झाल्याने शेतकऱ्यांवर हा अधिकचा आर्थिक भुर्दंड पडून त्यांच्या खर्चात वाढ झाली आहे.

"पहिले कापसाचे पीक फस्त केल्यानंतर पाच एकरवर दुबार लागवड करूनही पीक संरक्षणासाठी आता दिवस रात्र राखण करावी लागत आहे.

नितीन खरवडे, शेतकरी किन्होळा

वनविभाग नावालाच

वन्य प्राण्यांपासून पिकांची नासाडी झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची तरतूद असली तरी त्यासाठी वन विभागाकडे अर्ज केल्यानंतर सदर प्रकरणाची शहानिशा संबंधित वनपाल अधिकारी, सरपंच, ग्रामसेवक, तलाठी व कृषी अधिकारी यांची समिती करते. त्यात पंचनामा करून पुरावे तपासून नुकसान क्षेत्राची मोजणी करत नुकसान मूल्य ठरवले जाते. परंतु तक्रार ,पंचनामा या गोष्टीसाठी वन विभागाकडे खेटे घालून मदत मिळेलच याची खात्री नसल्याने भरपाई मागणे म्हणजे ''रोगापेक्षा इलाज भयंकर'' अशी स्थिती असल्याने शेतकरी तक्रार देण्याच्या भानगडीत पडत नसल्याचे दिसते.