शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
Today's Horoscope : शेअर्स बाजारात लाभ होईल, आर्थिक स्थिती सुधारेल; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य काय?
3
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
4
अभियांत्रिकीचे यंदा विक्रमी १ लाख ६६ हजार प्रवेश; कॉम्प्युटर, आयटी, एआयच्या ८८ टक्के जागा भरल्या
5
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
6
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल
7
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
8
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
9
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
10
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
11
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
12
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
13
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
14
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
15
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
16
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
17
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
18
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
19
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
20
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...

उद्योग रुळावर, बेकार झालेले हात कामावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2020 17:00 IST

coronavirus unlock जे काही उद्योग टिकून होते, त्या उद्योगांना कोरोना संकटाचा मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला.

ठळक मुद्देजिल्ह्यात कृषी क्षेत्रावर आधारित उद्योग सुरुकाही प्रमाणात सिमेंट पाईप, पॅकेजिंगचे उद्योगही सुरू झाले आहेत.

- प्रसाद आर्वीकर

परभणी : कोरोना आणि लॉकडाऊननंतर जिल्ह्यातील उद्योग हळूहळू रुळावर येत असून, बेरोजगार झालेल्या कामगारांना हातांना पुन्हा काम मिळू लागले आहे. ही प्रक्रिया संथगतीने असली तरी सकारात्मकतेकडे नेणारी आहे.

जिल्ह्यात आधीच मोठ्या उद्योगांचा वाणवा आहे. जे काही उद्योग टिकून होते, त्या उद्योगांना कोरोना संकटाचा मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला. सहा महिन्यांच्या खंडानंतर जिल्ह्यात कृषी क्षेत्रावर आधारित सोयाबीन प्रक्रिया, ऑईल मील, दालमील, कृषी अभियांत्रिकी हे उद्योग सुरू झाले आहेत. काही प्रमाणात सिमेंट पाईप, पॅकेजिंगचे उद्योगही सुरू झाले आहेत. जिल्ह्यात परभणी, गंगाखेड आणि जिंतूर या ठिकाणच्या औद्योगिक वसाहतीतील परप्रांतीय कामगार परतू लागले आहेत. 

एकंदर आढावा घेतला असता, ४० टक्के कामगार परतले आहेत. स्थानिक कामगारांपैकीही ७० टक्के कामगारांच्या हाताला काम मिळत आहे. जिल्ह्यात कृषीवर आधारित उद्योगांची संख्या अधिक आहे. काही प्रमाणात इतर उद्योग चालविले जातात. त्यापैकीही अनेक उद्योजकांनी पुन्हा कंपन्या सुरू केल्या आहेत. असे असले तरी पूर्वीप्रमाणे अद्यापही गती प्राप्त झाली नाही. मात्र उद्योगांवर आधारित असलेल्या कामगारांच्या हाताला काम मिळू लागले असून, परस्थिती हळूहळू पूर्वपदावर आणण्यासाठी उद्योजक प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे ही समाधानाची बाब ठरत आहे. 

जिल्ह्यात 2000 कोटींचा फटका लॉकडाऊनच्या काळात जिल्ह्यातील औद्यागिक वसाहतींमधील  उद्योग जवळपास ठप्प होते. या काळात साधारणत: २ हजार कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. या शिवाय आंतर जिल्हा आणि आंतर राज्य वाहतूक बंद असल्याने साधारणत: दीडशे ते दोनशे कोटी रुपयांच्या निर्यातीला फटका बसला.

कृषी क्षेत्रातील उद्योग सुरू परभणी जिल्ह्यात कृषी व्यवसायावर आधारित उद्योगांची संख्या अधिक आहे. त्यात सोयाबीन प्रक्रिया, ऑईल मील, दालमील आणि औजारे बनविणारे उद्योग व्यवसाय सुरू झाले आहेत. याशिवाय टायर रिमोल्डींग आणि पॅकेजिंगचे उद्योगही सुरू झाले आहेत. 

बंद असलेला उद्योग सुरू केला आहे. सध्या पाहिजे तेवढी व्यवसायात गती नाही. मात्र कामगारांचा रोजगार निघेल या दृष्टीने सुरूवात केली आहे. -आनंद भगत, उद्योजक

लॉकडाऊननंतर दालमील सुरू केली आहे. सद्यस्थितीत उत्पादन मर्यादित आहे. हळूहळू त्यात वाढ करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यातून कामगारांनाही रोजगार मिळत आहे.-मनोज मुरक्या, उद्योजक

उद्योग सुरू झाले असले तरी अजून ते स्थिरावले नाहीत. शासनाने केलेल्या घोषणेप्रमाणे या उद्योजकांना भरीव मदत केल्यास हे उद्योग उभारी घेवू शकतील. -ओमप्रकाश डागा, उपाध्यक्ष, उद्योजक संघटना 

टॅग्स :Coronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉकparabhaniपरभणीMIDCएमआयडीसी