शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

किती शिक्षकांनी शाळेत जायचे रे भाऊ? शिक्षकांमध्ये संभ्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:12 IST

कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यात १५ जूनपासून शाळा सुरू झाल्या असल्या, तरी प्रत्यक्ष वर्ग सुरू करण्यास राज्य शासनाने ...

कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यात १५ जूनपासून शाळा सुरू झाल्या असल्या, तरी प्रत्यक्ष वर्ग सुरू करण्यास राज्य शासनाने परवानगी दिलेली नाही. तरीही शिक्षकांना अन्य शैक्षणिक कामे करण्यासाठी शाळेत उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यासंदर्भात शिक्षक संचालकांनी ५० टक्के शिक्षकांनी उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत, तर परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्राचा संदर्भ देऊन शिक्षणाधिकाऱ्यांनी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना १०० टक्के उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे नेमका कोणाचा आदेश मानावा, असा प्रश्न शिक्षकांना पडला आहे. प्रशासकीय पातळीवरूनच याबाबत स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी शिक्षकांमधून करण्यात येत आहे.

संचालकांच्या पत्राचे काय

पहिली ते नववी आणि अकरावीच्या वर्गाच्या सर्व शाळा, महाविद्यालयांत शिक्षकांची उपस्थिती ५० टक्के अनिवार्य राहील.

दहावी व बारावीच्या वर्गांना शिकवणाऱ्या शिक्षकांची उपस्थिती १०० टक्के राहील. तसेच सर्व मुख्याध्यापक आणि प्राचार्यांची उपस्थिती १०० टक्के राहील.

जि.प.च्या पत्राचे काय?

जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून शाळांमधील शिक्षकांची उपस्थिती १०० टक्के राहील.

कोरोनाच्या अनुषंगाने प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे सर्वांना अनिवार्य राहील.

शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी १०० टक्के उपस्थित राहून प्रशासनाच्या आदेशाचे पालन करावे.

ज्या जिल्ह्यांमध्ये संचारबंदी लागू आहे, त्या जिल्ह्यांमधील शिक्षकांच्या अनुषंगाने शिक्षण संचालकांचे आदेश आहेत. परभणी जिल्ह्यात संचारबंदी आदेश लागू नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करूनच शाळांमधील शिक्षकांची उपस्थिती १०० राहण्याचा आदेश काढला आहे.

- सुचेता पाटेकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी, परभणी

शाळेत विद्यार्थी उपस्थित नसल्यामुळे १०० टक्के शिक्षकांची आवश्यकता नाही. त्यामुळे कार्यालयीन कामकाजासाठी ५० टक्के शिक्षकांची उपस्थिती ठेवून ऑनलाईन अध्यापनाची प्रभावी अंमलबजावणी करावी.

- सनीदेवल जाधव, शिक्षक

शिक्षण संचालकांच्या आदेशाप्रमाणे शाळेत ५० टक्के उपस्थिती ठेवून ५० टक्के शिक्षकांकडून ऑनलाईन शिक्षणाची अंमलबजावणी करावी. त्यामुळे शिक्षक विद्यार्थांच्या संपर्कात येणार नाहीत. परिणामी दोघेही सुरक्षित राहतील.

- बळीराम जाधव, शिक्षक