शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
3
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
4
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
5
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
6
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
7
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
8
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
9
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
10
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
11
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
12
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
13
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
14
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
15
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
16
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
17
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
18
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
19
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
20
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
Daily Top 2Weekly Top 5

हरभरा उत्पादकांच्या खात्यावर पावणेदोन कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:16 IST

या वर्षीच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांनी ५ लाख २१ हजार हेक्टर क्षेत्रावर कापूस, सोयाबीन, उडीद व मूग आदी पिकांची ...

या वर्षीच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांनी ५ लाख २१ हजार हेक्टर क्षेत्रावर कापूस, सोयाबीन, उडीद व मूग आदी पिकांची पेरणी केली होती. मात्र सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे कापूस व सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे बळीराजा अडचणीत सापडला. मात्र अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांकडे उपलब्ध असलेल्या जलस्रोतांना मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध झाले. शेतकऱ्यांनी उपलब्ध झालेल्या या पाण्याचा रब्बी हंगामातील पिकांसाठी उपयोग करून घेतला. शेतकऱ्यांनी या वर्षी सर्वाधिक हरभरा पिकाची पेरणी केली. मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना हरभरा पिकाचे उत्पादन झाले. मात्र हा शेतमाल बाजारात विक्रीसाठी आल्यानंतर खाजगी व्यापाऱ्यांनी हमीभावाला फाटा देत कवडीमोल दराने खरेदी करण्यास सुरुवात केली. त्यानंतर शेतकरी, लोकप्रतिनिधी व विविध संघटनांनी जिल्ह्यात हमीभाव खरेदी केंद्र सुरू करावे, अशी मागणी राज्य शासनाकडे लावून धरली. त्यानंतर राज्य शासनाने महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनमार्फत जिल्ह्यातील ७ ठिकाणी हमीभाव खरेदी केंद्र सुरू केले. त्यानंतर १५ फेब्रुवारीपर्यंत ज्या शेतकऱ्यांना हरभरा विक्री करायचा आहे त्या शेतकऱ्यांनी हमीभाव खरेदी केंद्राकडे ऑनलाइन नोंदणी करण्याचे आवाहन केले. या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्ह्यातील ९ हजार ३४८ शेतकऱ्यांनी हमीभाव खरेदी केंद्रांकडे ऑनलाइन नोंदणी केली. त्यानंतर हमीभाव खरेदी केंद्रांनी २५ फेब्रुवारी ते १२ एप्रिल या काळात जिल्ह्यातील ४ हजार ५६० शेतकऱ्यांना आपला शेतमाल हमीभाव खरेदी केंद्रांकडे विक्रीस आणावा यासाठी मोबाइलवर एसएमएस पाठविले. त्यानंतर आतापर्यंत ५०५ शेतकऱ्यांकडून ५ हजार १९४ क्विंटल हरभऱ्याची खरेदी करण्यात आली. विशेष म्हणजे खरेदी केलेल्या ३२० शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर हमीभाव खरेदी केंद्रांनी खरेदी केलेल्या ३ हजार ४७५ क्विंटलची १ कोटी ७७ लाख २५ हजार ५० रुपयांची रक्कम वर्ग केली आहे. त्यामुळे या वर्षी हमीभाव खरेदी केंद्रांकडून ५ हजार १०० रुपये हमीभाव दराने हरभरा खरेदी केल्यानंतर त्याचा मोबदलाही वेळेत मिळत असल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.

अशी झाली खरेदी

परभणी जिल्ह्यात द महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनमार्फत ७ ठिकाणी हमीभाव खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली. या केंद्रांवर आतापर्यंत ५ हजार १९४ क्विंटल हरभऱ्याची खरेदी करण्यात आली आहे. यामध्ये परभणी येथील हमीभाव खरेदी केंद्रावर १ हजार ५९४ क्विंटल, जिंतूर येथे ३९७ क्विंटल, सेलू २३७, बोरी ४१९, पाथरी १ हजार ६२२ क्विंटल, पूर्णा ९२४ क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे सोनपेठ येथील हमीभाव खरेदी केंद्रावर आतापर्यंत केंद्र प्रशासनाला हमीभाव दराने हरभरा खरेदी करण्यास मुहूर्त मिळाला नसल्याचे दिसून येत आहे.

सात हमी केंद्रांवर झालेली नोंदणी

परभणी - ४२१९

जिंतूर - ७२२

सेलू - ७४२

बोरी - १५८५

पाथरी - ७५७

पूर्णा - ११२२

सोनपेठ - २०१

शेतकऱ्यांना पाठविलेले संदेश

परभणी - २२५०

जिंतूर - २४०

सेलू - ३३०

बोरी - १५८५

पाथरी - ७५७

पूर्णा - ११२२

सोनपेठ -