शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
3
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
4
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
5
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
6
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
7
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
8
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
9
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
10
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
11
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
12
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
13
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
14
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
15
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
16
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
17
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
18
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
19
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
20
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
Daily Top 2Weekly Top 5

विजेच्या समस्येमुळे शेतकरी त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:17 IST

जिल्ह्यातील नद्यांमध्ये वाढली अस्वच्छता परभणी : जिल्ह्यातील नद्यांच्या प्रदूषणाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. मागील वर्षी पावसाळ्यात नद्या प्रवाही ...

जिल्ह्यातील नद्यांमध्ये वाढली अस्वच्छता

परभणी : जिल्ह्यातील नद्यांच्या प्रदूषणाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. मागील वर्षी पावसाळ्यात नद्या प्रवाही असल्याने काही प्रमाणात प्रदूषण कमी झाले होते. मात्र, नदीपात्रातील पाणी कमी झाले असून, गाव परिसरातील कचरा, तसेच टाकाऊ वस्तू नदीपात्रात फेकल्या जातात. त्यामुळे नद्यांचे प्रदूषण वाढत आहे. शिवाय अवैध वाळू उपशामुळे नद्यांना डबक्याचे स्वरूप आले असून, पाणी प्रदूषित झाले आहे.

टरबूज, खरबुजांची वाढली आवक

परभणी : उन्हाळ्याला प्रारंभ होताच टरबूज आणि खरबुजांना मोठी मागणी वाढते. येथील बाजारपेठेतही टरबुजांची आवक वाढली आहे. त्याचप्रमाणे, द्राक्षे, चिकू या फळांचीही आवक वाढली आहे. मागील काही वर्षांपासून जिल्ह्यात चिकूची लागवड केली जात असून, उत्पादित माल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचविला जात आहे. त्यामुळे जिल्ह्यात आता फळांची विक्री मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

बसपोर्टचे काम गतीने सुरू

परभणी : येथील बस स्थानक भागात बसपोर्टचे काम गतीने सुरू करण्यात आले आहे. मागील सहा महिन्यांपासून बिलाअभावी हे काम ठप्प पडले होते. त्यामुळे बसपोर्टची उभारणी वेळेत होते की नाही, अशी शंका प्रवाशांत व्यक्त केली जात होती. मात्र, महामंडळ प्रशासनाने कंत्राटदाराचे बिल अदा केल्याने आता हे काम सुरू करण्यात आले आहे. प्रशासनाने निधी अभावी काम बंद पडू नये, यासाठी आधीच निधीची तरतूद करुन ठेवावी, अशी जिल्हावासीयांची मागणी आहे.

जिल्हा स्टेडियममधील स्वच्छतागृह बंद

परभणी : येथील जिल्हा स्टेडियम परिसरातील स्वच्छतागृह बंद असल्याने खेळाडूंची मोठी गैरसोय होत आहे. स्टेडियम परिसरात अद्ययावत असे स्वच्छतागृह उभारण्यात आले. मात्र, या स्वच्छतागृहाची देखभाल केली जात नसल्याने दुरवस्था झाली आहे. त्यामुळे खेळाडूंची कुचंबणा होत आहे. जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी स्टेडियम भागातील स्वच्छतागृह सुरू करावे, अशी मागणी खेळाडूंतून केली जात आहे.

रब्बीचा शेतमाल घरातच पडून

परभणी : जिल्ह्यात रब्बी हंगामातील पिकांची काढणी पूर्ण झाली असून, शेतमाल सध्या तरी घरातच पडून आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे संचारबंदी लागू करण्यात आल्याने, त्याचा परिणाम बाजार समितीच्या कारभारावर झाला आहे. बाजार समिती भागात मोठ्या प्रमाणात आवक घटली आहे. त्यामुळे बाजार समिती प्रशासनाचे आर्थिक नुकसान होत आहे. त्याचप्रमाणे, शेतकऱ्यांनाही आर्थिक अडचणी सहन कराव्या लागत आहेत.