शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळी एकत्र साजरी करू, पण अजित पवारांना पुन्हा पक्षात नो एंट्री; शरद पवारांनी परतीचे दरवाजे बंद केले...
2
सुप्रियाने पवार-सुळे असे नाव लावले असते तर..? शरद पवारांनी सांगितला तिने घेतलेला एक निर्णय...
3
आजचे राशीभविष्य - ०९ मे २०२४ : आर्थिक फायदा संभवतो,विवाहेच्छुकांचे विवाह ठरू शकतील
4
महागाईवर सर्वात खळबळजनक रिपोर्ट; तीन वर्षांत कुटुंबांची घरगुती बचत ९ लाख कोटींनी घटली
5
साताऱ्याच्या बदल्यात राज्यसभा मिळाली! पार्थ पवारांना दिल्लीत पाठविण्यावर अजित पवारांचे मोठे संकेत
6
...म्हणून दक्षिण मुंबईची जागा लढवली नाही; मनसे नेते बाळा नांदगावकर यांचा खुलासा
7
अदानी-अंबानींकडून टेम्पाेने पैसा आला का? मोदींच्या सवालावर राहुल गांधींचे चोख प्रत्युत्तर...
8
नावात काय आहे? विचारत हायकोर्टाने फेटाळल्या नामांतराविरोधातील याचिका
9
कर्मचारी सुट्टीवर; विमाने जमिनीवर; ‘एअर इंडिया एक्स्प्रेस’ची ९० उड्डाणे रद्द
10
मी ठाण मांडून बसलो, म्हणजे करेक्ट कार्यक्रम होणार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
11
शाळेत अ‍ॅडमिशन मिळणार का? न्यायालयात स्थगितीनंतर आरटीई ऑनलाइन अर्जाला ब्रेक, पालक अस्वस्थ 
12
हेड, अभिषेकने घातला धुमाकूळ; लखनौचा पाडला फडशा; हैदराबादचा १० गड्यांनी दणदणीत विजय
13
तीन वर्षांनंतर भारतात खेळणार नीरज; राष्ट्रीय फेडरेशन चषक स्पर्धेची उत्सुकता शिगेला
14
पूर्वेकडचे लोक चिनी, दक्षिणेतील आफ्रिकींसारखे; सॅम पित्रोदा यांचे वादग्रस्त उद्गार; काँग्रेसने घेतला राजीनामा
15
राज्यात लोकसभेनंतर रंगणार शिक्षक, पदवीधर निवडणूक; १० जूनला मतदान, १३ जूनला निकाल
16
महादेव ॲपशी निगडित १ हजार कोटी शेअर्समध्ये? बनावट कंपन्यांद्वारे गुंतवणुकीचा संशय
17
महिनाभरात २२ लाख वाहनांची विक्री; २७ टक्के वाढ;  देशभरातील खरेदीदारांमध्ये प्रचंड उत्साह
18
टेनिस बॉल क्रिकेटमधून शिकलो ‘सुपला शॉट’; सूर्यकुमार यादवने सांगितली आठवण; आपसूक मारला जातो हा फटका
19
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
20
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर

परभणीत पीक विम्यासाठी शेतकऱ्यांचे उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 4:20 PM

रिलायन्स पीक विमा कंपनीने गैरप्रकार करीत जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांना पीक विम्याच्या लाभापासून वंचित ठेवल्याने अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपषोणाला प्रारंभ केला आहे. 

परभणी : रिलायन्स पीक विमा कंपनीने गैरप्रकार करीत जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांना पीक विम्याच्या लाभापासून वंचित ठेवल्याने अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपषोणाला प्रारंभ केला आहे. 

पंतप्रधान पीक विमा संघर्ष समितीचे समन्वयक डॉ.सुभाष कदम, जि.प.सदस्य श्रीनिवास जोगदंड, कॉ.राजन क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन केले जात आहे. आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास जिल्हाभरातील शेतकरी परभणीत दाखल झाले. येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या शेतकऱ्यांनी उपोषणाला प्रारंभ केला आहे. महाराष्ट्र शासनाच्या कृषी संचालनालयाच्या सांख्यिकी विभागाने पीक विम्याचा घटक मंडळ ऐवज तालुका गृहित धरल्याने जिल्ह्याचे १०० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. महसूल व कृषी विभागातील अधिकाऱ्यांच्या अविश्वासामुळे क्षेत्रसुधार गुणांक  लावल्याने ५४ कोटी २४ लाख ४२ हजार ३०० रुपयांचे नुकसान शेतकऱ्यांना सहन करावे लागले. 

पीक कापणी प्रयोगात जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाने हलगर्जीपणा केला. तर रिलायन्स पीक विमा कंपनीने बेकायदेशीररित्या हस्तक्षेप करुन कृषी विभागाने दिलेले आकडे न मानता मनमानी पद्धतीने निर्धारित उत्पन्नाच्या आकड्यांचा आधार घेऊन ५० कोटी ८३ लाख ६१ हजार २३२ रुपयांचे नुकसान केले. 

या सर्व प्रकारातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांची २०५ कोटी ८० लाख ३ हजार ५६८ रुपयांची फसवणूक शासनाने केली आहे. त्यापैकी १४ महसूल मंडळातील ९० हजार शेतकऱ्यांची ५० कोटी ८३ लाख ६१ हजार २३२ रुपयांची फसवणूक विमा कंपनीकडून झाल्याचा दावा आंदोलकांनी केला आहे. या प्रकरणात आंदोलनकर्त्यांकडून पुरावेही सादर करण्यात आले आहेत. तेव्हा शेतकऱ्यांच्या कोट्यवधींच्या नुकसानी प्रकरणी जिल्हा प्रशासन रिलायन्स कंपनी आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरावे, अशी मागणी या आंदोलकांमार्फत करण्यात आली. जि.प.सदस्य डॉ. सुभाष कदम, श्रीनिवास जोगदंड, कॉ.राजन क्षीरसागर, उद्धवराव काळे यांच्यासह जिल्हाभरातील शेतकरी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. आंदोलनादरम्यान आ.डॉ. मधुसूदन केंद्रे यांनी शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या.

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाFarmerशेतकरीParabhani collector officeजिल्हाधिकारी कार्यालय परभणी