शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
3
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
4
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
5
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
6
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
7
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
8
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
9
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
10
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
11
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
12
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
13
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
14
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
15
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
16
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
17
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
18
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
19
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
20
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"

परभणी जिल्ह्यात फरदडमुक्त अभियान कागदावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 1:03 AM

कापसाच्या पिकावर बोंडअळीचा प्रादूर्भाव होऊ नये, यासाठी कृषी विभागाने राबविलेले फरदडमुक्त गाव अभियान कागदावरच असल्याचे समोर येत आहे. जिल्ह्यातील केवळ २ गावांमध्ये ७० ते ८० टक्के अभियान यशस्वी झाल्याचे कृषी विभागाचेच म्हणणे असल्याने उर्वरित गावांमध्ये या अभियानाचा बोजवारा उडाल्याचे दिसत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : कापसाच्या पिकावर बोंडअळीचा प्रादूर्भाव होऊ नये, यासाठी कृषी विभागाने राबविलेले फरदडमुक्त गाव अभियान कागदावरच असल्याचे समोर येत आहे. जिल्ह्यातील केवळ २ गावांमध्ये ७० ते ८० टक्के अभियान यशस्वी झाल्याचे कृषी विभागाचेच म्हणणे असल्याने उर्वरित गावांमध्ये या अभियानाचा बोजवारा उडाल्याचे दिसत आहे.कापूस हे जिल्ह्यातील नगदी पीक म्हणून ओळखले जाते. सर्वच शेतकरी कापसाची लागवड करतात. मात्र दोन वर्षांपासून कापसावर बोंडअळीचा प्रादूर्भाव उद्भवत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. २०१७ च्या हंगामात कापसावर गुलाबी बोंडअळीचा प्रादूर्भाव झाला.१ ते २ वेचण्या झाल्यानंतर कापसाच्या झाडाला पाने, फुले लागत नव्हती. त्यामुळे सर्वच पीक बोंडअळीच्या प्रादूर्भावाने वाळून जात होते. २०१८ च्या हंगामातही हीच परिस्थिती निर्माण झाली. ज्या शेतकऱ्यांनी कापसाचे उत्पादन घेतले, त्यापैकी बहुतांश शेतकºयांच्या कापसावर बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून आला.बोंडअळीचे कायमस्वरुपी उच्चाटन करण्यासाठी कापसाचे पºहाटी उपटून काढणे हा शास्त्रोक्त पर्याय असून कृषी विभागाने यासाठी विशेष अभियान राबविले. गावा-गावात जावून कापूस पिकातील फरदड उपटून काढण्याची मोहीम राबविली.यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करणे अपेक्षित होते. कृषी विभागातील अधिकाºयांनी गावा-गावात जाऊन शेतकºयांना या अभियानाचे महत्त्व पटवून दिले असते तर मोठ्या प्रमाणात गावे फरदडमुक्त झाली असती. मात्र हे अभियान कागदोपत्रीच राबविल्याने अनेक गावांमध्ये फरदडमुक्ती झाली नाही. त्यामुळे पुढील वर्षीच्या हंगामातही बोंडअळीचा प्रादुर्भाव उद्भवण्याचा धोका कायम असल्याचे दिसत आहे.१५ हजार हेक्टरवरच नवीन पिकेकृषी विभागाने १४ नोव्हेंबर २०१८ पासून फरदडमुक्त गाव अभियानाला सुरुवात केली. त्यानंतर या अभियानाचा लेखाजोखा देणारी माहिती कृषी विभागाने तयार केली आहे. जिल्ह्यामध्ये १ लाख ९९ हजार ८६९ हेक्टरवर कापूस पिकाची लागवड झाली होती. त्यातील १ लाख ७० हजार हेक्टर कोरडवाहू तर १९ हजार ८६९ हेक्टर बागायती पिकामध्ये मोडते. कापसाची लागवड १ लाख हेक्टरवर झाली असली तरी प्रत्यक्षात कापूस फरदड काढल्याने रिकाम्या झालेल्या केवळ १५ हजार हेक्टरवर रब्बी हंगामामध्ये हरभरा, ज्वारीची लागवड करण्यात आली. तर परभणी तालुक्यातील सूरपिंपरी आणि सोन्ना ही दोनच गावे ७० ते ८० टक्के फरदडमुक्त केल्याचे कृषी विभागाने म्हटले आहे. त्यामुळे इतर गावांमध्ये राबविलेल्या मोहिमेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.घडी पत्रिकांतून जनजागृतीबोंडअळीचा प्रश्न गंभीर असतानाही प्रत्यक्ष शेतावर जावून जनजागृती झाली नाही. शेतकºयांना फरदडमुक्तीचे महत्त्व पटवून देण्यासाठी कृषी विभागातील तज्ज्ञांनी शेतकºयांशी संवाद साधणे अपेक्षित होते.मात्र केवळ घडी पत्रिकांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. सुमारे ५ हजार घडीपत्रिका जिल्ह्यामध्ये वाटप केल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे. प्रत्यक्षात गावोगावी जावून फरदडमुक्ती केली असती तर बोंडअडळीचा धोका कमी झाला असता; परंतु, कागदोपत्री अभियान राबविल्याने पुढील वर्षीच्या हंगामातही बोंडअळीचा प्रादूर्भाव होण्याची भिती निर्माण झाली आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरीcottonकापूस