शहरं
Join us  
Trending Stories
1
कोण होणार नवीन पोलिस महासंचालक?; सदानंद दाते यांच्या नावाची चर्चा, केंद्राकडे नावे पाठवली
2
अनंतच्या अनैतिक संबंधाची खात्री झाल्याने ‘ती’  खचली; एकदा अचानक आई वडील घरी पोहचले, तेव्हा...
3
‘टीईटी’चा पेपर ३ लाखांत, शिक्षकांची टोळीच जेरबंद; कोल्हापुरात शिक्षकी पेशाला काळीमा
4
बिना ड्रायव्हरच्या कारपेक्षा त्याची टेक्नॉलॉजी भारतासाठी महत्त्वाची; इस्रायली उद्योगपतींशी चर्चा
5
पाक खोटे बोलतोय...फ्रान्सने केला पर्दाफाश; जगाकडूनही खावी लागली चपराक, काय केला खोटा दावा?
6
कमळावर जाे उभा त्याला मतदान करा; भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे स्वबळाचे संकेत?
7
मुंबईत तब्बल ११ लाख दुबार नावे आढळली; मतदार याद्यांमध्ये प्रचंड घाेळ, BMC कडे तक्रारींचा पाऊस
8
गुरुवारी दत्त जयंती २०२५: ११ दिवस सेवा करा, नक्की फल मिळेल; काळजी सोडा, स्वामी शुभच करतील!
9
संतापजनक! सोयाबीनची भाजी केली म्हणून पतीने पत्नीचे डोके फोडले; सिद्धार्थनगरमध्ये हादरवणारी घटना
10
बिबट्या पुण्याच्या वेशीवर; पहाटे पहाटे औंधमध्ये  बिबट्याचे दर्शन; पुणे शहरात खळबळ, वनविभाग आणि RESQ सतर्क
11
“काँग्रेसच्या विकासकांमाची यादी करायची तर कागद संपतो, भाजपाने मात्र...”: हर्षवर्धन सपकाळ
12
IND vs SA 2nd Test Day 2 Stumps : धोक्याची घंटा वाजली! टीम इंडिया पलटवार करू शकेल का?
13
६, ९, ५, २२ अन् २५ हे केवळ अंक नाहीत, अयोध्या राम मंदिराशी खास कनेक्शन; तुम्हाला माहितीये?
14
"महिलेचा गर्भपात, पती म्हणून अनंत गर्जेंचे नाव"; डॉक्टर गौरींना मिळाली होती कागदपत्रे, प्रकरणाला धक्कादायक वळण
15
Smriti Mandhana Wedding Postponed: वडिलांची तब्येत बिघडली; स्मृतीनं घेतला लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय
16
"अनंतचा फोन आलेला, खूप रडत होता; त्याने मला सांगितलं की..."; गौरी पालवे प्रकरणावर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
17
Video - क्लिनिकबाहेर उभ्या असलेल्या डॉक्टरला आला हार्ट अटॅक, खाली कोसळला अन्...
18
“भाजपाने सुसंस्कृत राजकारण सोडले, सरकार नैतिक कर्तव्य विसरले”; सुप्रिया सुळेंची टीका
19
भारताच्या तेल पुरवठ्यावर अमेरिकेचा मोठा 'बॅन'; रशियाकडून मिळणारे ४०% स्वस्त तेल आता कमी होणार?
20
सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच मिळणार फायदे! नवीन लेबर कोडमुळे कामगारांना मिळणार मोठा आधार
Daily Top 2Weekly Top 5

महामारीत हजारो लोकांचे पोट भरले; अनुदानासाठी मात्र पंधरा दिवसांचा विलंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:13 IST

परभणी : कोरोनाच्या संकट काळात गोरगरीब नागरिकांना पोटभर अन्न मिळाले खरे, मात्र ही योजना राबविणाऱ्या कंत्राटदारांना वेळेत अनुदान मिळत ...

परभणी : कोरोनाच्या संकट काळात गोरगरीब नागरिकांना पोटभर अन्न मिळाले खरे, मात्र ही योजना राबविणाऱ्या कंत्राटदारांना वेळेत अनुदान मिळत नसल्याने पुढील महिन्याचे नियोजन करताना कसरत करावी लागत आहे. अनुदान वितरणातील किचकट प्रक्रिया दूर करण्याची अपेक्षा आता कंत्राटदारांकडून व्यक्त केली जात आहे.

कोरोनाच्या संसर्गामुळे लॉकडाऊन असल्याने गोरगरीब नागरिकांचे अन्नासाठी हाल होऊ नयेत. त्यांना वेळेवर जेवण मिळावे या उद्देशाने जिल्हा आणि तालुक्याच्या ठिकाणी शिवभोजन थाळी केंद्र सुरू करण्यात आले. या केंद्रावर सुरुवातीला माफक दरात शिवभोजन थाळी दिली जात होती. लॉकडाऊन काळातील परिस्थिती पाहून शासनाने गरजू नागरिकांसाठी ही शिवभोजन थाळी मोफत सुरू केली. जिल्ह्यात एकूण १४ केंद्रांवरून ही योजना राबिवली जाते.

त्यामुळे जिल्ह्यातील गोरगरीब नागरिकांना मोफत जेवण उपलब्ध होते. मात्र, हे जेवण देण्याचे कंत्राट मिळालेल्या कंत्राटदारांना योजनेसाठी असलेले अनुदान मिळण्यासाठी पंधरा ते २० दिवसांचा विलंब लागत आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यात एकाही कंत्राटदाराचे अनुदान रखडले नाही. मात्र, ते वेळेत मिळत नसल्याने कंत्राटदारांची अडचण होत आहे. शिवभोजन देण्यासाठी किराणा, भाजीपाला खरेदी करताना आर्थिक अडचणी जाणवत आहेत. त्यामुळे अनुदान नियमित वितरित करण्याची सुविधा करणे आवश्यक आहे.

प्रति थाळी ४० रुपये अनुदान

शिवभोजन थाळी केंद्र योजनेंतर्गत ५० रुपयांना जेवण दिले जाते. त्यात १० रुपये लाभार्थ्याकडून आणि ४० रुपये शासनाकडून अनुदान प्राप्त होते. लॉकडाऊन काळापुरते लाभार्थ्याचे १० रुपयेही राज्य शासनाकडून अनुदान स्वरूपात दिले जात असून, लाभार्थ्यांना थाळी मोफत दिली जात आहे.

तपासणीच्या प्रक्रियेमुळे अनुदानास विलंब

शिवभोजन थाळी केंद्र चालकांना अनुदान वितरित करण्यासाठी त्यांना नियमित बिले सादर करावी लागतात. प्रत्येक लाभार्थ्याचे नाव, त्याच्या फोटोसह हे बिल तहसील कार्यालयात दिले जाते. तहसील कार्यालयात तपासणी होऊन ते जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयात दाखल केले जाते. सर्व तपासणी झाल्यानंतरच लाभार्थ्याच्या खात्यावर देयक जमा होते. या प्रक्रियेला पंधरा ते २० दिवसांचा विलंब लागत आहे. त्याचा भार मात्र केंद्र चालकांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे ही किचकट प्रक्रिया सोपी करून लाभार्थ्यांना प्रत्येक महिन्याच्या ७ तारखेलाच देयक मिळावे, अशी केंद्र चालकांची अपेक्षा आहे.

बिले मिळण्यास अनेक वेळा विलंब होतो. त्यामुळे किराणा माल, भाजीपाला खरेदी करताना तो उधारीत करावा लागतो. ही बाब परवडणारी नाही. वेळेत बिले मिळाल्यास आर्थिक अडचणी दूर होऊ शकतात.

शिवभोजन थाळी योजनेंतर्गत अनुदान मिळण्यास विलंब होतो. त्यामुळे आमची आर्थिक गणिते बिघडून जातात. अनुदानाची रक्कम प्रत्येक महिन्यास ठराविक तारखेला देण्याची व्यवस्था करावी.

प्रत्येक तहसील कार्यालयात केंद्र चालक बिले दाखल करतात. त्यांच्याकडून प्रत्येक फोटोनुसार तपासणी होऊन देयक जिल्हा कार्यालयात दाखल केले जाते. तपासणीसाठी अवधी लागतो. केंद्र चालकांकडून अनेक वेळा विलंबाने देयके दाखल केली जातात. त्यामुळेही देयक अदा करताना विलंब होतो. मात्र, कोणाचेही देयक रखडलेले नाही.

-मंजूषा मुथा, जिल्हा पुरवठा अधिकारी.