शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
2
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
3
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
4
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
5
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
6
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
7
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
8
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
9
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
10
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
11
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
12
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
13
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."
14
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
15
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
16
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
17
“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती
18
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
19
VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...
20
बगरम हवाई तळावर अमेरिकेचा 'डोळा'; ट्रम्प यांना आता का हवंय अफगाणिस्तानचं 'एअरफील्ड'?

महामारीत हजारो लोकांचे पोट भरले; अनुदानासाठी मात्र पंधरा दिवसांचा विलंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:13 IST

परभणी : कोरोनाच्या संकट काळात गोरगरीब नागरिकांना पोटभर अन्न मिळाले खरे, मात्र ही योजना राबविणाऱ्या कंत्राटदारांना वेळेत अनुदान मिळत ...

परभणी : कोरोनाच्या संकट काळात गोरगरीब नागरिकांना पोटभर अन्न मिळाले खरे, मात्र ही योजना राबविणाऱ्या कंत्राटदारांना वेळेत अनुदान मिळत नसल्याने पुढील महिन्याचे नियोजन करताना कसरत करावी लागत आहे. अनुदान वितरणातील किचकट प्रक्रिया दूर करण्याची अपेक्षा आता कंत्राटदारांकडून व्यक्त केली जात आहे.

कोरोनाच्या संसर्गामुळे लॉकडाऊन असल्याने गोरगरीब नागरिकांचे अन्नासाठी हाल होऊ नयेत. त्यांना वेळेवर जेवण मिळावे या उद्देशाने जिल्हा आणि तालुक्याच्या ठिकाणी शिवभोजन थाळी केंद्र सुरू करण्यात आले. या केंद्रावर सुरुवातीला माफक दरात शिवभोजन थाळी दिली जात होती. लॉकडाऊन काळातील परिस्थिती पाहून शासनाने गरजू नागरिकांसाठी ही शिवभोजन थाळी मोफत सुरू केली. जिल्ह्यात एकूण १४ केंद्रांवरून ही योजना राबिवली जाते.

त्यामुळे जिल्ह्यातील गोरगरीब नागरिकांना मोफत जेवण उपलब्ध होते. मात्र, हे जेवण देण्याचे कंत्राट मिळालेल्या कंत्राटदारांना योजनेसाठी असलेले अनुदान मिळण्यासाठी पंधरा ते २० दिवसांचा विलंब लागत आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यात एकाही कंत्राटदाराचे अनुदान रखडले नाही. मात्र, ते वेळेत मिळत नसल्याने कंत्राटदारांची अडचण होत आहे. शिवभोजन देण्यासाठी किराणा, भाजीपाला खरेदी करताना आर्थिक अडचणी जाणवत आहेत. त्यामुळे अनुदान नियमित वितरित करण्याची सुविधा करणे आवश्यक आहे.

प्रति थाळी ४० रुपये अनुदान

शिवभोजन थाळी केंद्र योजनेंतर्गत ५० रुपयांना जेवण दिले जाते. त्यात १० रुपये लाभार्थ्याकडून आणि ४० रुपये शासनाकडून अनुदान प्राप्त होते. लॉकडाऊन काळापुरते लाभार्थ्याचे १० रुपयेही राज्य शासनाकडून अनुदान स्वरूपात दिले जात असून, लाभार्थ्यांना थाळी मोफत दिली जात आहे.

तपासणीच्या प्रक्रियेमुळे अनुदानास विलंब

शिवभोजन थाळी केंद्र चालकांना अनुदान वितरित करण्यासाठी त्यांना नियमित बिले सादर करावी लागतात. प्रत्येक लाभार्थ्याचे नाव, त्याच्या फोटोसह हे बिल तहसील कार्यालयात दिले जाते. तहसील कार्यालयात तपासणी होऊन ते जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयात दाखल केले जाते. सर्व तपासणी झाल्यानंतरच लाभार्थ्याच्या खात्यावर देयक जमा होते. या प्रक्रियेला पंधरा ते २० दिवसांचा विलंब लागत आहे. त्याचा भार मात्र केंद्र चालकांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे ही किचकट प्रक्रिया सोपी करून लाभार्थ्यांना प्रत्येक महिन्याच्या ७ तारखेलाच देयक मिळावे, अशी केंद्र चालकांची अपेक्षा आहे.

बिले मिळण्यास अनेक वेळा विलंब होतो. त्यामुळे किराणा माल, भाजीपाला खरेदी करताना तो उधारीत करावा लागतो. ही बाब परवडणारी नाही. वेळेत बिले मिळाल्यास आर्थिक अडचणी दूर होऊ शकतात.

शिवभोजन थाळी योजनेंतर्गत अनुदान मिळण्यास विलंब होतो. त्यामुळे आमची आर्थिक गणिते बिघडून जातात. अनुदानाची रक्कम प्रत्येक महिन्यास ठराविक तारखेला देण्याची व्यवस्था करावी.

प्रत्येक तहसील कार्यालयात केंद्र चालक बिले दाखल करतात. त्यांच्याकडून प्रत्येक फोटोनुसार तपासणी होऊन देयक जिल्हा कार्यालयात दाखल केले जाते. तपासणीसाठी अवधी लागतो. केंद्र चालकांकडून अनेक वेळा विलंबाने देयके दाखल केली जातात. त्यामुळेही देयक अदा करताना विलंब होतो. मात्र, कोणाचेही देयक रखडलेले नाही.

-मंजूषा मुथा, जिल्हा पुरवठा अधिकारी.