शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

पॉलिटेक्निकला प्रवेश क्षमतेच्या निम्म्याच विद्यार्थ्यांचे नोंदणी अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:13 IST

परभणी : व्यावसायिक अभ्यासक्रम असलेल्या तंत्रनिकेतन प्रवेशासाठी आतापर्यंत एकूण प्रवेश क्षमतेच्या ५० टक्केच विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. यावर्षीच्या अर्जांची ...

परभणी : व्यावसायिक अभ्यासक्रम असलेल्या तंत्रनिकेतन प्रवेशासाठी आतापर्यंत एकूण प्रवेश क्षमतेच्या ५० टक्केच विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. यावर्षीच्या अर्जांची संख्या पाहता, विद्यार्थ्यांचा ओढा वाढेल, अशी आशा या क्षेत्रातील तज्ज्ञांना आहे.

जिल्ह्यात एक शासकीय आणि दोन खाजगी तंत्रनिकेतन महाविद्यालये आहेत. जिंतूर येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात १८० जागा आहेत. तर तीनही तंत्रनिकेतनमध्ये मिळून ६०० जागा आहेत. मात्र प्रवेश क्षमतेच्या तुलनेत मागील वर्षी सुमारे ५० टक्क्यांपेक्षा अधिक जागा रिक्त होत्या. त्यामुळे यंदा किती विद्यार्थी तंत्रनिकेतनसाठी प्रवेश घेतात, याकडे लक्ष लागले आहे.

तंत्रनिकेतन प्रवेशासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. आतापर्यंत दहावी परीक्षेचा निकाल लागला नसल्याने प्रवेश नोंदणीसाठी म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. मात्र निकाल लागल्यानंतर हळूहळू तंत्रनिकेतनसाठी नोंदणी होऊ लागली आहे.

उपलब्ध झालेल्या माहितीनुसार आतापर्यंत ३११ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. २३ जुलै ही प्रवेश अर्ज भरण्याची अंतिम मुदत असून, नोंदणीसाठी मुदतवाढ मिळेल. त्यामुळे नोंदणीची संख्या वाढण्याची आशा व्यक्त केली जात आहे.

दहावीच्या निकालानंतर वाढली गती

तंत्रनिकेतनच्या प्रवेश प्रक्रियेसाठी दहावीच्या निकालाची अडचण होती. आता दहावी परीक्षेचा निकालही जाहीर झाला आहे.

हा निकाल जाहीर झाल्यानंतरच विद्यार्थी नोंदणी करण्यासाठी पुढे येत आहेत.

सध्या तरी केवळ राखीव विद्यार्थ्यांचीच अडचण आहे.

राखीव जागेसाठी अडचण

तंत्रनिकेतनच्या प्रवेश नोंदणीसाठी आता केवळ दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. राखीव जागांवरुन प्रवेश घेण्यासाठी नॉन क्रिमीलेअर आणि कास्ट सर्टीफिकेट हे दोन प्रमाणपत्र लागतात.

दहावी परीक्षेचा निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांनी हे दोन्ही प्रमाणपत्र काढण्यासाठी प्रशासनाकडे अर्ज केले आहेत. मात्र प्रमाणपत्र वेळेत मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत.

नॉन क्रिमीलेअर आणि कास्ट सर्टीफिकेट विद्यार्थ्यांना वेळेत द्यावेत, यासाठी तंत्रनिकेतनच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पाठपुरावा केला आहे. त्यामुळे प्रक्रियेला गती मिळेल.

तंत्रनिकेतन महाविद्यालयातील विविध अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावेत, यासाठी मागील पंधरा दिवसांपासून विद्यार्थ्यांना विविध माध्यमातून मार्गदर्शन करण्यात आले.

व्हॉटस्‌ॲप आणि इतर माध्यमातून जिल्ह्यातील सुमारे १४ हजार विद्यार्थ्यांशी संपर्क साधण्यात आला आहे. या विद्यार्थ्यांना पॉलेटेक्नीक असलेले विविध कोर्सेस, त्याचा होणारा फायदा याविषयी माहिती दिली आहे.

प्रवेशासाठी आणखी दोन दिवसच शिल्लक असले तरी आगामी काळात नोंदणीची मुदत वाढेल. त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना प्रवेश नोंदणी करण्याची संधी मिळेल व गतवर्षीच्या तुलनेत प्रवेश वाढतील, अशी आशा तज्ज्ञांना आहे.

५० टक्के जागा होत्या रिक्त

जिंतूर येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये १८० प्रवेश क्षमता आहे. प्रत्यक्षात या ठिकाणी १०६ विद्यार्थ्यांचेच प्रवेश झाले होते. ४३ टक्के जागा रिक्त होत्या. तर परभणी आणि सेलू येथील तंत्रनिकेतन महाविद्यालयातही ५० टक्के जागा रिक्त राहिल्या होत्या.

मागील काही वर्षांपासून तंत्रनिकेतनच्या प्रवेशासाठी रायझिंग ट्रेंड आहे. साधारणत: दरवर्षी १५ टक्के प्रवेश वाढत आहेत. त्यामुळे यावर्षी देखील विद्यार्थ्यांचे प्रवेश वाढतील. एन.सी.एल. आणि कास्ट सर्टीफिकेटची अडचण दूर झाल्यानंतर नोंदणीला गती मिळेल. दहावीचे गुणपत्रक, टीसीची अडचण नाही.

- डॉ.किरण लाडाणे, प्राचार्य