शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

Drought In Marathwada : एका वेचणीत कापसाचा झाला झाडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 21:02 IST

सेलू तालुक्यातील नांदगावची लोकसंख्या ६०६ असून येथील ३६५ हेक्टरवर पिकाची लागवड केली जाते.

- मोहन बोराडेसेलू (जि. परभणी) 

मूग, सोयाबीन, कापूस करपले धन्याला पीक काढायला परवडना. मजुराला गावात काम मिळेना, पिण्याच्या पाण्यासाठी आताच वनवन करावी लागत आहे. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न उभा ठाकला आहे. दुष्काळाने गाव गाडाच हरवल्याचे चित्र सदर प्रतिनिधीने सेलू तालुक्यातील नांदगावला भेट दिल्यानंंतरच समोर आले. 

रबीच्या भरोशावर खरिपाची पेरणी करून जगाच्या पोशिंद्याने स्वप्न बघितली. शेती-भाती आणि घरदाराचे नियोजन केले. प्रचंड पाऊस येणार असल्याच्या हवामान खात्याच्या अंदाजावर खरिपाची पेरणी केली. सुरुवातीला पाऊस पडला. मात्र पीक बहरात येताच पाऊस गायब झाला. कापूस, सोयाबीन, मूग, तुरीने माना टाकल्या. पीक सुकू लागले. पाहता पाहता खरिपातील पीक शेतकऱ्यांच्या हातून गेले. कापूस एका वेचणीत बाद झाला. तर मूग, सोयाबीनने दगा दिला.

सेलू तालुक्यातील नांदगावची लोकसंख्या ६०६ असून येथील ३६५ हेक्टरवर पिकाची लागवड केली जाते. हे गाव सेलू व जिंतूर तालुक्याच्या सिमेवरचं. डोंगरावरच्या शेतीवर नशिब आजमावणारा कष्टाळू गावचा शिवार केवळ ६०० एकरचा आहे. कोणत्याही धरणाचे किंवा कालव्याचे या गावाला पाणी मिळत नाही. म्हणून पावसाच्या पाण्यावरच येथील शेतकरी अवलंबून आहेत. कापूस, ज्वारी, मूग, सोयाबीन व तूर या पारंपरिक पिकावरच गावच्या शेतकऱ्यांचा गावगाडा चालतो; परंतु, पावसाअभावी खरीप हंगाम हातून गेला आहे. परतीचा पाऊस बरसलाच नसल्याने रबीची पेरणी झालीच नाही. म्हणून शेतकरी हादरला आहे.

मोठ्या पेरणीअभावी आजही शेकडो एकर जमीन पडिक दिसत आहे. ज्वारी नसल्याने कडबा नसणार आहे. त्यामुळे जनावरांचा सांभाळ कसा करावा? या विवंचनेत शेतकरी आहे. सोयाबीनच्या भूशावर सध्या जनावरांची गुजरन केली जात आहे. भविष्यात या भागात चारा टंचाई जाणवनार याची चाहूल आत्ताच शेतकऱ्यांना लागू लागली आहे. पाणीपुरवठा करणारी विहीर कोरडी पडल्याने खाजगी विहिरीवरून ग्रामस्थांना पाणी आणावे लागत आहे. शिवारात एक महिना पुरेल एवढेच पाणी असल्याचे ग्रामस्थ सांगतात. म्हणून आगामी काळ भयंकर असणार आहे. असे असले तरी प्रशासनाकडून अद्यापपर्यंतरी कागदावरच नियोजन सुरु आहे. कागदावरचे नियोजन प्रत्यक्ष कृतीत कधी येईल, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

बळीराजा काय म्हणतो़ ?

- सोयाबीनला वाद्या लागल्या आणि पाऊस कायमचा थांबला. त्यामुळे सोयाबीन जागच्या जागी करपून गेले. दहा पोत्याच्या जागी एक पोत्याचा उतार आला. कसं जगावं? भगवंतालाच काळजी. - ज्ञानोबा थोरात

- सध्या विहिरी आटल्या, पिकाचं सोडा; परंतु, पिण्याच्या पाण्याचं काय करावं! दसऱ्यापासून दोनशे रुपये महिन्याने पाणी विकत घेतोय. कसं साल कडीला जायचं ? -नानासाहेब थोरात

- मी दर साल दिवसाला ५० ते ६० किलो कापूस वेचायचे. या साली दिवसभरात दहा ते बारा किलो कापूस होतोय. किमान तीन वेचण्या होतात;परंतु, यावर्षी एकाच वेचणीत कापसाचा झाडा झाला. पाणी ना शेतात ना गावात. त्यामुळे गावात विकत घेतलेले पाणी दिवसभर पिण्यासाठी शेतात आणाव लागतं. ते औषधासारखं जपून प्यावं लागतं. यावर्षीचा भयान दुष्काळ वाटतो. - शशिकलाबाई विष्णू शिंदे

टॅग्स :droughtदुष्काळMarathwadaमराठवाडाagricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी