शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
2
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
3
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
4
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
5
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
6
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
7
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
8
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
9
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."
10
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
11
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
12
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
13
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
14
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
15
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
16
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
17
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
18
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
19
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
20
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!

Drought In Marathwada : एका वेचणीत कापसाचा झाला झाडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 21:02 IST

सेलू तालुक्यातील नांदगावची लोकसंख्या ६०६ असून येथील ३६५ हेक्टरवर पिकाची लागवड केली जाते.

- मोहन बोराडेसेलू (जि. परभणी) 

मूग, सोयाबीन, कापूस करपले धन्याला पीक काढायला परवडना. मजुराला गावात काम मिळेना, पिण्याच्या पाण्यासाठी आताच वनवन करावी लागत आहे. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न उभा ठाकला आहे. दुष्काळाने गाव गाडाच हरवल्याचे चित्र सदर प्रतिनिधीने सेलू तालुक्यातील नांदगावला भेट दिल्यानंंतरच समोर आले. 

रबीच्या भरोशावर खरिपाची पेरणी करून जगाच्या पोशिंद्याने स्वप्न बघितली. शेती-भाती आणि घरदाराचे नियोजन केले. प्रचंड पाऊस येणार असल्याच्या हवामान खात्याच्या अंदाजावर खरिपाची पेरणी केली. सुरुवातीला पाऊस पडला. मात्र पीक बहरात येताच पाऊस गायब झाला. कापूस, सोयाबीन, मूग, तुरीने माना टाकल्या. पीक सुकू लागले. पाहता पाहता खरिपातील पीक शेतकऱ्यांच्या हातून गेले. कापूस एका वेचणीत बाद झाला. तर मूग, सोयाबीनने दगा दिला.

सेलू तालुक्यातील नांदगावची लोकसंख्या ६०६ असून येथील ३६५ हेक्टरवर पिकाची लागवड केली जाते. हे गाव सेलू व जिंतूर तालुक्याच्या सिमेवरचं. डोंगरावरच्या शेतीवर नशिब आजमावणारा कष्टाळू गावचा शिवार केवळ ६०० एकरचा आहे. कोणत्याही धरणाचे किंवा कालव्याचे या गावाला पाणी मिळत नाही. म्हणून पावसाच्या पाण्यावरच येथील शेतकरी अवलंबून आहेत. कापूस, ज्वारी, मूग, सोयाबीन व तूर या पारंपरिक पिकावरच गावच्या शेतकऱ्यांचा गावगाडा चालतो; परंतु, पावसाअभावी खरीप हंगाम हातून गेला आहे. परतीचा पाऊस बरसलाच नसल्याने रबीची पेरणी झालीच नाही. म्हणून शेतकरी हादरला आहे.

मोठ्या पेरणीअभावी आजही शेकडो एकर जमीन पडिक दिसत आहे. ज्वारी नसल्याने कडबा नसणार आहे. त्यामुळे जनावरांचा सांभाळ कसा करावा? या विवंचनेत शेतकरी आहे. सोयाबीनच्या भूशावर सध्या जनावरांची गुजरन केली जात आहे. भविष्यात या भागात चारा टंचाई जाणवनार याची चाहूल आत्ताच शेतकऱ्यांना लागू लागली आहे. पाणीपुरवठा करणारी विहीर कोरडी पडल्याने खाजगी विहिरीवरून ग्रामस्थांना पाणी आणावे लागत आहे. शिवारात एक महिना पुरेल एवढेच पाणी असल्याचे ग्रामस्थ सांगतात. म्हणून आगामी काळ भयंकर असणार आहे. असे असले तरी प्रशासनाकडून अद्यापपर्यंतरी कागदावरच नियोजन सुरु आहे. कागदावरचे नियोजन प्रत्यक्ष कृतीत कधी येईल, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

बळीराजा काय म्हणतो़ ?

- सोयाबीनला वाद्या लागल्या आणि पाऊस कायमचा थांबला. त्यामुळे सोयाबीन जागच्या जागी करपून गेले. दहा पोत्याच्या जागी एक पोत्याचा उतार आला. कसं जगावं? भगवंतालाच काळजी. - ज्ञानोबा थोरात

- सध्या विहिरी आटल्या, पिकाचं सोडा; परंतु, पिण्याच्या पाण्याचं काय करावं! दसऱ्यापासून दोनशे रुपये महिन्याने पाणी विकत घेतोय. कसं साल कडीला जायचं ? -नानासाहेब थोरात

- मी दर साल दिवसाला ५० ते ६० किलो कापूस वेचायचे. या साली दिवसभरात दहा ते बारा किलो कापूस होतोय. किमान तीन वेचण्या होतात;परंतु, यावर्षी एकाच वेचणीत कापसाचा झाडा झाला. पाणी ना शेतात ना गावात. त्यामुळे गावात विकत घेतलेले पाणी दिवसभर पिण्यासाठी शेतात आणाव लागतं. ते औषधासारखं जपून प्यावं लागतं. यावर्षीचा भयान दुष्काळ वाटतो. - शशिकलाबाई विष्णू शिंदे

टॅग्स :droughtदुष्काळMarathwadaमराठवाडाagricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी