शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

Drought In Marathwada : एका वेचणीत कापसाचा झाला झाडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 21:02 IST

सेलू तालुक्यातील नांदगावची लोकसंख्या ६०६ असून येथील ३६५ हेक्टरवर पिकाची लागवड केली जाते.

- मोहन बोराडेसेलू (जि. परभणी) 

मूग, सोयाबीन, कापूस करपले धन्याला पीक काढायला परवडना. मजुराला गावात काम मिळेना, पिण्याच्या पाण्यासाठी आताच वनवन करावी लागत आहे. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न उभा ठाकला आहे. दुष्काळाने गाव गाडाच हरवल्याचे चित्र सदर प्रतिनिधीने सेलू तालुक्यातील नांदगावला भेट दिल्यानंंतरच समोर आले. 

रबीच्या भरोशावर खरिपाची पेरणी करून जगाच्या पोशिंद्याने स्वप्न बघितली. शेती-भाती आणि घरदाराचे नियोजन केले. प्रचंड पाऊस येणार असल्याच्या हवामान खात्याच्या अंदाजावर खरिपाची पेरणी केली. सुरुवातीला पाऊस पडला. मात्र पीक बहरात येताच पाऊस गायब झाला. कापूस, सोयाबीन, मूग, तुरीने माना टाकल्या. पीक सुकू लागले. पाहता पाहता खरिपातील पीक शेतकऱ्यांच्या हातून गेले. कापूस एका वेचणीत बाद झाला. तर मूग, सोयाबीनने दगा दिला.

सेलू तालुक्यातील नांदगावची लोकसंख्या ६०६ असून येथील ३६५ हेक्टरवर पिकाची लागवड केली जाते. हे गाव सेलू व जिंतूर तालुक्याच्या सिमेवरचं. डोंगरावरच्या शेतीवर नशिब आजमावणारा कष्टाळू गावचा शिवार केवळ ६०० एकरचा आहे. कोणत्याही धरणाचे किंवा कालव्याचे या गावाला पाणी मिळत नाही. म्हणून पावसाच्या पाण्यावरच येथील शेतकरी अवलंबून आहेत. कापूस, ज्वारी, मूग, सोयाबीन व तूर या पारंपरिक पिकावरच गावच्या शेतकऱ्यांचा गावगाडा चालतो; परंतु, पावसाअभावी खरीप हंगाम हातून गेला आहे. परतीचा पाऊस बरसलाच नसल्याने रबीची पेरणी झालीच नाही. म्हणून शेतकरी हादरला आहे.

मोठ्या पेरणीअभावी आजही शेकडो एकर जमीन पडिक दिसत आहे. ज्वारी नसल्याने कडबा नसणार आहे. त्यामुळे जनावरांचा सांभाळ कसा करावा? या विवंचनेत शेतकरी आहे. सोयाबीनच्या भूशावर सध्या जनावरांची गुजरन केली जात आहे. भविष्यात या भागात चारा टंचाई जाणवनार याची चाहूल आत्ताच शेतकऱ्यांना लागू लागली आहे. पाणीपुरवठा करणारी विहीर कोरडी पडल्याने खाजगी विहिरीवरून ग्रामस्थांना पाणी आणावे लागत आहे. शिवारात एक महिना पुरेल एवढेच पाणी असल्याचे ग्रामस्थ सांगतात. म्हणून आगामी काळ भयंकर असणार आहे. असे असले तरी प्रशासनाकडून अद्यापपर्यंतरी कागदावरच नियोजन सुरु आहे. कागदावरचे नियोजन प्रत्यक्ष कृतीत कधी येईल, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

बळीराजा काय म्हणतो़ ?

- सोयाबीनला वाद्या लागल्या आणि पाऊस कायमचा थांबला. त्यामुळे सोयाबीन जागच्या जागी करपून गेले. दहा पोत्याच्या जागी एक पोत्याचा उतार आला. कसं जगावं? भगवंतालाच काळजी. - ज्ञानोबा थोरात

- सध्या विहिरी आटल्या, पिकाचं सोडा; परंतु, पिण्याच्या पाण्याचं काय करावं! दसऱ्यापासून दोनशे रुपये महिन्याने पाणी विकत घेतोय. कसं साल कडीला जायचं ? -नानासाहेब थोरात

- मी दर साल दिवसाला ५० ते ६० किलो कापूस वेचायचे. या साली दिवसभरात दहा ते बारा किलो कापूस होतोय. किमान तीन वेचण्या होतात;परंतु, यावर्षी एकाच वेचणीत कापसाचा झाडा झाला. पाणी ना शेतात ना गावात. त्यामुळे गावात विकत घेतलेले पाणी दिवसभर पिण्यासाठी शेतात आणाव लागतं. ते औषधासारखं जपून प्यावं लागतं. यावर्षीचा भयान दुष्काळ वाटतो. - शशिकलाबाई विष्णू शिंदे

टॅग्स :droughtदुष्काळMarathwadaमराठवाडाagricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी