शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

परभणी जिल्हा कचेरीतील कालबाह्य संचिका करणार नष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 00:29 IST

जिल्हाधिकारी कार्यालयातील रेकॉर्ड रुममध्ये जमा असलेल्या कालबाह्य संचिका नष्ट करण्याची प्रक्रिया २९ जुलैपासून सुरू झाली आहे़ या अंतर्गत सुमारे १ लाखाहून अधिक संचिका नष्ट होतील, अशी माहिती मिळाली़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्हाधिकारी कार्यालयातील रेकॉर्ड रुममध्ये जमा असलेल्या कालबाह्य संचिका नष्ट करण्याची प्रक्रिया २९ जुलैपासून सुरू झाली आहे़ या अंतर्गत सुमारे १ लाखाहून अधिक संचिका नष्ट होतील, अशी माहिती मिळाली़जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झालेल्या प्रत्येक कागदपत्रांचे त्या कागदपत्राच्या आवश्यकतेनुसार जतन केले जाते़ जिल्हाधिकारी कार्यालयातील सुमारे २० विभागातून येणारी ही कागदपत्रे रेकॉर्डमध्ये साठवून ठेवली जातात़ यातील काही कागदपत्रे एक ते दोन वर्षांसाठी, काही पाच वर्षांसाठी तर काही कागदपत्रे हे अमर्याद काळासाठी जतन करावयाची असतात़ प्रत्येक विभागाकडून येणाऱ्या या कागदपत्रांचे रेकॉर्ड तयार केले जाते़ सध्या जिल्हा प्रशासनातील रेकॉर्ड रुम अद्ययावत करण्याचे काम सुरू झाले आहे़ रेकॉर्ड रुममधील सर्व अभिलेख्यांचे स्कॅनिंग करून मॉर्डर्न रेकॉर्ड रुम तयार केली जाणार आहे़ या अंतर्गत सहा महिन्यांपासून कामकाज सुरू आहे़ हे काम करीत असताना अनेक कागदपत्रे ही नष्ट करणे आवश्यक असल्याची बाब समोर आली़ तसेच नवीन अभिलेखे, संचिका रेकॉर्ड रुममध्ये दाखल होत आहे़; परंतु, त्या साठविण्यासाठी जागा शिल्लक नसल्याने जुन्या अनावश्यक संचिका नष्ट करण्याचे आदेश जिल्हाधिकाºयांनी दिले़ त्यानुसार निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, तहसीलदार विद्या शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जुनी अभिलेखे बाहेर काढली जात आहेत़ ही अभिलेखे ज्या विभागातून देण्यात आली, त्या विभागात परत केली जात असून, विभागप्रमुखांनी त्या अभिलेख्यांचे महत्त्व लक्षात घेऊन ते नष्ट करावयाचे आहेत़ रेकॉर्ड किपर सुरेश पुंड यांच्यासह संजय शिंदे, हनुमान राऊत, हेमा गोंधळकर हे कर्मचारी सुसूत्रीकरणाची कामे करीत आहेत़२० वर्षानंतर प्रथमच मोहीमरेकॉर्ड रुममधील जुन्या संचिका यापूर्वी १९९८ मध्ये नष्ट करण्यात आल्या होत्या़ २० वर्षानंतर आता ही मोहीम हाती घेण्यात आली आहे़ विविध विभागातून येणाºया संचिकांची वर्गवारी केली जाते़ एक वर्षापर्यंत जतन करावयाच्या संचिकांना ड गटात टाकले जाते़ पाच वर्षापर्यंतच्या क गटात, १० वर्षापर्यंतच्या क-१ गटात, ३० वर्षापर्यंतच्या ब गटामध्ये आणि कायमस्वरुपी जतन करावयाच्या संचिका अ गटामध्ये टाकल्या जातात़ ड, क आणि क-१ या गटातील कालबाह्य संचिका नष्ट करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे़ आतापर्यंत ड गटातील ३७४ गठ्ठे काढण्यात आले असून, त्यापैकी ३४७ गठ्ठ्यांची तपासणी पूर्ण झाली आहे़ तर क-१ गटातील ३६४ गठ्ठ्यांमधील ३ हजार १०५ संचिका तपासणीचे काम पूर्ण झाले आहे़ सुमारे १ लाख संचिका या मोहिमेत नष्ट होण्याचा अंदाज आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीcollectorजिल्हाधिकारीParabhani collector officeजिल्हाधिकारी कार्यालय परभणी