शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
4
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
5
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
6
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
7
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
8
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
9
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
10
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
11
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
12
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
13
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
14
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
15
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
16
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
17
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
18
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
19
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
20
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
Daily Top 2Weekly Top 5

बंद दुकानांसमोर ग्राहकांची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:13 IST

मागील दोन महिन्यांपासून जिल्ह्यात कोरोनाच्या संसर्गामुळे बाजारपेठ बंद ठेवण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवेतील किराणा आणि भाजीपाला दुकान वगळता इतर ...

मागील दोन महिन्यांपासून जिल्ह्यात कोरोनाच्या संसर्गामुळे बाजारपेठ बंद ठेवण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवेतील किराणा आणि भाजीपाला दुकान वगळता इतर सर्व दुकाने बंद असल्याने व्यापाऱ्यांना दररोज हजारो रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे. कर्मचाऱ्यांचे पगार, दुकान भाडे, वीज भाडे यासह कर्जाचे हप्ते असा आर्थिक बोजा दिवसेंदिवस वाढत असल्याने बाजारपेठ कधी सुरू होते? असा प्रश्न या व्यापाऱ्यांना पडला आहे.

दरम्यान, मागच्या आठ दिवसांपासून जिल्ह्यातील कोरोना संसर्ग कमी झाला असून, व्यवहार लवकरच पूर्वपदावर येतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे; परंतु सध्यातरी बाजारपेठ सुरू करण्याचे आदेश निघाले नाहीत. राज्यस्तरावरून कमी संसर्ग असलेल्या जिल्ह्यांमध्ये बाजारपेठ सुरू करण्याचे संकेत देण्यात आले आहेत. जिल्ह्यात रुग्णांचा पॉझिटिव्हिटी १० पेक्षा कमी असल्याने बाजारपेठ लवकरच सुरू होईल, अशी व्यापाऱ्यांना अपेक्षा आहे. त्यातूनच दोन दिवसांपासून शहरातील बाजारपेठेत वर्दळ वाढली आहे. प्रशासनाच्या आदेशामुळे दुकाने बंद असली तरी या बंद दुकानांसमोर थांबून व्यापारी ग्राहकांची प्रतीक्षा करीत आहेत. दररोज किमान थोडाबहुत व्यापार करून कर्मचाऱ्यांचा पगार व इतर खर्च भागविण्याचा प्रयत्न सुरू आहे. सोमवारी शहरातील बाजारपेठ भागात बऱ्यापैकी वर्दळ पाहावयास मिळाली. दुकानांचे शटर बंद होते; परंतु तरीही व्यवसाय होईल, या आशेने व्यापारी दुकानाच्या बाहेर थांबून असल्याचे दिसून आले.

नागरिक झाले बिनधास्त

संसर्ग कमी झाल्याने नागरिकही बिनधास्त झाले आहेत. शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू झाली असून, बाजारपेठ भागात गर्दी दिसून येत आहे. मुख्य रस्त्यांसह छोट्या रस्त्यांवर देखील मोठ्या प्रमाणात वर्दळ आहे. विशेष म्हणजे, शहरातील प्रमुख मार्गावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असला तरी पोलीस प्रशासनाकडूनही फारशी कारवाई केली जात नाही. त्यामुळे शहरातील जनजीवन काहीसे सैल झाल्याचे दिसून येत आहे.