शहरं
Join us  
Trending Stories
1
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
2
Top Marathi News LIVE Updates: बारामती पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; पश्चिम बंगाल, तामिळनाडूतही मतदारराजा देणार कौल
3
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
4
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
5
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
6
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
7
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
8
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
9
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
10
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
11
महिला क्रिकेटरचा 'हनीट्रॅप' गेम! व्यावसायिकाला ६३ लाखांना लुटले, मुंबई पोलिसांनी श्रीनगरमधून उचलले
12
"रिद्धी खूप खूश झाली अन्..." राकेश बापटने सांगितली एक्स वाईफची कशी होती प्रतिक्रिया
13
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
14
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
15
‘पंतप्रधान मोदींना लक्ष्य करणे म्हणजे थेट १४० कोटी भारतीयांचा अपमान’, एकनाथ शिंदेंची खर्गेंवर टीका
16
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
17
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
18
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
19
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
20
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
Daily Top 2Weekly Top 5

तीन लाख हेक्‍टरवरील पिके धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:13 IST

परभणी : जिल्ह्यात यावर्षी जून महिन्यातच खरीप हंगामातील पेरण्या झाल्या असून, त्यानंतर पावसाने मोठा खंड दिल्याने शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या ...

परभणी : जिल्ह्यात यावर्षी जून महिन्यातच खरीप हंगामातील पेरण्या झाल्या असून, त्यानंतर पावसाने मोठा खंड दिल्याने शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत. पंधरा ते वीस दिवसांपासून पाऊस गायब झाल्याने उगवलेली पिके कोमेजून जात आहेत. येत्या दोन-तीन दिवसांत पाऊस न झाल्यास दुबार पेरणी करण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत.

मागील दोन वर्षांपासून खरीप हंगामामध्ये चांगला पाऊस होत आहे; परंतु या हंगामाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात मात्र पावसाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागत आहे. यावर्षी पावसाळ्यात सरासरीएवढा पाऊस होणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली होती. त्याचप्रमाणे जून महिन्यात सर्वाधिक पाऊस असल्याचीही शक्यता या विभागाने वर्तविली. त्यामुळे शेतकरी उत्साहाने पेरणीच्या तयारीला लागले. हवामान खात्याच्या अंदाजानुसार जून महिन्यातच सुरुवातीला चांगला पाऊस झाला. या पावसाच्या भरवशावर जिल्ह्यातील तीन लाख हेक्टर क्षेत्रावर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. बहुतांश शेतकऱ्यांनी कापूस आणि सोयाबीन ही नगदी पिके घेतली आहेत.

पेरणी झालेली पिके आता उगवली असून, कोवळ्या पिकांना पाण्याची आवश्यकता आहे. याचवेळी पावसाने दगा दिला असून, १५ ते २० दिवसांपासून पाऊस गायब झाला आहे. पिके ऊन धरू लागली असून मुळाजवळील ओलावा कमी होत असल्याने कोमेजून जात आहेत. अशा वेळी कोळपणी करून या पिकांना जगविण्याचा केविलवाणा प्रयत्न शेतकऱ्यांकडून होत आहे.

मागील वर्षी खरीप हंगामात सोयाबीनचे बियाणे बोगस निघाल्याने बहुतांश शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली होती. तसेच या हंगामातील पिके हाताशी येत असतानाच अतिवृष्टीने पिकांची मोठी नासाडी केली होती. या संकटातून सावरत यावर्षी शेतकऱ्यांनी उत्साहात पेरणी केली. मात्र, आता पाऊस गायब झाल्याने पुन्हा दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांना सतावत आहे. येत्या एक-दोन दिवसांत पाऊस झाला नाही तर पिकांवर नांगर फिरवण्याची वेळ येते की काय? अशी भीती शेतकऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे.

हवामान खात्याच्या अंदाजामुळे फसगत

यावर्षी पाऊसमान चांगले राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. या अंदाजावर भरोसा ठेवून शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या; परंतु पिके वाढीच्या कालावधीतच पाऊस गायब झाला आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत.

हेक्‍टरी १५ हजार रुपयांचा भुर्दंड

जिल्ह्यात सद्य:स्थितीला सोयाबीनचा पेरा सर्वाधिक झाला आहे. हे पीक पाण्याअभावी कोमेजून जात आहे. दुबार पेरणी करण्याची वेळ आल्यास शेतकऱ्यांना हेक्‍टरी किमान १५ हजार रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे. शिवाय पिकाची उगवण क्षमता कमी होणार असल्याने उत्पादनावरही परिणाम होण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यातून एकूण पेरणी क्षेत्र

५ लाख २१ हजार १००

झालेली पेरणी १ लाख ८० हजार

सोयाबीन ८००००

कापूस ९७०००

तूर २०००

मूग ५००

उडीद २००

ज्वारी १०० क्षेत्र हेक्टरमध्ये