शहरं
Join us  
Trending Stories
1
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
2
कोकाटेंचा राजीनामा मागितला, तटकरेंना निवेदन देत पत्ते फेकले, छावा आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
3
"आमच्या निवेदनाला लाथाबुक्क्यांनी उत्तर देत असाल तर…’’, विजय घाडगे यांची संतप्त प्रतिक्रिया 
4
ऑपरेशन सिंदूरवेळी जीव धोक्यात घालून केली जवानांना मदत, आता लष्कराने १० वर्षांच्या मुलाला दिलं मोठं बक्षीस
5
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
6
राजस्थानात मुसळधार पाऊस, अजमेरमध्ये तरुण वाहून जाता-जाता बचावला; असा वाचला जीव, बघा VIDEO
7
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
8
मांत्रिकाकडून पूजा केली, खड्डा खणला, तेवढ्यात आले पोलीस, गुप्तधन शोधताना पाच जणांना अटक
9
416%नं वाढला कंपनीचा नफा, आता शेअर खरेदीसाठी लोकांची झुंबड; ₹40 पेक्षाही कमी आहे किंमत!
10
हरीण बिथरले, महामार्गावरून सैरावैरा पळत सुटले, पुलावरून मारली उडी, झाला करुण अंत
11
असंवेदनशिल कृषीमंत्री कोकाटेंचा राजीनामा घ्या; विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी
12
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय
13
इंडोनेशियात प्रवासी बोटीला भीषण आग; प्रवाशांनी समुद्रात मारल्या उड्या...
14
उज्ज्वल निकम यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार? भाजपा नेते म्हणतात, “काही अशक्य नाही”
15
हिमाचलमधील एका तरुणीनं दोन भावांसोबत का केलं लग्न? जाणून घ्या काय आहे ही 'जोडीदार प्रथा'?
16
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टीकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
17
भारतातील हे पर्यटन स्थळ बनतंय बँकॉक, वेश्या व्यवसायासाठी अल्पवयीन मुलींना आणलं जातंय, भाजपाच्या महिला नेत्याचा आरोप
18
Madha Crime: चेहरा छिन्नविच्छिन्न, रस्त्यावर रक्ताचे डाग! यात्रेत गेलेल्या १० वर्षांच्या कार्तिकचा कालव्यात सापडला कुजलेला मृतदेह
19
विकृतीचा कळस! लंडनमधील इस्कॉनच्या रेस्टोरंटमध्ये घुसून मुद्दाम खाल्लं चिकन; घाणेरडं कृत्य पाहून लोक संतापले
20
मराठमोळी मृणाल ठाकूर घटस्फोटीत अभिनेत्याच्या प्रेमात? "सीतारामम" चित्रपटात एकत्र केलंं काम

कोरोनाने जिल्ह्यातील १४५ बालकांचे पालकत्व हिरावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:18 IST

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशातच उपचार सुरू असताना कोरोनाबाधित व्यक्तिंचा मृत्यू होण्याचे प्रमाण अधिक आहे. ...

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशातच उपचार सुरू असताना कोरोनाबाधित व्यक्तिंचा मृत्यू होण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यात एकाच कुटुंबातील २ किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तिंचा मृत्यू झाल्याचे प्रामुख्याने दिसून येत आहे. कोरोनाच्या या संकटात अनेक कुटुंबातील बालके अनाथ झाली आहेत. शिवाय काही बालकांचे वडील कोरोनामुळे मरण पावले आहेत, तर काही बालके आईच्या मायेला पोरकी झाली आहेत, अशा बालकांची माहिती महिला व बालकल्याण विभागाने संकलित केली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील ग्रामीण भागातील १२८ आणि शहरी भागातील १४ बालकांनी आई किंवा वडील गमावले आहेत. यात ९ बालकांच्या आईचा, तर १३६ बालकांच्या वडिलांचा मृत्यू झाला आहे.

आई किंवा वडिलांचा मृत्यू झाला असल्यास ११०० रुपयांची मदत

n कोरोनामुळे आई किंवा वडिलांचा मृत्यू झालेल्या मुलांना मदत देण्यासाठी शासनाने बालसंगोपन योजनेंतर्गत दरमहा ११०० रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेतला आहे.

n या बालकांना पुरवठा विभागाकडून अंत्योदय योजनेंतर्गत रेशन दुकानातून मोफत धान्य देण्यात येणार आहे.

n तसेच इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा पेन्शन योजनेचा लाभ वडिलांचे छत्र हरविलेल्या बालकांच्या आईला मिळणार आहे.

टास्क फोर्सच्या बैठकीला १७ दिवसांनंतर मुहूर्त

कोरोनामुळे आई-वडिलांचे छत्र गमावलेल्या बालकांना मदत करण्याच्या दृष्टीकोनातून राज्य शासनाने जिल्हा स्तरावर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स स्थापन करण्याचे आदेश दिले होते. यासंदर्भातील आदेश ७ मे रोजी राज्य शासनाने काढला होता. त्यानुसार इतर जिल्ह्यांमध्ये टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली असून, यासंदर्भातील कामकाजही सुरू झाले आहे. परभणी जिल्ह्यात मात्र शासन आदेशानंतर तब्बल १७ दिवसांनी २४ मे रोजी टास्क फोर्स बैठकीला मुहूर्त लागला. या टास्क फोर्सचे सदस्य सचिव जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी असताना त्यांच्याकडे याबाबत सविस्तर माहितीच उपलब्ध नव्हती. जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाने यासंदर्भातील माहिती उपलब्ध करून दिली. त्यामुळे इतर जिल्ह्यांच्या तुलनेत परभणी जिल्हा याबाबत मागेच असल्याचे दिसून येत आहे.

या अनाथ मुलांचे सरकार काय करणार....

प्राथमिक स्वरूपात महिला व बालकल्याण विभागाला पालकत्व हरविलेल्या बालकांची माहिती मिळाली आहे.

त्यानंतर प्रशासन आता या बालकांची प्रत्यक्ष त्यांच्या घरी जाऊन माहिती घेणार आहे. त्यानंतर त्यांना जिल्हा टास्क फोर्सद्वारे मदत दिली जाणार आहे.

अनाथ झालेल्या बालकांना बालगृहात ठेवण्यात येणार असल्याची माहिती या विभागाच्या वतीने देण्यात आली.