शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाने जिल्ह्यातील १४५ बालकांचे पालकत्व हिरावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:18 IST

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशातच उपचार सुरू असताना कोरोनाबाधित व्यक्तिंचा मृत्यू होण्याचे प्रमाण अधिक आहे. ...

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशातच उपचार सुरू असताना कोरोनाबाधित व्यक्तिंचा मृत्यू होण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यात एकाच कुटुंबातील २ किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तिंचा मृत्यू झाल्याचे प्रामुख्याने दिसून येत आहे. कोरोनाच्या या संकटात अनेक कुटुंबातील बालके अनाथ झाली आहेत. शिवाय काही बालकांचे वडील कोरोनामुळे मरण पावले आहेत, तर काही बालके आईच्या मायेला पोरकी झाली आहेत, अशा बालकांची माहिती महिला व बालकल्याण विभागाने संकलित केली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील ग्रामीण भागातील १२८ आणि शहरी भागातील १४ बालकांनी आई किंवा वडील गमावले आहेत. यात ९ बालकांच्या आईचा, तर १३६ बालकांच्या वडिलांचा मृत्यू झाला आहे.

आई किंवा वडिलांचा मृत्यू झाला असल्यास ११०० रुपयांची मदत

n कोरोनामुळे आई किंवा वडिलांचा मृत्यू झालेल्या मुलांना मदत देण्यासाठी शासनाने बालसंगोपन योजनेंतर्गत दरमहा ११०० रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेतला आहे.

n या बालकांना पुरवठा विभागाकडून अंत्योदय योजनेंतर्गत रेशन दुकानातून मोफत धान्य देण्यात येणार आहे.

n तसेच इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा पेन्शन योजनेचा लाभ वडिलांचे छत्र हरविलेल्या बालकांच्या आईला मिळणार आहे.

टास्क फोर्सच्या बैठकीला १७ दिवसांनंतर मुहूर्त

कोरोनामुळे आई-वडिलांचे छत्र गमावलेल्या बालकांना मदत करण्याच्या दृष्टीकोनातून राज्य शासनाने जिल्हा स्तरावर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स स्थापन करण्याचे आदेश दिले होते. यासंदर्भातील आदेश ७ मे रोजी राज्य शासनाने काढला होता. त्यानुसार इतर जिल्ह्यांमध्ये टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली असून, यासंदर्भातील कामकाजही सुरू झाले आहे. परभणी जिल्ह्यात मात्र शासन आदेशानंतर तब्बल १७ दिवसांनी २४ मे रोजी टास्क फोर्स बैठकीला मुहूर्त लागला. या टास्क फोर्सचे सदस्य सचिव जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी असताना त्यांच्याकडे याबाबत सविस्तर माहितीच उपलब्ध नव्हती. जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाने यासंदर्भातील माहिती उपलब्ध करून दिली. त्यामुळे इतर जिल्ह्यांच्या तुलनेत परभणी जिल्हा याबाबत मागेच असल्याचे दिसून येत आहे.

या अनाथ मुलांचे सरकार काय करणार....

प्राथमिक स्वरूपात महिला व बालकल्याण विभागाला पालकत्व हरविलेल्या बालकांची माहिती मिळाली आहे.

त्यानंतर प्रशासन आता या बालकांची प्रत्यक्ष त्यांच्या घरी जाऊन माहिती घेणार आहे. त्यानंतर त्यांना जिल्हा टास्क फोर्सद्वारे मदत दिली जाणार आहे.

अनाथ झालेल्या बालकांना बालगृहात ठेवण्यात येणार असल्याची माहिती या विभागाच्या वतीने देण्यात आली.