शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

कॉंग्रेसचे मौनच आघाडीतील अडथळा : प्रकाश आंबेडकर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2019 6:10 PM

या प्रश्नावर कॉंग्रेस मौन बाळगून असल्याने आघाडी संदर्भात अडथळे येत असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी येथे स्पष्ट केले.

परभणी- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला संविधानाच्या चौकटीत आणण्याचा अजेंडा कॉंग्रेसने करावा, कॉंग्रेससोबत वंचित बहुजन आघाडी युती करेल, असे आम्ही यापूर्वीच सांगितले आहे. मात्र या प्रश्नावर कॉंग्रेस मौन बाळगून असल्याने आघाडी संदर्भात अडथळे येत असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी येथे स्पष्ट केले.

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने येथे आयोजित सत्ता संपादन महासभेसाठी प्रकाश आंबेडकर परभणीत आले होते. यावेळी पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा संविधान बदलायला निघाला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला संविधानाच्या चौकटीत आणावे ही आमची प्रथम मागणी आहे. या संदर्भात अजेंडा करण्यास कॉंग्रेस तयार होत नाही. आम्ही आतापर्यंत लोकसभेच्या १२ जागा जाहीर केल्या आहेत. त्यामुळे कॉंग्रेस सोबत आघाडी झाली तरी या जागा वगळून इतर जागांवर चर्चा होईल.

वंचित बहुजन आघाडीने राज्यातील ४८ मतदारसंघात तयारी केली आहे. कॉंग्रेस आणि इतर राष्ट्रीय पक्षांमध्ये यापूर्वीचे अनेक गोंधळ असल्याने हे पक्ष भाजपाच्या विरोधात लढू शकत नाहीत. त्यासाठी प्रादेशिक पक्षच लढा देऊ शकतात, असेही आंबेडकर म्हणाले. या पत्रकार परिषदेस लक्ष्मणराव माने, डॉ.वानखेडे, कॉ.गणपत भिसे, वंचित बहुजन आघाडीचे निमंत्रक डॉ.धर्मराज चव्हाण, भारिपचे जिल्हाध्यक्ष दादाराव पंडित आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरcongressकाँग्रेसElectionनिवडणूक