शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
"एवढ्या मोठ्या शुल्कवाढीने..."; ट्रम्प यांनी फोडला H-1B व्हिसा बॉम्ब, भारतानं व्यक्त केली मोठी चिंता!
3
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
4
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
5
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
6
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
7
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
8
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
9
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
10
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
11
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
12
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
13
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
14
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
15
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
16
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
17
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
18
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
19
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
20
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल

राज्यातील शेती व्यवसायाला भाजप सरकारकडून धोका : शंकरअण्णा धोंडगे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2017 17:14 IST

सरकारचे धोरणच समजत नाहीत. शेती व्यवस्था अस्थीर करण्याचे प्रयत्न सध्या सुरु आहेत. त्यामुळे शेती व्यवसायाला सरकारकडून धोका असल्याची भावना निर्माण झाली असून, भांबावलेल्या शेतक-यांना सुरक्षा देण्याच्या हेतूने राज्यभर शेतकरी, शेतमजूर सुरक्षा अभियान सुरू केल्याची माहिती या अभियानाचे निमंत्रक केशवअण्णा धोंडगे यांनी दिली.

परभणी, दि. 1 :  सरकारचे धोरणच समजत नाहीत. शेती व्यवस्था अस्थीर करण्याचे प्रयत्न सध्या सुरु आहेत. त्यामुळे शेती व्यवसायाला सरकारकडून धोका असल्याची भावना निर्माण झाली असून, भांबावलेल्या शेतक-यांना सुरक्षा देण्याच्या हेतूने राज्यभर शेतकरी, शेतमजूर सुरक्षा अभियान सुरू केल्याची माहिती या अभियानाचे निमंत्रक केशवअण्णा धोंडगे यांनी दिली.

राज्यात शेती आणि शेतकरी असुरक्षित झाली आहे. शासनाच्या धोरणांमुळे शेतक-यांची आर्थिक फरफट होत आहे. शेतक-यांना अस्थिर करायचे आणि कालांतराने कार्पोरेट शेती विकसित करायची, असा शासनाचा डाव असल्याचे सध्याच्या स्थितीवरुन दिसते. कारण गरज नसताना शेतीमालाची आयात करणे, विदेशात जमिन किरायाने घेऊन तेथे शेती मालावर प्रक्रिया करणे यासारखे निर्णय हे शासन घेत आहे. देशात शेतीमालाचे दर निच्चांकी ठेवण्यावर शासनाचा भर आहे. या सर्व धोरणांमुळे शेती व्यवसायालाच सरकारकडून धोका निर्माण झाला आहे.

अशा परिस्थितीत शेतक-यांना धीर देण्यासाठी, त्यांच्यातील आत्मविश्वास वाढवून सरकारविरोधी लढा उभारण्यासाठी ९ आॅगस्टपासून हे अभियान सुरू केले असल्याचे धोंडगे यांनी सांगितले. शेती व्यवसायाला संरक्षण द्यावे, शेतमालाचे भाव ठरविणा-या आयोगाला वैधानिक दर्जा द्यावा, अशी आमची प्रमुख मागणी आहे. आतापर्यंत राज्यात २३ ठिकाणी सभा घेतल्या असून, या अभियानात सत्ताधारी, विरोधी अशा शेतक-यांवर प्रेम करणा-या सर्वांनाच सामावून घेण्यात आले आहे. या अभियानाच्या माध्यमातून विविध मागण्या आम्ही शासनासमोर ठेवल्या आहेत. 

सरकारला वठणीवर आणण्यासाठी २ आॅक्टोबरनंतर राज्यभरात शेतक-यांचे असहकार आंदोलन केले जाणार असल्याचे धोंडगे यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला माजी खा.गणेशराव दुधगावकर, महंमद गौस, राकाँ किसान सभेचे परभणी जिल्हाध्यक्ष सुरेंद्र रोडगे, संतोष देशमुख, सुमंत वाघ, नंदू शिंदे, मंचकराव बचाटे, साथी रामराव जाधव, आदींची उपस्थिती होती.