शहरं
Join us  
Trending Stories
1
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
2
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
3
महाराष्ट्रात सहानुभूती आमच्या बाजूने, कारण...; PM मोदींनी दिला वेगळाच 'अँगल'
4
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
5
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
6
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
7
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
8
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
9
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
10
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
11
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
12
'३ इडियट्स'मधील रँचोच्या भूमिकेसाठी आमिर खान नव्हता पहिली पसंती, सिनेमा नाकारल्याचं अभिनेत्याला होतोय पश्चाताप
13
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
14
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
15
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
16
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
17
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
18
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
19
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
20
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!

कोरोनात मृत्यूसह जन्मदारही वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 4:18 AM

शहरासह जिल्ह्यात मागील वर्षी एप्रिलपासून कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. हे प्रमाण सुरवातीला तीन महिने कमी होते. त्यानंतर ...

शहरासह जिल्ह्यात मागील वर्षी एप्रिलपासून कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. हे प्रमाण सुरवातीला तीन महिने कमी होते. त्यानंतर आतापर्यंत रुग्णसंख्येची वाढ कायम आहे. सध्या मागील दीड महिन्यापासून लाँकडाऊन लावण्यात आले आहे. यामुळे विवाह तसेच सार्वजनिक, धार्मिक कार्यक्रम यावर बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी असल्याने मंगल कार्यालय किंवा रजिस्टर्ड पध्दतीने होणाऱ्या विवाहावर बंधने आली आहेत. पर्यायाने अनेक जण अगदी मोजक्या पाहूण्यांच्या उपस्थितीत विवाह सोहळा उरकून घेत आहेत. यामुळे नोंदणी करण्याचे प्रमाण कमी झाले आहे. प्रत्यक्षात विवाह सोहळे सुरुच आहेत. त्याचप्रमाणे शहरी भागात कोरोनाने होणारे मृत्यू वाढले आहेत. कोरोनाच्या कालावधीसह २०२० जानेवारी ते एप्रिल २०२१ पर्यंत १२,०८८ बालकांचा जन्म झाल्याचे आकडेवारीवरुन दिसून येते.

वर्ष जन्म मृत्यू विवाह नोंदणी

२०२० ९४७८ २१४५ ४७८

२०२१ २६१० ७६९ १२४

लग्नांची संख्याही घटली

कोरोना आणि लॉकडाऊनमुळे लग्नांची संख्या घटल्याचे पहावयास मिळते. यंदाची आणि मागील वर्षीच्या तुळशीच्या लग्नानंतर होणारे अनेक विवाह सोहळे रद्द झाले आहेत. सतत लागणारे लाँकडाऊन आणि मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत लग्न पार पाडण्याचे निर्बंध पाहता ही संख्या कमी झाली आहे.

जिल्ह्यात नोंदणीकृत ३५ मंगल कार्यालय

शहरासह जिल्ह्यात नोंदणीकृत मंगल कार्यालय ३५ आहेत. या ठिकाणी एका मंगल कार्यालयात लग्न तिथीच्या काळात किमान ८ ते १० लग्न होतात. तर रजिस्टर्ड पध्दतीने महिन्याला ३० ते ४० विवाह होतात. या ठिकाणच्या लग्न कार्यात मोठी घट झाली आहे. यामुळे विवाह नोंदणी घटली आहे. मात्र, जन्मदर वाढल्याचे आकडेवारीवरुन दिसून येते.

चार महिन्यात २६१० जन्म

महापालिकेच्या जन्म, मृत्यू आणि विवाह नोंदणी कार्यालयाकडे असलेल्या नोंदीनूसार जानेवारी ते एप्रिल २०२१ मध्ये २६१० बालकांचा जन्म झाला तर ७६९ जणांचा मृत्यू झाला. यात काही मृत्यू नैसर्गिक आणि बाकीचे कोरोनामुळे झाले आहेत. तसेच केवळ १२४ जणांनी विवाह नोंदणी केली आहे.