शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा असीम मुनीर म्हणजे दुसरा लादेन; अमेरिकेतूनच टीका होऊ लागली
2
"लग्न करायचंय, धर्म बदल"; प्रियकरानं टाकला दबाव, कुटुंबानं दिला त्रास, वैतागलेल्या तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल!
3
क्रिकेटपटू आकाशदीपने नवी कोरी फॉर्च्युनर घेतली; महागात पडली, डीलरही गोत्यात
4
‘जन’ आक्रोश नाही, सत्ता गेली, खुर्ची गेली म्हणून ‘मन’ आक्रोश; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
5
IPL सट्टेबाजी: धोनीच्या १०० कोटींच्या मानहानीच्या दाव्याबाबत उच्च न्यायालयाची मोठी कारवाई
6
"भारताविरोधात माझा मुलगा लढेल, तो शहीद झाला तर नातू लढेल"; आसिम मुनीर अमेरिकेत जाऊन काय बोलले?
7
उशिरा आयटी रिटर्न भरणाऱ्यांनाही रिफंड! करप्रणाली अधिक सोपी, पारदर्शक आणि आधुनिक होणार
8
"आपली ही तक्रार मी..."; अभिनेते किशोर कदम यांच्या पोस्टला मुख्यमंत्री फडणवीसांचा 'रिप्लाय'
9
Maratha Morcha: ऐन गणेशोत्सवात मनोज जरांगे पाटील मुंबईत धडकणार; मराठा आंदोलकांच्या मोर्चामुळे ताण वाढणार!
10
"खोलीत बोलवायचे, घाणेरड्या नजरेने बघायचे, रात्री व्हिडीओ..."; IAS अधिकाऱ्याविरोधात महिलांचे गंभीर आरोप 
11
शेअर बाजारात आधी घसरण मग तेजी; 'या' स्टॉक्सनं घसरणीसह सुरू केला व्यवहार
12
भिवंडीत भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्षासह दोन जणांची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; परिसरात तणावाचे वातावरण 
13
'वीण दोघांतली ही तुटेना'चा पहिला एपिसोड पाहून काय म्हणाले प्रेक्षक, सोशल मीडियावर कमेंट्सचा पाऊस
14
आसिम मुनीरनंतर बिलावल भुट्टोंची फडफड; भारताला दिली युद्धाची धमकी! म्हणाले... 
15
“राहुल गांधी म्हणजे फेक नॅरेटीव्हची फॅक्टरीच, फेक न्यूजचे बादशाह”; भाजपाने पुरावेच दिले!
16
अंगारकी चतुर्थीनिमित्त गणपतीपुळेत भाविकांचा महासागर
17
बँका आपल्या मनमर्जीनं मिनिमम अकाऊंट बॅलन्स ठरवू शकतात का? RBI गव्हर्नरांनी सांगितला नियम
18
'उत्पन्नावर आधारित' आरक्षण व्यवस्था असावी; जनहित याचिकेवर विचार करण्यास सुप्रीम कोर्टाने दर्शवली तयारी
19
डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण: सरकारी वकील प्रदीप घरत यांना खटल्यातून हटवल्याने न्यायालय नाराज
20
Post Office च्या MIS स्कीममध्ये ₹१,००,००० जमा कराल तर महिन्याला किती मिळेल व्याज, पाहा कॅलक्युलेशन

'उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी'; आपल्या पूर्वजांच्या त्रिसूत्रीच्या अंमलबजावणीची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2021 15:04 IST

Governor Bhagat Shingh Koshyari's Parabhani visit : अध्यापक मंडळी खऱ्या अर्थाने मार्गदर्शक असतात. त्यामुळे अध्यापकांना कृषी व संबंधित विषयांमध्ये दुप्पट कामे करावे

ठळक मुद्देकृषी क्षेत्रात पेटंट वाढविण्यावर भर द्यानवा देश घडविण्यासाठी कृषीचे योगदान महत्वपूर्ण

परभणी : नवा देश घडविण्यासाठी कृषी क्षेत्राचे योगदान महत्वपूर्ण आहे. 'उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी', असे आपल्या पूर्वजांनी सांगितले आहे. त्याचीच अंमलबजावणी करण्याची गरज निर्माण झाली असून, सर्वांनी जोमाने कामाला लागावे, अशी अपेक्षा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी व्यक्त केली. त्यांनी आज दुपारी येथील कृषी महाविद्यालयाच्या सभागृहात  त्यांनी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील संशोधक, अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. 

यावेळी व्यासपीठावर जिल्हाधिकारी आंचल गोयल, कुलगुुरु डॉ. अशोक ढवण व राजभवनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमास पोलीस अधीक्षक जयंत मीना, शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले, संशोधन संचालक डॉ.दत्तप्रसाद वासकर, विस्तार शिक्षण संचालक डॉ.देवराव देवसरकर, कुलसचिव डॉ. धीरजकुमार कदम यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी राज्यपाल कोश्यारी यांनी विद्यापीठातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे मते जाणून घेतली. त्यावर डॉ.सय्यद इस्माईल, डॉ. उदय खोडके, डॉ. आनंद गोरे, डॉ. राजेश क्षीरसागर, डॉ.स्मिता सोळंकी, प्राचार्या जया बंगाळे, डॉ. एस.पी. म्हेत्रे यांनी विविध विषयांकडे राज्यपालांचे लक्ष वेधले. 

'चांगले काम करून आयुष्यात यशस्वी व्हा'; राज्यपालांचा विद्यार्थ्यांना कठीण परिश्रमाचा सल्ला

राज्यपाल कोश्यारी म्हणाले, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे हे सुवर्ण महोत्सवी वर्ष असून, भारतीय स्वातंत्र्याचे अमृतोत्सवी वर्ष आहे. राज्यातील सर्वच विद्यापीठांमध्ये प्राध्यापकांची संख्या कमी आहे. जास्तीत जास्त प्राध्यापकांची नियुक्ती झाली पाहिजे. त्यासाठी सरकार प्रयत्न करीत आहे; परंतु, कमी मनुष्यबळात आणि कमी सुविधांमध्ये अधिक चांगली कामे झाली आहेत. अध्यापक मंडळी खऱ्या अर्थाने मार्गदर्शक असतात. त्यामुळे अध्यापकांना कृषी व संबंधित विषयांमध्ये दुप्पट कामे करावे, असे आवाहन त्यांनी केले. कृषी प्रक्रिया उद्योगांसाठी एकाच ठिकाणी परवाने मिळतील, अशी व्यवस्था करण्यासाठी पाठपुरावा करू, अशी ग्वाही त्यांनी दिली. 

कृषी क्षेत्रात पेटंट वाढविण्यावर भर द्यामराठवाडा विभागात कृषी क्षेत्रातील पेटंटचे प्रमाण कमी आहे. त्या त्या भागातील वैशिष्ट्यपूर्ण संशोधन आणि वाणांचे पेटंट वाढवून ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविल्यास कृषी क्षेत्राला चालना मिळेल, तेव्हा अधिकाधिक पेटंटवर भर द्यावा, असा सल्लाही यावेळी राज्यपाल कोश्यारी यांनी दिला. प्रारंभी कुलगुुरू डॉ. अशोक ढवण यांनी कृषी शिक्षण, संशोधन आणि विस्तार कार्याचा आढावा सादर केला. विद्यापीठाच्या वतीने कुलगुुरू डॉ. ढवण यांच्या हस्ते राज्यपाल कोश्यारी यांचा सत्कार करण्यात आला. प्रा. डॉ. रणजीत चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले.

टॅग्स :bhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीparabhaniपरभणीVasantrao Naik Marathwada Krishi Vidyapeethवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ