शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
3
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
4
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
5
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
6
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
7
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
8
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
9
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
10
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
11
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
12
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
13
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
14
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
15
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
16
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
17
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
18
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
19
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
20
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत

'उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी'; आपल्या पूर्वजांच्या त्रिसूत्रीच्या अंमलबजावणीची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2021 15:04 IST

Governor Bhagat Shingh Koshyari's Parabhani visit : अध्यापक मंडळी खऱ्या अर्थाने मार्गदर्शक असतात. त्यामुळे अध्यापकांना कृषी व संबंधित विषयांमध्ये दुप्पट कामे करावे

ठळक मुद्देकृषी क्षेत्रात पेटंट वाढविण्यावर भर द्यानवा देश घडविण्यासाठी कृषीचे योगदान महत्वपूर्ण

परभणी : नवा देश घडविण्यासाठी कृषी क्षेत्राचे योगदान महत्वपूर्ण आहे. 'उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी', असे आपल्या पूर्वजांनी सांगितले आहे. त्याचीच अंमलबजावणी करण्याची गरज निर्माण झाली असून, सर्वांनी जोमाने कामाला लागावे, अशी अपेक्षा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी व्यक्त केली. त्यांनी आज दुपारी येथील कृषी महाविद्यालयाच्या सभागृहात  त्यांनी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील संशोधक, अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. 

यावेळी व्यासपीठावर जिल्हाधिकारी आंचल गोयल, कुलगुुरु डॉ. अशोक ढवण व राजभवनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमास पोलीस अधीक्षक जयंत मीना, शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले, संशोधन संचालक डॉ.दत्तप्रसाद वासकर, विस्तार शिक्षण संचालक डॉ.देवराव देवसरकर, कुलसचिव डॉ. धीरजकुमार कदम यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी राज्यपाल कोश्यारी यांनी विद्यापीठातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे मते जाणून घेतली. त्यावर डॉ.सय्यद इस्माईल, डॉ. उदय खोडके, डॉ. आनंद गोरे, डॉ. राजेश क्षीरसागर, डॉ.स्मिता सोळंकी, प्राचार्या जया बंगाळे, डॉ. एस.पी. म्हेत्रे यांनी विविध विषयांकडे राज्यपालांचे लक्ष वेधले. 

'चांगले काम करून आयुष्यात यशस्वी व्हा'; राज्यपालांचा विद्यार्थ्यांना कठीण परिश्रमाचा सल्ला

राज्यपाल कोश्यारी म्हणाले, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे हे सुवर्ण महोत्सवी वर्ष असून, भारतीय स्वातंत्र्याचे अमृतोत्सवी वर्ष आहे. राज्यातील सर्वच विद्यापीठांमध्ये प्राध्यापकांची संख्या कमी आहे. जास्तीत जास्त प्राध्यापकांची नियुक्ती झाली पाहिजे. त्यासाठी सरकार प्रयत्न करीत आहे; परंतु, कमी मनुष्यबळात आणि कमी सुविधांमध्ये अधिक चांगली कामे झाली आहेत. अध्यापक मंडळी खऱ्या अर्थाने मार्गदर्शक असतात. त्यामुळे अध्यापकांना कृषी व संबंधित विषयांमध्ये दुप्पट कामे करावे, असे आवाहन त्यांनी केले. कृषी प्रक्रिया उद्योगांसाठी एकाच ठिकाणी परवाने मिळतील, अशी व्यवस्था करण्यासाठी पाठपुरावा करू, अशी ग्वाही त्यांनी दिली. 

कृषी क्षेत्रात पेटंट वाढविण्यावर भर द्यामराठवाडा विभागात कृषी क्षेत्रातील पेटंटचे प्रमाण कमी आहे. त्या त्या भागातील वैशिष्ट्यपूर्ण संशोधन आणि वाणांचे पेटंट वाढवून ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविल्यास कृषी क्षेत्राला चालना मिळेल, तेव्हा अधिकाधिक पेटंटवर भर द्यावा, असा सल्लाही यावेळी राज्यपाल कोश्यारी यांनी दिला. प्रारंभी कुलगुुरू डॉ. अशोक ढवण यांनी कृषी शिक्षण, संशोधन आणि विस्तार कार्याचा आढावा सादर केला. विद्यापीठाच्या वतीने कुलगुुरू डॉ. ढवण यांच्या हस्ते राज्यपाल कोश्यारी यांचा सत्कार करण्यात आला. प्रा. डॉ. रणजीत चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले.

टॅग्स :bhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीparabhaniपरभणीVasantrao Naik Marathwada Krishi Vidyapeethवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ