शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

परभणी जिल्ह्यातील २० प्रकल्पांनी गाठला तळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2018 12:54 AM

यावर्षीच्या पावसाळी हंगामात समाधानकारक पाऊस न झाल्याने जिल्ह्यात प्रकल्पांचा पाणीसाठा वाढला नाही़ सद्यस्थितीला येलदरीसह २० प्रकल्पांनी तळ गाठल्याने टंचाईचे संकट अधिकच गंभीर झाले आहे़ पुढील वर्षीच्या जुलै महिन्यापर्यंत पावसाची शक्यता नसल्याने याच पाणीसाठ्यावर ९ महिन्यांचा काळ काढावा लागणार आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : यावर्षीच्या पावसाळी हंगामात समाधानकारक पाऊस न झाल्याने जिल्ह्यात प्रकल्पांचा पाणीसाठा वाढला नाही़ सद्यस्थितीला येलदरीसह २० प्रकल्पांनी तळ गाठल्याने टंचाईचे संकट अधिकच गंभीर झाले आहे़ पुढील वर्षीच्या जुलै महिन्यापर्यंत पावसाची शक्यता नसल्याने याच पाणीसाठ्यावर ९ महिन्यांचा काळ काढावा लागणार आहे़परभणी जिल्ह्यातील येलदरी, निम्न दुधना, करपरा, मासोळी या प्रमुख प्रकल्पांबरोबरच गोदावरी नदीवर बांधलेले पाच बंधारे आणि पाटबंधारे विभागाच्या गाव तलाव व लघु तलावांमधील पाणीसाठ्यावर उन्हाळ्यातील पाणीटंचाईची भिस्त अवलंबून असते़ प्रकल्पांमध्ये पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असेल तर भूजल पातळीही स्थिर राहते़ परिणामी पाणीटंचाईची तीव्रता कमी होते़ मात्र यावर्षी पावसाळ्यामध्ये वार्षिक सरासरीच्या तुलनेत ३० टक्के पाऊस कमी झाला आहे़ त्यामुळे प्रकल्पांमध्ये पाणीसाठा जमा झाला नाही़ त्याचे परिणाम जिल्हावासियांना भोगावे लागत आहेत़उपलब्ध झालेल्या माहितीनुसार येलदरी प्रकल्पामध्ये सध्या १९५़७९३ दलघमी पाणी उपलब्ध असून, प्रकल्पाच्या उपयुक्त पाणीसाठ्याच्या तुलनेत केवळ ८़८ टक्के पाणी शिल्लक असल्याने टंचाईची दाहकता वाढली आहे़येलदरी प्रकल्पातून परभणी, जिंतूर, पूर्णा, वसमत या शहरांबरोबरच ग्रामीण भागातील १०० हून अधिक पाणीपुरवठा योजना चालतात़ मात्र प्रकल्पात पाणीसाठा शिल्लक नसल्याने या सर्व पाणीपुरवठा योजनांचे भवितव्य धोक्यात आले आहे़ याच प्रकल्पावर अवलंबून असलेल्या सिद्धेश्वर प्रकल्पातही २़६ टक्के पाणी उपलब्ध आहे़ सिद्धेश्वर प्रकल्पातून परभणी शहरासाठी एक पाणी पाळी घेतली असून, पुढचा टप्पा मिळतो की नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे़येलदरी प्रकल्पाबरोबर जिल्ह्यातील इतर १९ प्रकल्पांमध्ये पाणीसाठा शिल्लक नसल्याने टंचाईची परिस्थिती वाढत आहे़ या २० ही प्रकल्पांमध्ये २० टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा उपलब्ध आहे़ त्यात गंगाखेड तालुक्यातील मासोळी मध्यम प्रकल्पात ०़४ टक्के, परभणी तालुक्यातील पेडगाव येथील तलावात १२़११ टक्के, अंबेगाव येथील तलावात ०़५४ टक्के , गंगाखेड तालुक्यातील राणीसावरगाव तलावात १८़०६ टक्के, टाकळीवाडी तलावात ८़२२ टक्के, पिंपळदरी तलावात ४़९२ टक्के, दगडवाडी तलावात १़९३ टक्के, डोंगरपिंपळा तलावात ९़७९ टक्के, भेंडवाडी तलावात १६़१८ टक्के, जिंतूर तालुक्यातील चिंचोली तलावात १२़२९ टक्के, आडगाव तलावात १३़१९ टक्के, केहाळ येथील तलावामध्ये ३़२६ टक्के आणि दहेगाव येथील तलावात १४़८५ टक्के पाणी उपलब्ध आहे़या सर्वच प्रकल्पांमधील पाणीसाठ्याने तळ गाठला असून, प्रकल्पांवर अवलंबून असलेल्या पाणीपुरवठा योजना कुचकामी ठरत आहेत़ विशेष म्हणजे नोव्हेंबर महिन्यातच ही परिस्थिती असून, या प्रकल्पातील पाणीसाठा वाढण्याची कोणतीही चिन्हे नसल्याने हे पाणी जुलै महिन्यापर्यंत पुरवायचे असा प्रश्न निर्माण झाला आहे़निम्न दुधना, करपराने तारलेजिल्ह्यात २० प्रकल्पांमध्ये समाधानकारक पाणीसाठा उपलब्ध नसला तरी सेलू तालुक्यातील निम्न दुधना प्रकल्पामध्ये १४१़९८० दलघमी (१६़३ टक्के) पाणीसाठा उपलब्ध आहे़ तर जिंतूर तालुक्यातील करपरा मध्यम प्रकल्पामध्ये १८़२४३ दलघमी (५७़५ टक्के) पाणीसाठा उपलब्ध असून, या दोन्ही प्रकल्पांमुळे थोड्याफार प्रमाणात पिण्यासाठी पाणी उपलब्ध होत आहे़ याशिवाय ढालेगाव बंधाऱ्यात ४१ टक्के, मुदगल बंधाºयात ३६ टक्के आणि डिग्रस बंधाºयातील ५५ टक्के पाणी आशादायक आहे़मोठ्या प्रकल्पांमध्ये ९ टक्के पाणीपरभणी जिल्ह्यात पाटबंधारे विभागाच्या अंतर्गत ३ मोठे प्रकल्प आहेत़ त्यात निम्न दुधना, येलदरी आणि सिद्धेश्वर प्रकल्पाचा समावेश आहे़ या तिन्ही प्रकल्पांमध्ये मिळून केवळ ९़२३ टक्के पाणी शिल्लक आहे़ त्याच प्रमाणे गोदावरी नदीवरील बंधारे आणि लघु प्रकल्पांची संख्या ७ एवढी असून, या सातही प्रकल्पात केवळ ३१़८१ टक्के पाणी उपलब्ध आहे़ लघु प्रकल्पांमध्ये २२ तलावांचा समावेश असून, या तलावातील पाणीसाठाही समाधानकारक नसल्याने पाण्याचे संकट गंभीर होत आहे़मुळी बंधारा : पडला कोरडाठाकगंगाखेड तालुक्यामध्ये पाणीटंचाई अधिक तीव्र होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे़ गंगाखेड शहराला मासोळी मध्यम प्रकल्प आणि मुळी येथील बंधाºयातून पाणीपुरवठा केला जातो़ सद्यस्थितीला मुळीचा बंधारा पूर्णत: कोरडाठाक पडला असून, मासोळी प्रकल्पातही केवळ ७ दलघमी पाणी उपलब्ध आहे़ त्यामुळे शहराला पाणीपुरवठा करताना तारेवरची कसरत करावी लागण्याची शक्यता आहे़ मुळी आणि मासोळी या दोन्ही प्रकल्पांमध्ये पाणी उपलब्ध नसल्याने तालुक्यातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ येऊन ठेपली आहे़ त्याच प्रमाणे सोनपेठ तालुक्यातीलच नखातवाडी या तलावात सांडव्याखाली पाणीसाठा असून, हा तलावही कोरडाठाक आहे़ नखातवाडी तलावाची पाणीसाठवण क्षमता १़७६६ दलघमी एवढी असून, या प्रकल्पात सध्या ०़१२७ दलघमी पाणीसाठा उपलब्ध आहे़ त्यामुळे हा प्रकल्प कोरडा पडल असून, तालुक्यातील पाण्याचे संकट अधिक गंभीर झाले आहे़अवैध उपसा थांबवाप्रकल्पांमध्ये उपलब्ध पाणी पिण्यासाठी राखीव ठेवले असले तरी या पाण्याचा अवैध उपसा होत आहे़ तो थांबवावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीwater scarcityपाणी टंचाईIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प