जलवाहिनीला गळती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:18 IST2021-02-24T04:18:57+5:302021-02-24T04:18:57+5:30
दुहेरीकरण रखडले परभणी: परभणी ते औरंगाबाद या रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचे काम रखडले आहे. विशेष म्हणजे या मार्गाचे सर्वेक्षण पूर्ण ...

जलवाहिनीला गळती
दुहेरीकरण रखडले
परभणी: परभणी ते औरंगाबाद या रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचे काम रखडले आहे. विशेष म्हणजे या मार्गाचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. मात्र अर्थसंकल्पात निधी उपलब्ध नसल्याने दुहेरीकरणाचे काम ठप्प पडले आहे.
काम संथगतीने
परभणी : शहरातील विद्यापीठ गेट भागात उड्डाणपूल उभारणीचे काम संथगतीने सुरू आहे. मागील सहा महिन्यांपासून या कामाला सुरुवात करण्यात आली. मात्र अद्याप एक टप्पाही पूर्ण झाला नाही. सध्या हा मार्ग वाहतुकीसाठी बंद आहे. त्यामुळे वाहनधारकांची गैरसोय होत आहे.
बसफेऱ्याअभावी गैरसोय
परभणी : जिल्ह्यात ग्रामीण भागात पुरेशा प्रमाणात बसफेऱ्या सुरू करण्यात आल्या नाहीत. खड्डेमय रस्त्याची कारणे देत किंवा प्रवासी मिळत नसल्याचे सांगून एसटी महामंडळ बससेवा सुरू करण्यास टाळाटाळ करीत असल्याने ग्रामस्थांची गैरसोय होत आहे.
झाडे वाळू लागली
परभणी : शहरातील दुभाजकावर लावलेली झाडे पाण्याअभावी वाळत आहेत. वसमत रोड आणि जिंतूर रस्त्यावर दुभाजकांवरील झाडांमुळे शहर सौंदर्यात भर पडली आहे. ही झाडे जगविण्यासाठी मनपाने पाण्याची सुविधा निर्माण करावी, अशी मागणी होत आहे.