शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

७० कोटींच्या पाणीपुरवठ्याच्या योजनांच्या तरतुदीस मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:19 IST

परभणी : जिल्ह्यातील ग्रामीण नळ पाणीपुरवठा योजनांची देखभाल व दुरुस्ती आणि १६ गावे कुपटा प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेच्या दुरुस्तीसाठी ...

परभणी : जिल्ह्यातील ग्रामीण नळ पाणीपुरवठा योजनांची देखभाल व दुरुस्ती आणि १६ गावे कुपटा प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेच्या दुरुस्तीसाठी ६९ कोटी ८० लाख रुपयांच्या २०२१-२२ च्या तरतुदीस मंजुरी देण्यात आली आहे.

जिल्हा परिषदेची नुकतीच सर्वसाधारण सभा झाली. यावेळी जिल्हा परिषदेच्या ५० टक्के वाढीव उपकर योजनेंतर्गत ग्रामीण पाणीपुरवठा व देखभाल दुरुस्ती निधीच्या २०२०-२१ सुधारित व २०२१-२२ च्या मूळ अंदाजपत्रकात पुनर्विनियोजन दायित्व तरतुदीस मंजुरी देण्याचा विषय सभागृहात ठेवण्यात आला होता. यावेळी जल व्यवस्थापन समितीने मान्य केलेल्या ठरावानुसार २०२०-२१मध्ये ४९ कामांना मान्यता प्रदान करण्यात आली असून २०२०-२१ मध्ये मंजूर कामांपैकी २२ कामे पूर्ण झाली असून २७ कामे अपूर्ण आहेत, असे या विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

याशिवाय २०२०-२१ मधील अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी २०२१-२२ मध्ये खर्च करण्याकरीता यापूर्वी २८ एप्रिल रोजी झालेल्या सर्वसाधारण सभागृहातील बैठकीतील पुनर्विनियोजन दायित्व म्हणून ठेवलेल्या रकमेस मान्यता देण्यात आली. त्यानुसार ग्रामीण नळ पाणीपुरवठा योजनांची देखभाल व दुरुस्ती यासाठी २०२०-२१मध्ये २४ कोटी २० लाख रुपयांची सुधारित तरतूद मंजूर करण्यात आली होती. मार्चअखेर यावर १ कोटी ४३ लाख ८८ हजार ६७०रुपये खर्च झाले. २०२१-२२ मध्ये यासाठी एकूण १९ कोटी ३० लाखांची तरतूद मंजूर करण्यात आली. १६ गावे कुपटा प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेची दुरुस्ती यासाठी २०२०-२१मध्ये १४ लाख ५० हजार रुपयांची तरतूद करण्यात आली होती. या योजनेवर खर्च झाला नाही. त्यामुळे या निधीचे पुनर्विनियोजन करुन २४ कोटी ५०लाख रुपयांच्या २०२१-२२ मधील तरतुदीस यावेळी मंजुरी देण्यात आली.

नवीन कामासाठी १ कोटी ७२ लाखांचे दायित्व

ग्रामीण नळ पाणीपुरवठा योजनांच्या देखभाल व दुरुस्तीची अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी २०२०-२१ मधील १ कोटी ५७लाख ९६ हजार ६३९रुपयांचे तर १६ गाव कुपटा प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना दुरुस्तीचे २०२०-२१ मधील अपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी १५ लाख १५ हजार रुपयांचे दायित्व यावेळी मंजूर करण्यात आले.

त्यामुळे ग्रामीण भागातील बंद असलेल्या पाणीपुरवठा योजना सुरू होण्याची शक्यता आहे. सध्याच्या कोरोना स्थितीमुळे राज्य शासनाकडून जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जिल्हा परिषदेला देण्यात आलेल्या निधीत कपात करण्यात आली आहे.