शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

७० कोटींच्या पाणीपुरवठ्याच्या योजनांच्या तरतुदीस मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:19 IST

परभणी : जिल्ह्यातील ग्रामीण नळ पाणीपुरवठा योजनांची देखभाल व दुरुस्ती आणि १६ गावे कुपटा प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेच्या दुरुस्तीसाठी ...

परभणी : जिल्ह्यातील ग्रामीण नळ पाणीपुरवठा योजनांची देखभाल व दुरुस्ती आणि १६ गावे कुपटा प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेच्या दुरुस्तीसाठी ६९ कोटी ८० लाख रुपयांच्या २०२१-२२ च्या तरतुदीस मंजुरी देण्यात आली आहे.

जिल्हा परिषदेची नुकतीच सर्वसाधारण सभा झाली. यावेळी जिल्हा परिषदेच्या ५० टक्के वाढीव उपकर योजनेंतर्गत ग्रामीण पाणीपुरवठा व देखभाल दुरुस्ती निधीच्या २०२०-२१ सुधारित व २०२१-२२ च्या मूळ अंदाजपत्रकात पुनर्विनियोजन दायित्व तरतुदीस मंजुरी देण्याचा विषय सभागृहात ठेवण्यात आला होता. यावेळी जल व्यवस्थापन समितीने मान्य केलेल्या ठरावानुसार २०२०-२१मध्ये ४९ कामांना मान्यता प्रदान करण्यात आली असून २०२०-२१ मध्ये मंजूर कामांपैकी २२ कामे पूर्ण झाली असून २७ कामे अपूर्ण आहेत, असे या विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

याशिवाय २०२०-२१ मधील अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी २०२१-२२ मध्ये खर्च करण्याकरीता यापूर्वी २८ एप्रिल रोजी झालेल्या सर्वसाधारण सभागृहातील बैठकीतील पुनर्विनियोजन दायित्व म्हणून ठेवलेल्या रकमेस मान्यता देण्यात आली. त्यानुसार ग्रामीण नळ पाणीपुरवठा योजनांची देखभाल व दुरुस्ती यासाठी २०२०-२१मध्ये २४ कोटी २० लाख रुपयांची सुधारित तरतूद मंजूर करण्यात आली होती. मार्चअखेर यावर १ कोटी ४३ लाख ८८ हजार ६७०रुपये खर्च झाले. २०२१-२२ मध्ये यासाठी एकूण १९ कोटी ३० लाखांची तरतूद मंजूर करण्यात आली. १६ गावे कुपटा प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेची दुरुस्ती यासाठी २०२०-२१मध्ये १४ लाख ५० हजार रुपयांची तरतूद करण्यात आली होती. या योजनेवर खर्च झाला नाही. त्यामुळे या निधीचे पुनर्विनियोजन करुन २४ कोटी ५०लाख रुपयांच्या २०२१-२२ मधील तरतुदीस यावेळी मंजुरी देण्यात आली.

नवीन कामासाठी १ कोटी ७२ लाखांचे दायित्व

ग्रामीण नळ पाणीपुरवठा योजनांच्या देखभाल व दुरुस्तीची अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी २०२०-२१ मधील १ कोटी ५७लाख ९६ हजार ६३९रुपयांचे तर १६ गाव कुपटा प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना दुरुस्तीचे २०२०-२१ मधील अपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी १५ लाख १५ हजार रुपयांचे दायित्व यावेळी मंजूर करण्यात आले.

त्यामुळे ग्रामीण भागातील बंद असलेल्या पाणीपुरवठा योजना सुरू होण्याची शक्यता आहे. सध्याच्या कोरोना स्थितीमुळे राज्य शासनाकडून जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जिल्हा परिषदेला देण्यात आलेल्या निधीत कपात करण्यात आली आहे.