शहरं
Join us  
Trending Stories
1
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
2
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
3
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
4
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
5
"अभी तो मै जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
6
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
7
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
8
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
9
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
10
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
12
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
13
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
14
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
15
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
16
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
17
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
18
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
19
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
20
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांविना शाळेच्या भिंती झाल्या अबोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:13 IST

गतवर्षीपासून कोरोना विषाणू संसर्गाचा पार्श्वभूमीवर गावागावातील शाळा बंद असल्याने, शाळेतील किलबील बंद झाली आहे. त्यातच यंदाही तिसऱ्या लाटेची शक्यता ...

गतवर्षीपासून कोरोना विषाणू संसर्गाचा पार्श्वभूमीवर गावागावातील शाळा बंद असल्याने, शाळेतील किलबील बंद झाली आहे. त्यातच यंदाही तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरून नवीन शैक्षणिक वर्षातही शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. जून महिना सुरू झाला की, मुलांना शाळेची चाहूल लागते. शाळेचा परिसर, विद्यार्थी मित्र, शिक्षकवर्गाचे संस्कार यामधून विद्यार्थी घडत असतो. याबरोबरच विविध विषयांच्या माहितीने सजविलेल्या शाळेच्या भिंतीचे योगदानही विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व घडवण्यात महत्त्वाचे असते. परिसरातील सावरगाव केंद्रांतर्गत सर्व जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये भिंतीवर सचित्र अशी रंगरंगोटी करण्यात आलेली आहे. शाळेच्या भिंतीवरील इतिहासातील घडामोडींचे चित्ररूपी वर्णन, नकाशातून सूचित केलेले राज्य, देश, जगातील इतर माहिती, गणितीय पाढे, संतवाणी, देशाविषयी माहिती, राष्ट्रगीत, प्रार्थना, याबरोबरच विविध पशुपक्षी व प्राण्यांविषयी सचित्र माहिती विद्यार्थ्यांना जीवनभर मोलाची ठरत असते. म्हणूनच या भिंती प्रत्येक विद्यार्थ्यांना बोलक्या वाटत असतात, परंतु मागील वर्षापासून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शाळेत जाण्यापासून वंचित राहावे लागत आहे. यंदाही शाळा सुरू होण्याबाबत अनिश्‍चितता दिसून येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना घरातच अडकून पडावे लागत आहे. परिसरातील बहुतांशी शाळेतील शिक्षकांनी लोकवर्गणी व शिक्षकांचा सहभाग या माध्यमातून शालेय परिसराचा कायापालट केला आहे. मात्र, सध्या शाळाच बंद असल्याने शाळेचा परिसर ओस पडला आहे, तर बोलक्या भिंतीही विद्यार्थ्यांविना अबोल झालेल्या दिसून येत आहेत.

विद्यार्थ्यांना शाळेत येताच प्रसन्न वाटावे, यासाठी शाळेच्या भिंतीवर सचित्र अशी आकर्षक रंगरंगोटी करून शाळेच्या बोलक्या केलेल्या भिंती व निसर्गरम्य परिसर विद्यार्थ्यांअभावी ओस पडला आहे.

अनिल सावळे, मुख्याध्यापक जि.प. शाळा ताडबोरगाव

शालेय जीवनात शाळेच्या परिसराशी विद्यार्थ्यांचे घट्ट नाते असते. त्यामुळे आकर्षक रंगरंगोटी करून शाळेच्या बोलक्या भिंती मधून दिलेली माहिती, संदेश यामधून विद्यार्थ्यांना आयुष्यभराची ज्ञानाची शिदोरी मिळत असते .परंतु सध्या शाळाच बंद असल्याने विद्यार्थ्यांविना या भिंती सुन्या सुन्या पडल्या आहेत.

शिरीष लोहट, केंद्रप्रमुख सावरगाव