शहरं
Join us  
Trending Stories
1
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
2
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
3
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
4
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
5
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांचा 'चतुर' मारा; ऋतुराज गायकवाड एकटा भिडला अन् विराटला... 
6
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
7
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
8
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
9
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
10
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
11
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
12
BANW vs INDW: मालिका एकतर्फी जिंकण्याची टीम इंडियाला सुवर्णसंधी; बांगलादेशात भारताचा दबदबा
13
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
14
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
15
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
16
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
17
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
18
पाकिस्तानला करायचीय भारताची बरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
19
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू
20
मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुतारीला पाठिंबा, शरद पवारांसोबत स्टेजवर येत केला प्रचार

जिल्ह्यात ६७६ नवे रुग्ण; १२ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 4:16 AM

मागील दोन ते तीन आठवड्यांपासून कोरोनाने जिल्हावासीयांना त्रस्त करून सोडले आहे. दररोज मोठ्या प्रमाणात रुग्ण दगावत असल्याने नागरिकांची धास्तीही ...

मागील दोन ते तीन आठवड्यांपासून कोरोनाने जिल्हावासीयांना त्रस्त करून सोडले आहे. दररोज मोठ्या प्रमाणात रुग्ण दगावत असल्याने नागरिकांची धास्तीही वाढली आहे. आरोग्य प्रशासन आणि जिल्हा प्रशासन कोरोनाचा अटकाव करण्यासाठी प्रयत्न करीत असतानाही हा संसर्ग कमी होत नसल्याने चिंता निर्माण झाली आहे.

गुरुवारी जिल्ह्यातील १२ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला. शासकीय रुग्णालयातील दहा आणि खासगी रुग्णालयातील दोन रुग्णांचा यात समावेश आहे. मागील तीन-चार दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची संख्या वाढली आहे. दररोज १० ते १५ रुग्ण दगावत असल्याने आता नागरिकांना अधिक काळजी घेण्याची गरज आहे.

आरोग्य विभागाला गुरुवारी १ हजार ८८३ नागरिकांचे अहवाल प्राप्त झाले. त्यात आरटीपीसीआरच्या १ हजार २५ अहवालांमध्ये ३४३ आणि रॅपिड अँटिजेन टेस्टच्या ८५८ अहवालांमध्ये ३३३ नागरिकांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २३ हजार ५०२ झाली आहे. त्यापैकी १७ हजार ४७६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या आता ५९१ वर पोहोचली आहे. सध्या ५ हजार ४३५ रुग्ण उपचार घेत आहेत.

येथील जिल्हा रुग्णालयात १४७, आय.टी.आय. हॉस्पिटलमध्ये १३५, जिल्हा परिषदेच्या कोविड रुग्णालयात २३१, अक्षदा मंगल कार्यालयात १२८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्याचप्रमाणे ४ हजार २५९ रुग्णांवर त्यांच्या घरीच उपचार केले जात आहेत. उर्वरित रुग्ण परभणी शहरातील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.

५२२ रुग्णांची कोरोनावर मात

जिल्ह्यातील ५२२ रुग्णांनी गुरुवारी कोरोनावर मात केली आहे. या रुग्णांना कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळली नसल्याने आरोग्य विभागाने त्यांना रुग्णालयातून सुटी दिली. मागील तीन दिवसांपासून दररोज ५०० पेक्षा अधिक रुग्णांची सुटी होत आहे, ही समाधानाची बाब आहे.