शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ६७६ नवे रुग्ण; १२ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:16 IST

मागील दोन ते तीन आठवड्यांपासून कोरोनाने जिल्हावासीयांना त्रस्त करून सोडले आहे. दररोज मोठ्या प्रमाणात रुग्ण दगावत असल्याने नागरिकांची धास्तीही ...

मागील दोन ते तीन आठवड्यांपासून कोरोनाने जिल्हावासीयांना त्रस्त करून सोडले आहे. दररोज मोठ्या प्रमाणात रुग्ण दगावत असल्याने नागरिकांची धास्तीही वाढली आहे. आरोग्य प्रशासन आणि जिल्हा प्रशासन कोरोनाचा अटकाव करण्यासाठी प्रयत्न करीत असतानाही हा संसर्ग कमी होत नसल्याने चिंता निर्माण झाली आहे.

गुरुवारी जिल्ह्यातील १२ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला. शासकीय रुग्णालयातील दहा आणि खासगी रुग्णालयातील दोन रुग्णांचा यात समावेश आहे. मागील तीन-चार दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची संख्या वाढली आहे. दररोज १० ते १५ रुग्ण दगावत असल्याने आता नागरिकांना अधिक काळजी घेण्याची गरज आहे.

आरोग्य विभागाला गुरुवारी १ हजार ८८३ नागरिकांचे अहवाल प्राप्त झाले. त्यात आरटीपीसीआरच्या १ हजार २५ अहवालांमध्ये ३४३ आणि रॅपिड अँटिजेन टेस्टच्या ८५८ अहवालांमध्ये ३३३ नागरिकांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २३ हजार ५०२ झाली आहे. त्यापैकी १७ हजार ४७६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या आता ५९१ वर पोहोचली आहे. सध्या ५ हजार ४३५ रुग्ण उपचार घेत आहेत.

येथील जिल्हा रुग्णालयात १४७, आय.टी.आय. हॉस्पिटलमध्ये १३५, जिल्हा परिषदेच्या कोविड रुग्णालयात २३१, अक्षदा मंगल कार्यालयात १२८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्याचप्रमाणे ४ हजार २५९ रुग्णांवर त्यांच्या घरीच उपचार केले जात आहेत. उर्वरित रुग्ण परभणी शहरातील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.

५२२ रुग्णांची कोरोनावर मात

जिल्ह्यातील ५२२ रुग्णांनी गुरुवारी कोरोनावर मात केली आहे. या रुग्णांना कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळली नसल्याने आरोग्य विभागाने त्यांना रुग्णालयातून सुटी दिली. मागील तीन दिवसांपासून दररोज ५०० पेक्षा अधिक रुग्णांची सुटी होत आहे, ही समाधानाची बाब आहे.