शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक
2
भारतात राहणारे सर्वच हिंदू; मुस्लीम आणि ख्रिश्चन आपल्याच पूर्वजांचे वंशज, काय म्हणाले सरसंघचालक मोहन भागवत
3
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
4
सोनं की रिअल इस्टेट? गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय ठरेल जास्त फायदेशीर? तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
5
जेल की रिसॉर्ट? ISIS रिक्रूटर आणि सीरियल किलरकडे मोबाईल; अधिकाऱ्यांच्या मदतीने कैद्यांची मजा
6
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
7
प्रदूषणकारी रसायनांचे उत्पादन करणारा कारखाना रत्नागिरीच्या लोटे वसाहतीत
8
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
9
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
10
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
11
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
12
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
13
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
14
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."
15
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
16
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
17
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
18
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
19
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
20
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!

सोनपेठ तालुक्यात बोंडअळीचे ६ कोटींचे अनुदान बँकेत जमा; लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 19:15 IST

तालुक्यातील बोंडअळीग्रस्त कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी दुसऱ्या टप्यातील ७ कोटी ९७ लाख ३८ हजार २२० रुपयांची अनुदानाची रक्कम तहसील कार्यालयास प्राप्त झाली आहे़

ठळक मुद्देतालुक्यातील ६२ गावांतील कापसाचे पीक बोंडअळीच्या हल्ल्याने फस्त झाले होते. आणखी ६० लाख २९ हजारांच्या निधीची प्रतीक्षा

सोनपेठ(परभणी)  : तालुक्यातील बोंडअळीग्रस्त कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी दुसऱ्या टप्यातील ७ कोटी ९७ लाख ३८ हजार २२० रुपयांची अनुदानाची रक्कम तहसील कार्यालयास प्राप्त झाली आहे़ यातील ६ कोटी २८ लाख ३० हजार ८३६ रूपयांची रक्कम शेतकऱ्यांना वाटपासाठी बँकाकडे पाठविण्यात आली आहे़ 

सोनपेठ तालुक्यात गतवर्षी शेतकऱ्यांनी शेकडो हेक्टवर कापूस पिकाची लागवड केली होती. पीक बहरात असताना बोंडअळीने हल्ला सुरू केला. महागडी औषधी फवारूनही पिकांसाठी केलेला खर्चही निघाला नाही. त्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले होते. शासनाने बोंडअळीग्रस्त पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. कृषी विभाग व  महसूल विभागाच्या वतीने नुकसानग्रस्त कापूस पिकाचे पंचनामे करण्यात आले.

तालुक्यातील ६२ गावांतील कापसाचे पीक बोंडअळीच्या हल्ल्याने फस्त झाले होते. शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अनुदान जाहीर केले. त्यानुसार पहिल्या टप्प्यातील १९ गावातील ८ हजार ८४३ शेतकऱ्यांना ४ कोटी २० लाख रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले. त्यानंतर काही दिवसानंतर दुसऱ्या टप्प्यातील अनुदान तहसील प्रशासनाला प्राप्त झाले आहे. यामध्ये ३० गावांतील १५ हजार ८९५ शेतकऱ्यांसाठी ७ कोटी ९७ लाख ३८ हजार २२० रुपयांचे अनुदान मंजूर झाले आहे .

यातील कोठाळा, उखळी, उक्कडगाव, खपाट पिंपरी, डिघोळ, तीवठाणा, थडी उक्कडगाव, थडी पिंपळगाव, निमगाव, निळा, नरवाडी, पोंहडूळ, पोंहडूळ तांडा, मरगळवाडी, मोहळा, लासीना, लोहीग्राम, वंदन, वाडी, नैकोटा, वाडी पिंपळगाव, शिर्शी, शिरोरी, शेळगाव हटकर, सोनपेठ, सायखेड या २५ गावांतील १२ हजार ५३० शेतकऱ्यांचे ६ कोटी २८ लाख ३० हजार ८३६ रुपयांच्या अनुदान वाटपाची यादी बँकेकडे पाठविली आहे. वडगाव, नैकोटा, शेळगाव म., सोनखेड, पारधवाडी या पाच गावांतील ३ हजार ३६५ शेतकऱ्यांची यादी लवकरच बँकेकडे पाठविण्यात येणार आहे़ 

६० लाख २९ हजारांच्या निधीची प्रतीक्षातालुक्यातील ६२ गावांपैकी १९ गावांतील शेतकऱ्यांना बोंडअळीचे अनुदान वाटप करण्यात आले आहे. तर २५ गावांतील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अनुदान वाटपाची प्रक्रिया सुरू आहे. तर पाच गावांतील बँकेमध्ये निधी जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. असे असले तरी विटा, वाणीसंगम, वैतागवाडी या गावातील अनुदान वाटपाच्या प्रक्रियेला गती आलेली नाही. या गावातील अनेक शेतकऱ्यांचे बँक खाते उपलब्ध झाले नाही. तसेच निधीची चणचणही भासत असल्याच्या प्रतिक्रिया ऐकावयास मिळत आहेत. या गावांतील १ हजार ४७ शेतकऱ्यांना ६० लाख २९ हजार १६० रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे. हे अनुदान लवकर देण्यात यावे, अशी मागणी होत आहे. दरम्यान, यासंदर्भात तहसीलदार जीवराज डापकर म्हणाले की, उर्वरित अनुदानाची रक्कम अद्याप मिळालेली नाही. ती मिळताच शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केली जाईल. 

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीMONEYपैसाState Governmentराज्य सरकारbankबँक