शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
4
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
5
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
6
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
7
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
8
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
9
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
10
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
11
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
12
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
13
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
14
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
15
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
16
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
17
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
18
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
19
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
20
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...

मानवत पंचायत समितीकडे सिंचन विहिरीचे २६० प्रस्ताव धूळ खात पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 8:18 PM

पंचायत समितीकडे मनरेगांतर्गत दाखल झालेले सिंचन विहिरींचे २६० प्रस्ताव धूळ खात पडून आहेत.

- सत्यशील धबडगे 

मानवत (परभणी ) : येथील पंचायत समितीकडे मनरेगांतर्गत दाखल झालेले सिंचन विहिरींचे २६० प्रस्ताव धूळ खात पडून आहेत. तसेच २०१७-१८ या वर्षातील छाननी समितीने मंजुरी दिलेल्या ४१ सिंचन विहिरींच्या कामांना कार्यारंभ आदेश देण्यात आले नसल्याने लाभार्थी पंचायत समितीकडे चकरा मारीत आहेत. 

महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत वैयक्तिक लाभाच्या सिंचन विहिरींच्या कामांना मागणी वाढत आहे. यासाठी शासनाने सिंचन विहिरीसाठी ३ लाख रुपयांचे अनुदान जाहीर केले आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी ग्रा.पं. पुढाकार घेत आहे. २०१५-१६ या वर्षामध्ये २५० सिंचन विहिरींची कामे हाती घेण्यात आली होती. २०१६-१७ व २०१७-१८ या वर्षामध्ये ग्रा.पं. कडून सिंचन विहिरींचे प्रस्ताव पं.स.कडे दाखल करण्यात आले आहेत. परंतु, २०१७-१८ या वर्षामध्ये शासनाने मनरेगामध्ये अकरा कलमी कार्र्यक्रम राबविण्याचा निर्णय घेतला. याला ‘अहिल्यादेवी सिंचन विहीर’ असे नाव देण्यात आले. या योजनेंतर्गत ४५० विहिरींची उद्दिष्ट देण्यात आले आहे. ग्रामपंचायतींनी लाभार्थ्यांचे २६० प्रस्ताव दाखल केले आहेत. परंतु, या प्रस्तावांना मान्यता दिली नसल्याने हे प्रस्ताव धूळ खात पडून आहेत. 

१८ डिसेंबर २०१७ रोजी छाननी समितीने ४७ सिंचन विहिरींच्या प्रस्तावांना छाननी समितीने मंजुरी दिली होती. मात्र या प्रस्तावासंदर्भात पुढे कारवाई होत नसल्याने प्रस्तावांना मंजुरी मिळूनही कामांना कार्यारंभ आदेश नसल्याने कामे सुरु झाली नाहीत.  त्यामुळे लाभार्थी पं.स.कडे चकरा मारीत आहेत. विशेष म्हणजे, शेतकर्‍यांनीही १७२ प्रस्ताव दाखल  केले असल्याची माहिती आहे़ या प्रस्तावावरही काय कारवाई झाली? हे समजण्यास मार्ग नाही. प्रशासकीय मान्यता मिळालेल्या कामांना ३१ मार्चपूर्वी कार्यारंभ आदेश देण्यात यावेत, अशी मागणी लाभार्थी शेतकरी करीत आहेत.

कुशलची जुनी देयके रखडलीसिंचन विहिरीचे खोदकाम झाल्यानंंतर शेतकर्‍यांनी या कामाची बिले पं.स.कडे दाखल केली आहेत. परंतु, मागील कामांच्या कुशलची देयके रखडली आहेत. त्यामुळे तब्बल ७० लाख रुपये अडकले आहेत. गटविकास अधिकारी एस.एच. छडीदार यांनी रोहयोच्या वरिष्ठांकडे ९ मार्च २०१८ रोजी लेखीपत्र देऊन एफटीओची देयके देण्यासाठी ७० लाख ९५ हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी केली आहे.

लाभार्थी वंचित एकीकडे मनरेगांतर्गत शासन मागेल त्याला विहीर देण्याची घोषणा करीत आहे. दुसरीकडे अधिकार्‍यांच्या उदासिनतेमुळे लाभार्थी वंचित राहण्याची शक्यता आहे. -वैशाली पंकज आंबेगावकर, जि.प. सदस्य 

आंदोलन करण्यात येईल३१ मार्च अखेर प्रशासकीय मान्यता मिळालेल्या विहिरींच्या कामांचे कार्यारंभ आदेश न दिल्यास शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल. -विष्णू मांडे, जि.प. सदस्य तथा शिवसेना तालुकाप्रमुख

प्रयत्न सुरू आहेतमनरेगांतर्गत सिंचन विहीर प्रस्तावा संदर्भात कारवाई सुरू असून या संदर्भातील कामे सुरू करण्यासाठी प्रशासकीय स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. -एस.एच. छडीदार, गटविकास अधिकारी, मानवत 

टॅग्स :Farmerशेतकरीparabhaniपरभणीpanchayat samitiपंचायत समितीagricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्र