शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

आनंदानं जगायचंय? मग ‘च’ वजा करा आयुष्यातून!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2020 16:47 IST

हे मिळालं‘च’ पाहिजे ते झालं‘च’ पाहिजे ते केलं‘च’ पाहिजे हे जमलं‘च’ पाहिजे. हा अट्टाहास काढून टाका. आनंदानं जगा, आपण जगलो तर खूप गोष्टी करू, असं सांगा स्वतर्‍ला.

ठळक मुद्दे10 सप्टेंबर- आत्महत्या प्रतिबंधक दिन, त्यानिमित्तानं ही खास मुलाखत.

- नंदकुमार मुलमुले

1) 2019 मध्ये 1.39 लाख आत्महत्या झाल्यात. त्यात 67 टक्के तरु ण होते. 2018च्या तुलनेत तरुणांच्या आत्महत्या 4 टक्क्यांनी वाढल्या, अशी माहिती नुकतीच प्रसिद्ध झाली आहे. वाढत्या आत्महत्यांची कारणं काय असावीत? विशेषतर्‍ तरुण मुलांची. - जगभरात वर्षाकाठी आठ ते दहा लाख आत्महत्या होतात. यापैकी जवळपास 17 टक्के भारतात होतात. भारताचा जवळपास एक लाख 35 हजार आकडा येतो. आपल्या देशात दर एक तासाला एक विद्यार्थी आणि दर अडीच तासाला एक शेतकरी आत्महत्या करतो.आता वर्तमानात यात वाढ होण्याची कारणं म्हणजे कोरोना संकट. कोरोनाकाळात उद्योगधंद्याला बसलेला मोठा आर्थिक फटका. मोठय़ा प्रमाणात लोकांनी नोकर्‍या गमावल्यात, येत्या वर्षात हे प्रमाण अजून वाढेल. अनेक लोक भविष्याच्या चिंतेनेही नैराश्यात जात जगणं नाकारत आहेत. लोकांच्या मुक्त, मोकळ्या वावरावर गदा आलीय. सतत आजाराचा, संसर्गाचा धोका आणि एकप्रकारे हरेकाच्या जवळ मृत्यूचं सावट आहे. मला रोज किमान चार फोन येतात, की अस्वस्थ, घाबरल्यासारखं वाटतंय. त्यात तरुणही असतात. एकजण मला म्हणाला, की मी सध्या वर्कफ्रॉम होम करतो. ज्याप्रमाणात सेल झाला पाहिजे तो या काळात होत नाही, मार्केट डाऊन आहे. मात्न माझा सीनिअर मॅनेजर मला रोज दबाव टाकतो, सेल वाढव. टार्गेट पूर्ण होत नाही. त्यातून ताण येतोय. एकाकीपणा वाढलेला आहे. लोकांना खरी माहिती वेळच्या वेळी मिळत नाहीय, त्यातून असुरक्षितता वाढतेय.

 

2) या काळात तरुणांनी स्वतर्‍ची आणि आपल्या सभोवतालच्या माणसांची काय काळजी घ्यावी?

एकूणच आत्महत्या या जैवसामाजिक घटना असतात. व्यक्ती आणि व्यक्तीभवतालचा समाज दोन्हींचं या कृतीत योगदान असतं.आत्महत्या करणारे 80 टक्के लोक मनोविकाराने ग्रस्त असतात. या 80 टक्क्यांमधील बहुतांश लोक नैराश्याने ग्रस्त असतात. नैराश्य हा फार कळीचा मुद्दा आहे. दुर्दैवाने आपल्या लोकांना मानसिक आजारांची लक्षणं अजिबातच माहीत नसतात. आपण सर्वसामान्य उदासीसाठीही डिप्रेशन हा शब्द सहज वापरतो.विविध मनोविकार या मेंदूरासायनिक घटना आहेत. एखाद्याला डिप्रेशन येणं किंवा न येणं हे त्याच्या हातात नसतं. मेंदूत विशिष्ट रसायनांची कमतरता निर्माण झाल्याने हे उद्भवतं. डिप्रेशन व्हायला काय झालं हा अत्यंत वेडेपणाचा प्रश्न आहे. तुला कॅन्सर व्हायला काय झालं, असं म्हणण्यासारखं ते झालं.डिप्रेशन आणि आत्महत्येला विद्यार्थी आणि तरुण जास्त बळी पडतात. कारण विद्यार्थिवर्ग हा यशाचा, अपेक्षांचा, शिक्षणाचा आणि भविष्याचा ताण एकत्र झेलतो. यशाच्या मागे धावावं; पण त्यात आनंद असला पाहिजे. प्रचंड अपेक्षा करणारे पालक आणि जीवतोड स्पर्धेचं युगही याला जबाबदार आहे. येती दोन वर्षे तरी पालकांनी अवाजवी अपेक्षांचं ओझं पाल्यांवर नको टाकायला.पोस्ट ट्रॉमाटिक स्ट्रेस डिसऑर्डर म्हणजे आघातोत्तर तणाव, याचं प्रमाण करोनाकाळात, तो ओसरल्यावरही प्रचंड वाढणार आहे. नैराश्यग्रस्तांचंही प्रमाण वाढणार आहे.कुणी डॉक्टरकडे जायचा सल्ला दिल्यास, ‘तुम्ही मला वेडे ठरवणार आहात का?’  असं म्हणायला नको. नैराश्य हा क्र ोनिक डिसीज आहे. कुठल्याही गाफील क्षणी त्यात तुम्ही अडकू शकता. तो सर्दी ताप-खोकल्यासारखा लगोलग बरा होत नाही. काही महिने किंवा र्वष उपचार घ्यावे लागतात. भोवतालच्या व्यक्तींनी अशा व्यक्तीवर लक्ष ठेवणं, त्याचं मन जाणून घेणं गरजेचं आहे.डिप्रेशन आणि त्या स्वरुपाच्या त्रासात लगोलग वैद्यकीय मदत घेणं गरजेचं आहे. औषधोपचार डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घेणं आणि मध्येच अजिबात बंद न करणं महत्त्वाचं. अस्वस्थ वाटणं, मन न लागणं, आवडत्या गोष्टींवरून मन उडून जाणं, रोजच्या कामातही अडथळा निर्माण होणे अशी लक्षणं ज्याला स्वतर्‍त जाणवतात त्यानं त्याकडे दुर्लक्ष करायला नको. मनाने उपचारही घ्यायला नको. अनेकदा आजूबाजूचे लोक डॉक्टरकडे जाण्यापासून परावृत्त करतात,  त्या झोपेच्या गोळ्या असतात, घेऊ नको, असे चुकीचे सल्ले देतात. एकूण समाज म्हणून आपण या काळात माणसांना अधिक संवेदनशीलतेने हाताळलं पाहिजे. यशाचे आणि एकूणच सुखी असण्याचे निकष सैल केले पाहिजेत. मानसिक आरोग्याबद्दलची साक्षरता वाढली पाहिजे. शिवाय मानसोपचारतज्ज्ञांची संख्याही वाढली पाहिजे. देशात आज फक्त 5000 नोंदणीकृत सायकॅट्रिस्ट आहेत. एकूण 8 ते 9 हजार आहेत. 130 कोटींसाठी हे मुळीच पुरेसं नाही.भारतात 80 टक्के आत्महत्या साक्षर लोकच करतात. तामिळनाडू, केरळ, त्रिपुरा, महाराष्ट्र अशी राज्य आत्महत्यांमध्ये आघाडीवर आहेत. त्यामानाने उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थानमध्ये हे प्रमाण खूप कमी आहे. याचा निष्कर्ष आपण समजू शकतो.साक्षरतेसोबतच यशाची जीवघेणी चढाओढ सुरू होते. त्यातून पुढचं सगळं उद्भवतं.

3) आत्महत्या रोखण्यासाठी या काळात समाज म्हणून आपण कसं वागलं पाहिजे? 

भोवतालातले लोक तुम्हाला आश्वस्त करणारे आहेत की अधिक नैराश्य आणि नकारात्मकतेकडे ढकलणारे हे इथे महत्त्वाचं ठरतं. परफेक्शनचा अतिरेक करू नका. आयुष्यातला ‘च’ काढून टाका, की हे मिळालंच पाहिजे, आत्ताच हे झालं पाहिजे वगैरे..विफलता सहन करण्याची ताकद या पिढीने वाढवली पाहिजे. पालकांनीही मुलांना अपयश पचवायला शिकवलं पाहिजे. संवाद तुटतो तेव्हा माणूस आत्महत्येला बळी पडतो. एकाकीपण हे आत्महत्येकडे नेणारं पाहिलं पाऊल आहे. या काळात एकमेकांना सोबत देत तरून जाणं सर्वाधिक मोलाचं आहे.दुसर्‍या महायुद्धाच्या काळात ज्यू छळछावणीत डांबून ठेवलेले मनोविकारतज्ज्ञ व्हेकटर फ्रँकल याने  मॅन इन सर्च ऑफ मीनिंग  हे पुस्तक लिहिलं. ते नक्की वाचलं पाहिजे.त्यात तो सांगतो, की एक प्रिय गोष्ट मनाशी धरून जेव्हा सगळं पूर्ववत होईल तेव्हा ते करू असं म्हणत त्या गोष्टीसाठी आपण जगलं पाहिजे. आज हरेकाने हा मंत्र लक्षात ठेवावा.

(प्रख्यात मानसोपचारतज्ज्ञ आणि साहित्यिक आहेत)मुलाखत आणि शब्दांकनशर्मिष्ठा भोसले