शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

ही माध्यमं ‘ताकद’ देतील? सोशल मीडियावरचा संताप कोरडाच!

By admin | Updated: September 11, 2014 17:15 IST

सरकारी यंत्रणांशी जिथे जिथे कामासाठी संपर्क येतो, तिथे तिथे त्रास होतो. अनेकांना होतो. सरकारी यंत्रणांचं काम सोपं करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर होऊ शकतो का?

सरकारी यंत्रणांशी जिथे जिथे कामासाठी संपर्क येतो, तिथे तिथे त्रास होतो. अनेकांना होतो. सरकारी यंत्रणांचं काम सोपं करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर होऊ शकतो का?
तर होऊ शकतो.
पण सोशल मीडियाचा असं म्हणण्यापेक्षा इंटरनेट बेस्ड टेक्नॉलॉजीचा जास्त उपयोग होऊ शकतो. सरकारी कामात चांगल्या अर्थानं बदल करायचा असेल
तर तंत्रज्ञानाच्या मदतीनं नक्की करता येईल. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे ‘आयआरसीटीसी’ची वेबसाइट. पूर्वी रेल्वेची तिकिटं काढणं, आरक्षण करणं हा केवढा सायास होता. किती अवघड, भयानक वाटत असे सारं. आता किती सोप्या पद्धतीनं घरबसल्या आपण तिकीट आरक्षण करू शकतं. इंटरनेट एखाद्या व्यवस्थेत किती आमूलाग्र परिवर्तन घडवू शकते याचं हे एक उदाहरणच आहे. निवडणूक आयोगाची वेबसाइटवर अशीच सगळी माहिती मिळते. आपण आता सगळी बिलं घरबसल्या ऑनलाइन भरू शकतो.
डिजिटल माध्यमांचा हा वापर, आपलं जगणं सुखकर करू शकतो. ज्यांच्या या नव्या माध्यमांवर हात आहे, जी तरुण मुलं टेक्नॉलॉजी उत्तम वापरू शकतात त्यांनी या बदलत्या डिजिटल यंत्रणांचा फायदा करून घेणं
शिकलं पाहिजे. त्यातून माहिती तर चटकन मिळेलच पण आपली कामंही जलद-सोप्या आणि पारदश्री पद्धतीनं होऊ शकतील.
ज्या ज्या सरकारी व्यवस्थेनं तंत्रज्ञान वापरून आपली माहिती, सेवा थेट वापरकर्त्यापर्यंत ( एण्ड युजरपर्यंत) पोहोचवली, तिथे मध्यस्थ उरलेच नाहीत. त्या
त्या योजना प्रचंड यशस्वी झाल्या. अशा प्रकारच्या सेवांचा लाभ करून घेणंही आता तरुण मुलांना जमायला हवं!
नुस्तं फेसबुक अर्थात सोशल मीडिया वापरता आल्यानं हे जमेलच असं नाही. सोशल मीडियात आपण त्या यंत्रणेविषयी बोलू शकतो. व्यक्त होऊ शकतो. राग प्रकट करू शकतो. इतरांची मतं ऐकून घेऊ शकतो. तक्रारी मांडू शकतो. मात्र आपण सोशल मीडियात काही अँक्शन नाही करू शकत. ज्यांनी आपले प्रश्न समजून घेऊन कृती करायची ते तशी कृती लगेच करतील का, आपली दखल घेतली जाईल का हे प्रश्न अनुत्तरीत राहतातच.
त्यामुळे आपल्या तक्रारी आणि प्रश्न सोडवण्यासाठी नुस्ता सोशल मीडियावरच संताप पुरेसा ठरेल, असं अजिबात नाही.
याउलट सरकारी यंत्रणा मात्र सोशल मीडिया वापरून व्यक्तिगत स्तरावर एकाचवेळी अनेकांशी संपर्क करू शकतात. एका ट्विटने सगळ्यांना माहिती देऊ
शकतात. आपल्यापर्यंत पोहोचू शकता, आपल्याला माहिती देऊन अपेक्षित गोष्टी व्हाव्यात म्हणून प्रयत्न करू शकतात.
मात्र ही झाली वन वे ट्रॅफिक. लोकांकडची ट्रॅफिक मात्र खाचगळग्यांनी भरलेलीच आहे, असं म्हणावं लागेल.
त्यामुळेच नुस्ता सोशल मीडिया वापरून फार उपयोग होणार नाही, इंटरनेटबेस्ड टेक्नॉलॉजी सरकारी यंत्रणा किती वापरतात, आणि लोक त्याचा जास्तीतजास्त उपयोग करून घेतात, यावर बदल घडू शकेल!
- विश्राम ढोले
माहिती आणि संज्ञापन विषयाचे अभ्यासक