शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
4
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
5
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
6
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
7
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
8
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
9
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
10
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
11
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
12
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
13
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
14
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
15
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
16
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
17
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
18
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
19
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
20
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत

ऑफिसवाल्यांनीच तुम्हाला स्वतः Resign करायला सांगितलं तर काय कराल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2020 17:09 IST

सध्याच्या काळात खासगी क्षेत्रात काम करणं म्हणजे खूपच जीव मुठीत घेऊन करण्यासारखं आहे.

सध्याच्या काळात खासगी क्षेत्रात काम करणं म्हणजे खूपच जीव मुठीत घेऊन करण्यासारखं आहे. कारण सतत आपला पर्फोमन्स द्यावा लागतो नोकरी आज आहे तर उद्या नाही  अशी परिस्थिती असते. त्यातुनच आर्थिक मंदीचा फटका संपूर्ण भारतातल्या कंपन्याना बसत असताना प्रत्येक व्यक्तीला आपला जॉब टिकवण्यासाठी आधीपेक्षा  खूप मेहनत घ्यावी लागत आहे. अनेक जण मानसीक तणावात जगत असतात.

स्वतःच्या कार्यक्षमतेवर शंका घेऊन वावरत असतात. जर तुमच्या बाबतीत सुद्धा असं होत असेल  टेंन्शन घेण्यासारखं यात काहीही नाही, जर तुमच्यावर जॉबलेस होण्याची वेळ आली तर ही  परिस्थिती कशी हॅण्डल करायला हवी हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

(image credit-IES magazine)

अनेक मुलांवर आणि मुलींवर घरची जबाबदारी असते. त्यामुले पैसे कमावण्याशिवाय पर्याय नसतो. त्यांना  स्वतःच आयुष्य मनासारखं इन्जॉय करता येत नाही  मानसीक आरोग्य चांगले राहत नाही. कारण सतत पैश्याच्या आणि कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तडफड चालू असते. आकड्यांचं चक्र डोक्यात फिरत असतं. 

(image credit- forbes)

अनेकदा खासगी क्षेत्रात वातावरण अनुकूल वातारणं नसतं. सहकारी वर्ग तसचं बॉसच्या नकारात्मक प्रतिक्रिया काहीवेळा त्रासदायक ठरू शकतात. अनेकदा तुम्ही ज्या ठिकाणी काम करत असता त्या ठिकाणचे मॅनेजमेंट पोलीसी किंवा अंतर्गत काही कारणांमुळे तुम्हाला पदावरून हटवण्यात येऊ शकतं. या स्थितीतून बाहेर पडून स्वतःचा बचाव करायचा असेल तर तुम्ही काही गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात. ( हे पण वाचा-अनुभव नसल्यामुळे नोकरी मिळत नसेल, तर 'या' खास टीप्स तुमच्यासाठीच)

(image credit-menutes.com)

कोणत्याही कंपनीत  तुम्हाला राजीनामा देण्याची वेळ का येते

राजीनाम्यासाठी कोणतीही जबाबदारी कंपनीची राहत नाही. जरी आपण कंपनीच्या दबावात राजीनामा दिला असला तरी उद्या आपण कोणत्याही शासकीय किंवा न्यायालयीन व्यवस्थेपुढे आव्हान देऊ शकत नाही. कारण तुम्ही स्वखुशीने राजीनामा दिला आहे असेच अधोरेखित होते. (त्यामुळे अनेकदा कंपनीतील चोरी, विनयभंग, गैरव्यवहार अश्या प्रकरणात देखील थेट टर्मिनेशन चा मार्ग न अवलंबता त्या एम्प्लॉयीकडून राजीनामा लिहून घेतात. असो…) कंपनीचे कुठल्याही प्रकारचे दायित्व व जबाबदारी अशावेळी राहत नाही. अनेकदा कंपनीला होणारं नुकसान परवडणारं नसतं त्यामुळे तुम्हाला पदावरून हटवण्यात सुद्धा येऊ शकतं.( हे पण वाचा- जॉबलेस झाल्यानंतर येणाऱ्या समस्या टाळण्यासाठी 'हे' नक्की वाचा )

(Image credit-live science)

मानसीक आरोग्य  असं ठेवा चांगलं.

तुमच्याबाबतीत सुद्धा असं झालं तर  स्वतःच्या भावना स्वीकारून आपल्या चुकांना सुधारण्याचा प्रयत्न करा. या चुका पुन्हा नव्याने काम करत असताना टाळा. स्वतःला काय वाटत आहे. आपण कुठे चुकत आहोत का या गोष्टींचा विचार करा.

जर  तुम्हाला खूप ताण आला असेल तर आपल्या घरातील लोकांना विश्वासात घेऊन  त्यांना तुमची समस्या सांगा. या कालावधीत घरच्या व्यक्तींना वेळ दिल्याने तसंच त्यांचाशी मनमोकळ्या गप्पा मारल्याने  तुम्हाला प्रसन्न वाटेल आणि ताण हलका होईल.  जर  तुम्हाला जास्त राग किंवा  दडपण येत असेल तर ताण घालवण्यासाठी मद्याचे अतिसेवन करणे, बाहेरचे अन्नपदार्थ खाणे टाळा.  असं केल्यास तुमचे विचार नकारात्मक होण्याची शक्यता असते.

टॅग्स :Mental Health Tipsमानसिक आरोग्यPersonalityव्यक्तिमत्व