शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरपरिषद निवडणुकीत नवी समीकरणे; बहुजन विकास आघाडी अन् मनसेची युती होणार? नेते म्हणाले...
2
दिल्लीत स्फोटापूर्वी मशिदीत गेला होता दहशतवादी डॉ. उमर नबी; स्फोटाच्या आधीचे सीसीटीव्ही समोर
3
'अमेरिकन कामगारांना ट्रेन करा आणि घरी जा...' ट्रम्प प्रशासनाचं नवीन फर्मान; भारतीय IT अभियंते चिंतेत
4
अंजली दमानियांकडून राजीनाम्याची मागणी; मला योग्य वाटेल ते मी करेन, अजित पवारांची प्रतिक्रिया
5
“३९ वर्षे संघटनेत, निष्ठावंतांची तुमच्याकडे काय किंमत?”; ठाकरेंना सवाल करत बडा नेता शिवसेनेत
6
६ डिसेंबरला करायचा होता स्फोट, पण अटकसत्रामुळे उधळला कट, ‘कार बॉम्ब’ची सुरू होती तयारी, नेटवरून घेतले धडे
7
"हिंदीतील लॉबीने मला स्वीकारलं नाही...", अजिंक्य देव स्पष्टच बोलले; अजय-सनीचं घेतलं नाव
8
डरानेवालो को डराओ! 'शिवतीर्थ'समोर बॅनरबाजी; उत्तर भारतीय सेनेने मनसे प्रमुख राज ठाकरेंना डिवचलं
9
KL Rahul: द.आफ्रिकेविरुद्ध केएल राहुल इतिहास रचणार? मोठ्या विक्रमापासून फक्त १५ धावा दूर!
10
पार्थ पवारांच्या कंपनीकडून आणखी एक फसवणूक; जमीन खरेदीचा १४७ कोटींचा नजराणाही बुडवला
11
कर्मचाऱ्यांना दररोज ऑफिसला येण्याचा आदेश, ६०० जणांनी राजीनामा दिला; कंपनीला बसला ₹१,५३५ कोटींचा फटका
12
२० क्विंटल स्फोटकांची खरेदी अन् पैशांवरुन वाद; ४ शहरांमध्ये IED हल्ला करण्याचा होता दहशतवाद्यांचा प्लॅन
13
Share Market Today: Nifty ची सुस्त सुरुवात, सेन्सेक्सच्या ३ दिवसांच्या तेजीवर ब्रेक; IT शेअर्स धडाम
14
दिल्ली कार हल्ल्याचा मास्टरमाईंड डॉ. उमर कुणाकडून घेत होता आदेश? धक्कादायक माहिती आली समोर
15
Groww IPO Listing: Google सारखीच आहे Groww ची कहाणी! एक चूक आणि बनलं ओळखीचं नाव, शेअर बाजारातही केलं अवाक्
16
आजचे राशीभविष्य,१३ नोव्हेंबर २०२५: कामाच्या धावपळीत कुटुंबाकडे दुर्लक्ष; सरकारकडून लाभाची शक्यता
17
५०० वर्षांनी गुरु-शनिचा शुभ योग: १० राशींना चौफेर चौपट लाभ, समस्या संपतील; पद-पैसा-भाग्योदय!
18
Datta Jayanti 2025: यंदा दत्त जयंती गुरुवारी, अत्यंत शुभ दिवस; पाहा, महत्त्व अन् महात्म्य!
19
“नगरपालिका निवडणुकीत सर्वाधिक जागा लढवण्यावर असेल भर, सत्तेची नाही विचारांची लढाई”: सपकाळ
20
दिल्ली स्फोटाचे गुपित उघडले; कारमधील मृतदेह डॉ. उमर नबीचाच, DNA रिपोर्ट समोर

ऑफिसवाल्यांनीच तुम्हाला स्वतः Resign करायला सांगितलं तर काय कराल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2020 17:09 IST

सध्याच्या काळात खासगी क्षेत्रात काम करणं म्हणजे खूपच जीव मुठीत घेऊन करण्यासारखं आहे.

सध्याच्या काळात खासगी क्षेत्रात काम करणं म्हणजे खूपच जीव मुठीत घेऊन करण्यासारखं आहे. कारण सतत आपला पर्फोमन्स द्यावा लागतो नोकरी आज आहे तर उद्या नाही  अशी परिस्थिती असते. त्यातुनच आर्थिक मंदीचा फटका संपूर्ण भारतातल्या कंपन्याना बसत असताना प्रत्येक व्यक्तीला आपला जॉब टिकवण्यासाठी आधीपेक्षा  खूप मेहनत घ्यावी लागत आहे. अनेक जण मानसीक तणावात जगत असतात.

स्वतःच्या कार्यक्षमतेवर शंका घेऊन वावरत असतात. जर तुमच्या बाबतीत सुद्धा असं होत असेल  टेंन्शन घेण्यासारखं यात काहीही नाही, जर तुमच्यावर जॉबलेस होण्याची वेळ आली तर ही  परिस्थिती कशी हॅण्डल करायला हवी हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

(image credit-IES magazine)

अनेक मुलांवर आणि मुलींवर घरची जबाबदारी असते. त्यामुले पैसे कमावण्याशिवाय पर्याय नसतो. त्यांना  स्वतःच आयुष्य मनासारखं इन्जॉय करता येत नाही  मानसीक आरोग्य चांगले राहत नाही. कारण सतत पैश्याच्या आणि कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तडफड चालू असते. आकड्यांचं चक्र डोक्यात फिरत असतं. 

(image credit- forbes)

अनेकदा खासगी क्षेत्रात वातावरण अनुकूल वातारणं नसतं. सहकारी वर्ग तसचं बॉसच्या नकारात्मक प्रतिक्रिया काहीवेळा त्रासदायक ठरू शकतात. अनेकदा तुम्ही ज्या ठिकाणी काम करत असता त्या ठिकाणचे मॅनेजमेंट पोलीसी किंवा अंतर्गत काही कारणांमुळे तुम्हाला पदावरून हटवण्यात येऊ शकतं. या स्थितीतून बाहेर पडून स्वतःचा बचाव करायचा असेल तर तुम्ही काही गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात. ( हे पण वाचा-अनुभव नसल्यामुळे नोकरी मिळत नसेल, तर 'या' खास टीप्स तुमच्यासाठीच)

(image credit-menutes.com)

कोणत्याही कंपनीत  तुम्हाला राजीनामा देण्याची वेळ का येते

राजीनाम्यासाठी कोणतीही जबाबदारी कंपनीची राहत नाही. जरी आपण कंपनीच्या दबावात राजीनामा दिला असला तरी उद्या आपण कोणत्याही शासकीय किंवा न्यायालयीन व्यवस्थेपुढे आव्हान देऊ शकत नाही. कारण तुम्ही स्वखुशीने राजीनामा दिला आहे असेच अधोरेखित होते. (त्यामुळे अनेकदा कंपनीतील चोरी, विनयभंग, गैरव्यवहार अश्या प्रकरणात देखील थेट टर्मिनेशन चा मार्ग न अवलंबता त्या एम्प्लॉयीकडून राजीनामा लिहून घेतात. असो…) कंपनीचे कुठल्याही प्रकारचे दायित्व व जबाबदारी अशावेळी राहत नाही. अनेकदा कंपनीला होणारं नुकसान परवडणारं नसतं त्यामुळे तुम्हाला पदावरून हटवण्यात सुद्धा येऊ शकतं.( हे पण वाचा- जॉबलेस झाल्यानंतर येणाऱ्या समस्या टाळण्यासाठी 'हे' नक्की वाचा )

(Image credit-live science)

मानसीक आरोग्य  असं ठेवा चांगलं.

तुमच्याबाबतीत सुद्धा असं झालं तर  स्वतःच्या भावना स्वीकारून आपल्या चुकांना सुधारण्याचा प्रयत्न करा. या चुका पुन्हा नव्याने काम करत असताना टाळा. स्वतःला काय वाटत आहे. आपण कुठे चुकत आहोत का या गोष्टींचा विचार करा.

जर  तुम्हाला खूप ताण आला असेल तर आपल्या घरातील लोकांना विश्वासात घेऊन  त्यांना तुमची समस्या सांगा. या कालावधीत घरच्या व्यक्तींना वेळ दिल्याने तसंच त्यांचाशी मनमोकळ्या गप्पा मारल्याने  तुम्हाला प्रसन्न वाटेल आणि ताण हलका होईल.  जर  तुम्हाला जास्त राग किंवा  दडपण येत असेल तर ताण घालवण्यासाठी मद्याचे अतिसेवन करणे, बाहेरचे अन्नपदार्थ खाणे टाळा.  असं केल्यास तुमचे विचार नकारात्मक होण्याची शक्यता असते.

टॅग्स :Mental Health Tipsमानसिक आरोग्यPersonalityव्यक्तिमत्व