शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
2
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
3
वादग्रस्त 'VSR'च्या विमानातून पार्थ पवारांचा प्रवास; वाद वाढताच म्हणाले, "अशी चूक पुन्हा होणार नाही"
4
Suvendu Adhikari : "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप
5
VIDEO: बापरे... प्रियांश आर्याचा षटकार थेट चाहत्याच्या तोंडावर आदळला, वाहू लागली रक्ताची धार
6
अधिक मास २०२६: मे मध्ये सुरू होणार अधिक मास तथा धोंड्याचा महिना; खगोलशास्त्राच्या नजरेतून पाहा 
7
Summer Vacation 2026: ट्रॅव्हलिंगदरम्यान दिसायचंय स्टायलिश आणि राहायचंय कम्फर्टेबल? पॅकिंग करताना 'या' ५ मस्ट हॅव अॅक्सेसरिज विसरू नका
8
जखमी पतीला रुग्णालयात नेण्यासाठी मागितले पैसे, नंतर पत्नीकडून रुग्णवाहिकाही स्वच्छ करून घेतली
9
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर वाढले; लग्नसराईच्या काळात आज चांदी ११०० रुपयांनी महागली, सोन्याचे नवे दर काय?
11
एक गोळीबार अन् उडाली ‘व्हाइट हाउस’ची झोप; सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?
12
Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज
13
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
14
अनिल अंबानींच्या ३०३४ कोटींच्या संपत्तीवर टाच; फ्लॅटपासून ते फार्महाऊस पर्यंत काय काय जप्त?
15
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
16
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, सेन्सेक्स ३५० अंकांनी, तर निफ्टी १०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्सवर आज नजर
17
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
18
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
19
India Heatwave Alert: उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
20
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

सुख म्हणजे काय असते ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 14:15 IST

आपल्याला आवडणारी गोष्ट जर सुख देण्यासाठी समर्थ असेल तर ती गोष्ट सर्वांनाच सुख देऊ शकेल काय?

मनुष्याला नेहमी आनंदाची अपेक्षा असते. आपल्या जीवनात असलेले दु:ख नष्ट व्हावे आणि आपल्याला सुख प्राप्त व्हावे, असे प्रत्येकाला वाटत असते. हा आनंद मिळवण्यासाठी माणूस धन-स्त्री-मित्र-नानाविध भोग्य पदार्थ यांच्यामागे लागतो. आपल्याला जे काही सापडते त्याच्यातच आनंद आहे, असे माणसाला वाटते. परंतु, आपल्याला आवडणारी गोष्ट जर सुख देण्यासाठी समर्थ असेल तर ती गोष्ट सर्वांनाच सुख देऊ शकेल काय? याचा विचार आपण केला पाहिजे.

पदार्थजन्य सुखाच्या मागे लागताना आपण ज्या पदार्थांच्या मागे सुखाच्या अपेक्षेने लागतो तो पदार्थ पूर्वीपासूनच ज्याच्याजवळ आहे तो सुखी आहे काय? याचाही विचार केला पाहिजे आणि असा विचार जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्याला असे दिसून येते की, प्रत्येकजण आपल्याजवळ नसलेल्या वस्तू, सुखाचा शोध घेत असतो व तिच्यामागे धावत असतो. परंतु, ज्या पदार्थांच्या मागे जाऊन सुख मिळवण्याचा प्रयत्न केला जातो ते पदार्थ मानसिक दु:खजनक आहेत असे संतांचे म्हणणे आहे. 

येर ती मासिके दु:खाची जनिती ।नाही आदि अंती अवसानी ।।  

असे श्री तुकोबाराय स्पष्टपणे सांगतात. त्यामुळे विषयांच्या उपभोगापासून, वस्तूंच्या लाभापासून सुख मिळेल ही समजूत संतांनी चुकीची ठरविली. विषयाचे सुख ही ‘बेगडाची बाहुलीच’ मानली. इंद्रियांची असमाधानी वृत्ती बाह्य विषयाकडे धाव घेत असते. परंतु, सुख हे आपल्याजवळ नसलेल्या वस्तूत नाही तर ते आपल्याजवळ असलेल्या आत्मवस्तूत आहे. ती आत्मवस्तू आपली आहे, हे अनुभवणे हाच परमार्थ होय. तोच परमार्थ श्री तुकोबाराय शिकवतात.

आपुला तो एक देव करुनि घ्यावा।तेणेविण जीवा सुख नोई ।। 

सुख हे बाहेरच्या वस्तूंचा लाभ झाल्यामुळे होणारे नसून देवाला आपले करण्यात आई, परमेश्वराच्या आश्रयातच आहे, असे संत-महात्मे वारंवार सांगतात. आपल्याला विषयात सुख वाटत असल्यामुळे आपण ते विषय पुरविणाऱ्या पदार्थांना आपलेसे करतो. परंतु, संतांच्या दृष्टीने जोपर्यंत ईश्वरावर प्रेम-भक्ती जडत नाही तोपर्यंत माणसाला सुखाचा ठेवा हस्तगत होणारच नाही. आपल्याला जे दु:ख होत असते ते मी म्हणजे देह असा देहाभिमान धारण केल्यामुळे होत असते.

 देहाभिमानाचे पोटी । अनंत दु:खाचिया कोटी ।।  

असे संत एकनाथ महाराजांनी म्हटलेलेच आहे. हा देहाभिमान टाकून देऊन आपण देवाला आपले करणे म्हणजे भक्तीच्या दृष्टीने आपण देवाचे भक्त आहोत असे जाणणे व ज्ञानदृष्टीने आपण देवाचे अंश आहोत, असे जाणणे व क्रमाने आपणच देव आहोत या अनुभूतीवर आरुढ होणे होय. यालाच देव आपला करुन घेणे म्हणता येईल. अशा पद्धतीने भक्तीच्या मार्गाने जाऊन देवाला आपला करुन घेणे हेच सुखाचे साधन संतांनी आपणास सांगितले. त्यावाचून सुख मिळणे अशक्य असल्यामुळेच श्री तुकोबाराय म्हणतात, तेणेविण जीवा सुख नोई ।

- प्रा.डॉ. शरदचंद्र देगलूरकर, धुंडा महाराज मठ संस्थान, देगलूर जि.नांदेड

टॅग्स :spiritualअध्यात्मिक