शहरं
Join us  
Trending Stories
1
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
2
१८ चेंडू, ५ धावा अन् ३ विकेट्स! पॅट कमिन्स, भुवनेश्वर कुमार यांनी मुंबई इंडियन्सला रडवले 
3
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
4
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
5
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
6
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
7
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
8
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
9
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
10
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
11
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
12
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
13
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
14
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
15
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
16
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
17
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
18
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
19
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
20
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका

दिवाळीनंतर सुस्तावलेलं रुटीन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2017 1:46 PM

दिवाळीनंतरच्या आठवड्यात आपण पुन्हा रुटीनला भिडतो. पुढचे चार-पाच दिवस मोबाइलमधले कुटुंबाचे दिवाळीचे फोटो पाहतो, शुभेच्छांच्या फॉरवर्ड इमेजेस डिलीट करत बसतो.. पण मन?ते दिवाळीतच असतं.. हाताला फटाक्यांचा वास उरतो, जिभेवर लाडवाची, चकलीची चव असते तशा आठवणीही..त्या पुन्हा पुढच्या दिवाळीची वाट पाहू लागतात..

- ओंकार करंबेळकर

‘अरे शिमग्याला नाही, पालखीला नाही, गणपतीला नाही आता किमान दिवाळीला तरी मला म्हातारीला तोंडं दाखवा रे!’- अशी कडक भाषेत पोस्टकार्ड लिहिणारी, नातवंडांसाठी आंब्या-फणसाची साटं करून ठेवणारी, एरवी स्वत: तूपभात लोणच्या पलीकडे अधिकचे दोन घास न खाणारी; पण नातू किंवा मुलगा घरी येणार म्हणून कंबर कसणारी अशी आजी/काकू/मावशी नाहीतर आई असतेच प्रत्येकाच्या आयुष्यात.आणि दिवाळीत ती वाट पाहते लेकरांची.दिवाळी चार दिवसांची ती येते, जाते.आपण पुन्हा आपल्या व्यापाला लागतो. आॅफिसात जुंपले जातो. कॉलेज, हॉस्टेलमध्ये मित्रांमध्ये रमतो.पण त्या चार दिवसांची दिवाळी थोडी सोबत येते..आणि पहिल्या आठवड्यात आपल्याही नकळत आपल्या डोळ्यांना ओल येते. आठवणी पायात पायात करतात.आताशा बिझी असल्याचा पट्टा वर्षभर दुसरं काही करूच देत नाही. बदलत्या वेगवान काळात आपल्यामध्ये, घरांमध्ये, नात्यांमध्ये, कुटुंबांमध्ये मोठे बदल झाले आहेत. जिममध्ये ट्रेडमिल नावाचा सतत पळणारा पट्टा असतो, त्याच्या वेगाने तुम्हाला चालावं किंवा पळावं लागतं. जरा लक्ष ढळलं किंवा तुमचा चालण्याचा जोर कमी झाला, तर अडखळायला होतं किंवा तुम्ही खाली पडता तरी. आपण सगळेच आता नोकरी किंवा शिक्षण नावाच्या वेगवान ट्रेडमिलवर स्वत:ला उभं केलं आहे. सतत आपलं शेड्युल टाइट. त्यादरम्यान फोनमधल्या विशलिस्टमध्ये अनेक गोष्टी घालत आपण हे सारं दिवाळीत करू म्हणतो. उत्सवापेक्षा बारा महिन्यांचा शीण घालवण्याचा हक्काचा काळ असं स्वरूप आता दिवाळीला आलंय. वर्षभर ठरवलेल्या मित्र, नातेवाइकांच्या भेटी याच काळात होतात. सणाच्या उत्साहाबरोबर आरामामुळे एक प्रकारचे सुस्तावलेपणही येत असतं. लहानपणच्या दिवाळीच्या आठवणी येऊ लागतात. भावंडांशी केलेली भांडणं, किल्ले डोळ्यांसमोर यायला लागतात. यावर्षी दिवाळीपर्यंत साथीला असलेल्या पावसामुळे एखादी जुनी पावसाळी दिवाळी आठवते. त्यावर्षी मऊ पडलेले फटाके किंवा चिवड्याचे चामट झालेले पोहे, पाऊस बघत खिडकीत बसून लोण्यात बुडवून खाल्लेल्या चकल्याही आठवतात.आणि दिवाळी संपून गेली तरी दिवाळीचा असा हॅँगओव्हर मनावर राहतोच. फराळाच्या डब्यातलं फराळ, ते तळाला जातं; पण खाली उरतंच काहीतरी...तसं मनात बरंच काही उरतंच.होस्टेलवर किंवा आॅफिसात अनेकजण घरचा फराळ आणतात. मग तो मिक्स करून पुन्हा एकदा फराळावर यथेच्छ आडवा हात मारला जातो. उरलेल्या चिवड्याची मिसळही करून होते. डब्याच्या खाली तुपामुळे एकमेकाला चिकटून एकच गोळा झालेले लाडू किंवा तळाशी असलेल्या खारट चिवड्याचा मसाला जिभेवर दाबायची इच्छा बळावायला लागते. दिवाळी अंक वाचताना मध्येच भावंडांमध्ये रंगलेला पत्त्यांचा डाव आठवतो. पाच-तीन-दोन पासून सुरुवात होत सगळे डाव खेळून होतात. चिडाचिडी करून होते. ती आठवून आता हसू येतं. दिवाळी अशी हळूहळू हलकेच सुस्तावत आपल्यासोबत चालते. पत्ते खेळताना, गप्पा मारताना जुन्या आठवणी- गमती आठवतात. मग त्यावर खोखो हसणं आठवतं. हे वरवर साधे हलकेफुलके प्रसंग असले तरी आपल्यासाठी ते चार्जिंग पॉइंट्स असतात. पुढच्या दिवाळीपर्यंत हे क्षण चार्जिंग पुरवतात.

सण, आनंद, समाधान कदाचित हेच असावं. फटाके, नवे कपडे, वस्तू यांच्यापेक्षा हे एकत्र येणं, जमणं, गप्पा, दंगामस्ती, खळखळून हसणं, सर्वांनी पुन्हा सैलावून मोकळं-ढाकळं होणं हाच दिवाळीचा हेतू असावा. हे सगळं होणं म्हणजेच दिवाळी सुफळ झाली असं म्हणावं लागेल.आणि मग आपण दिवाळीनंतरच्या आठवड्यात कामाला भिडतो. पुढचे चार-पाच दिवस मोबाइलमधले दिवाळीचे फोटो पाहतो, शुभेच्छांच्या फॉरवर्ड इमेजेस डिलीट करत बसतो..

आणि दिवाळीत हाताला फटाक्यांचा वास उरतो.किंवा जिभेवर लाडवाची, चकलीची चव असते.तशा दिवाळीच्या आठवणीही कामात मध्येच येतात, जातात..आता काही दिवसात त्या आठवणी पुसट होतील..पण दिवाळीनं दिलेला ब्रेक. चार्ज होत कामाला लागण्याचं बळ, घरच्यांसोबतच्या निवांत गप्पा आणि त्यातलं मन:पूत हसू हे सारं मात्र आपल्यासोबतच असतं..पुढच्या दिवाळीपर्यंत..पुन्हा भेटण्यासाठी! onkark2@gmail.com 

टॅग्स :diwaliदिवाळी