शहरं
Join us  
Trending Stories
1
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
2
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
3
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
4
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
5
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
6
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 
7
MI vs GT : 'पॉवरप्ले'मध्ये DSP सिराजचा धाक! पहिल्याच ओव्हरमध्ये साधला विकेट्सचा डाव
8
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
9
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
10
चीनला मोठा धक्का; iPhone चे सर्व मॉडेल्स भारतात तयार होणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती...
11
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
12
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?
13
जीवघेण्या फंगसचा अलर्ट! वाढत्या तापमानामुळे येईल नवं संकट; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा
14
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
15
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
16
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
17
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
18
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
19
भीषण अपघात! कार चालवताना रील पाहत होता ड्रायव्हर; नवरदेवाच्या भाचीचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
20
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...

मंडेला आणि महात्मा

By admin | Updated: April 8, 2017 18:40 IST

दोघंही नेते महान. ते कधीच आक्रमक झाले नाहीत; पण आपल्या विचारांवर त्यांचा ठाम विश्वास होता. ध्येघ सकरात्मक होतं आणि काय हवं आहे याची त्यांना कल्पना होती.

दोघंही नेते महान. ते कधीच आक्रमक झाले नाहीत; पण आपल्या विचारांवर त्यांचा ठाम विश्वास होता. ध्येघ सकरात्मक होतं आणि काय हवं आहे याची त्यांना कल्पना होती.साऊथ आफ्रिकेतली गोष्ट आहे. कृष्णवर्णीय नेते नेल्सन मंडेला अनेक वर्ष तुरुंगात होते. ते आता वर्षभरात सुटतील अशी शक्यता निर्माण झाली होती. सगळ्या जगाचं लक्ष त्यांच्या सुटकेकडे लागून राहिलं होतं. मंडेला तरुंगातृन बाहेर आल्यावर काय होईल याबद्दल जगभर तर्कवितर्क लढवले जात होते. अनेकांचा असा अंदाज होता, की मंडेला तुरुंगातून बाहेर आले की वर्णविद्वेशाच्या दंगली उसळतील, रक्ताचे पाट वाहतील. आणि ही भीती अनाठायी नव्हती.मात्र त्याच वेळेला साऊथ आफ्रिकेतला एक गट ठामपणे असं म्हणत होता, की असं होता कामा नये. पण मग हे टाळायचं कसं, असा विचार करणाऱ्या काही प्रभावशाली व्यक्तींनी एकत्र येऊन असं ठरवलं, की काहीही झालं, तरी अशा दंगली होऊ द्यायच्या नाहीत. मग त्यासाठी त्यांनी प्लॅनिंग करायला सुरुवात केली.सर्वप्रथम त्यांंनी मंडेलांचे समर्थक आणि विरोधक असलेल्या कडव्या नेत्यांना एकत्र आणलं. राष्ट्रीय पातळीवरच्या परस्परांविरुद्ध आग ओकणाऱ्या या नेत्यांना एकत्र आणणं हे फारच अवघड काम होतं. पण या लोकांनी ते केलं. त्यांनी त्या कट्टर नेत्यांना एकत्र यायला भाग पाडलं.त्यांना सांगितलं, की तुमची विचारसरणी खूप वेगवेगळी आहे हे आम्हाला मान्य आहे. तुम्ही तुमचं म्हणण मांडू नका असंही आम्ही सांगत नाही. मात्र जे बोलाल त्यात शब्द सांभाळून वापरा. भावना भडकवणारी विधानं करु नका. कारण त्यातून फक्त दंगली होतील. यात सगळ्यांचं फक्त नुकसान आणि नुकसानच आहे.मग त्यांनी आपसात भाषेचे, बोलण्याचे नियम ठरवले. या नेतेमंडळींनी ते अनेकदा मोडले. अनेकदा ती बंधनं त्यांनी झुगारुन देण्याचा प्रयत्न केला; पण शांततावादी मंडळी त्यांच्या म्हणण्यावर ठाम राहिली. त्यांनी या नेत्यांना सांगितलं की असं नाही चालणार. तुम्ही मान्य केलेले नियम तुम्हाला पाळावेच लागतील.असं एकूण वर्षभर चाललं. दोन्हीकडची कट्टर माणसं एकत्र आली. दोघांनीही आपापली बाजू मांडली; पण ती अ‍ॅग्रेसिव्हली नव्हे, तर अ‍ॅसर्टिव्हली!अखेरीस नेल्सन मंडेला तुरुंगातून बाहेर आले. त्यांचं पहिलं वाक्य होतं, ‘मी खूप वर्ष तुरुंगात राहिलो, पण माझा गोऱ्या माणसांवर अजिबात राग नाही. काही चुका आम्ही केल्या, काही चुका त्यांनी केल्या, पण आता आपण ते मागे ठेवूया. कारण आपल्याला आता देश पुढे न्यायचाच. प्रगती करायची आहे.पुढेही नेल्सन मंडेलांना त्यांची भूमिका ठामपणे मांडावी लागली. लोकांना ती पटवून द्यावी लागली. त्यात त्यांनी कधीही आपला मुद्दा सोडला नाही. कधी तो अ‍ॅग्रेसिव्हली मांडलाही नाही. त्यांना मिळालेल्या शांततेच्या नोबेल पारितोषिकाबाबतही हे नमूद केलं गेलं, की स्वत:चं म्हणणं न सोडता ठामपणे मांडत राहणं आणि त्यात कुठेही आक्रमकता येऊ न देणं ही त्यांची सगळ्यात मोठी ताकद आहे. कारण स्वत:च्या विचारांवर ठाम राहणं आणि तरीही त्यात आक्रमकता येऊ न देणं यासाठी फार मोठी ताकद लागते.असाच एक ठाम, पण तरीही आक्रमक नसलेला थोर माणूस आपल्या देशात होऊ गेला... मोहनदास करमचंद गांधी...संपूर्ण स्वातंत्र्यलढ्यातली कुठलीही घटना बघितली तरी लक्षात येतं की गांधीजींनी त्यांंचं म्हणणं कधीही सोडलं नाही. पण ते कधीही आक्रमक झाले नाहीत. कारण त्यांचा त्यांच्या विचारांवर ठाम विश्वास होता. स्वत:ला काय हवं आहे याची त्यांना पूर्ण कल्पना होती. त्यांची ध्येयं सकारात्मक होती आणि त्या ध्येयाच्या दिशेनं जाण्यासाठी लागणारा अथक ठामपणा त्यांच्याकडे होता.