शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

मंडेला आणि महात्मा

By admin | Updated: April 8, 2017 18:40 IST

दोघंही नेते महान. ते कधीच आक्रमक झाले नाहीत; पण आपल्या विचारांवर त्यांचा ठाम विश्वास होता. ध्येघ सकरात्मक होतं आणि काय हवं आहे याची त्यांना कल्पना होती.

दोघंही नेते महान. ते कधीच आक्रमक झाले नाहीत; पण आपल्या विचारांवर त्यांचा ठाम विश्वास होता. ध्येघ सकरात्मक होतं आणि काय हवं आहे याची त्यांना कल्पना होती.साऊथ आफ्रिकेतली गोष्ट आहे. कृष्णवर्णीय नेते नेल्सन मंडेला अनेक वर्ष तुरुंगात होते. ते आता वर्षभरात सुटतील अशी शक्यता निर्माण झाली होती. सगळ्या जगाचं लक्ष त्यांच्या सुटकेकडे लागून राहिलं होतं. मंडेला तरुंगातृन बाहेर आल्यावर काय होईल याबद्दल जगभर तर्कवितर्क लढवले जात होते. अनेकांचा असा अंदाज होता, की मंडेला तुरुंगातून बाहेर आले की वर्णविद्वेशाच्या दंगली उसळतील, रक्ताचे पाट वाहतील. आणि ही भीती अनाठायी नव्हती.मात्र त्याच वेळेला साऊथ आफ्रिकेतला एक गट ठामपणे असं म्हणत होता, की असं होता कामा नये. पण मग हे टाळायचं कसं, असा विचार करणाऱ्या काही प्रभावशाली व्यक्तींनी एकत्र येऊन असं ठरवलं, की काहीही झालं, तरी अशा दंगली होऊ द्यायच्या नाहीत. मग त्यासाठी त्यांनी प्लॅनिंग करायला सुरुवात केली.सर्वप्रथम त्यांंनी मंडेलांचे समर्थक आणि विरोधक असलेल्या कडव्या नेत्यांना एकत्र आणलं. राष्ट्रीय पातळीवरच्या परस्परांविरुद्ध आग ओकणाऱ्या या नेत्यांना एकत्र आणणं हे फारच अवघड काम होतं. पण या लोकांनी ते केलं. त्यांनी त्या कट्टर नेत्यांना एकत्र यायला भाग पाडलं.त्यांना सांगितलं, की तुमची विचारसरणी खूप वेगवेगळी आहे हे आम्हाला मान्य आहे. तुम्ही तुमचं म्हणण मांडू नका असंही आम्ही सांगत नाही. मात्र जे बोलाल त्यात शब्द सांभाळून वापरा. भावना भडकवणारी विधानं करु नका. कारण त्यातून फक्त दंगली होतील. यात सगळ्यांचं फक्त नुकसान आणि नुकसानच आहे.मग त्यांनी आपसात भाषेचे, बोलण्याचे नियम ठरवले. या नेतेमंडळींनी ते अनेकदा मोडले. अनेकदा ती बंधनं त्यांनी झुगारुन देण्याचा प्रयत्न केला; पण शांततावादी मंडळी त्यांच्या म्हणण्यावर ठाम राहिली. त्यांनी या नेत्यांना सांगितलं की असं नाही चालणार. तुम्ही मान्य केलेले नियम तुम्हाला पाळावेच लागतील.असं एकूण वर्षभर चाललं. दोन्हीकडची कट्टर माणसं एकत्र आली. दोघांनीही आपापली बाजू मांडली; पण ती अ‍ॅग्रेसिव्हली नव्हे, तर अ‍ॅसर्टिव्हली!अखेरीस नेल्सन मंडेला तुरुंगातून बाहेर आले. त्यांचं पहिलं वाक्य होतं, ‘मी खूप वर्ष तुरुंगात राहिलो, पण माझा गोऱ्या माणसांवर अजिबात राग नाही. काही चुका आम्ही केल्या, काही चुका त्यांनी केल्या, पण आता आपण ते मागे ठेवूया. कारण आपल्याला आता देश पुढे न्यायचाच. प्रगती करायची आहे.पुढेही नेल्सन मंडेलांना त्यांची भूमिका ठामपणे मांडावी लागली. लोकांना ती पटवून द्यावी लागली. त्यात त्यांनी कधीही आपला मुद्दा सोडला नाही. कधी तो अ‍ॅग्रेसिव्हली मांडलाही नाही. त्यांना मिळालेल्या शांततेच्या नोबेल पारितोषिकाबाबतही हे नमूद केलं गेलं, की स्वत:चं म्हणणं न सोडता ठामपणे मांडत राहणं आणि त्यात कुठेही आक्रमकता येऊ न देणं ही त्यांची सगळ्यात मोठी ताकद आहे. कारण स्वत:च्या विचारांवर ठाम राहणं आणि तरीही त्यात आक्रमकता येऊ न देणं यासाठी फार मोठी ताकद लागते.असाच एक ठाम, पण तरीही आक्रमक नसलेला थोर माणूस आपल्या देशात होऊ गेला... मोहनदास करमचंद गांधी...संपूर्ण स्वातंत्र्यलढ्यातली कुठलीही घटना बघितली तरी लक्षात येतं की गांधीजींनी त्यांंचं म्हणणं कधीही सोडलं नाही. पण ते कधीही आक्रमक झाले नाहीत. कारण त्यांचा त्यांच्या विचारांवर ठाम विश्वास होता. स्वत:ला काय हवं आहे याची त्यांना पूर्ण कल्पना होती. त्यांची ध्येयं सकारात्मक होती आणि त्या ध्येयाच्या दिशेनं जाण्यासाठी लागणारा अथक ठामपणा त्यांच्याकडे होता.